शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 12:33 IST

काँग्रेसचे तत्कालीन आमदार कैलास गोरंट्याल यांनी शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना डिवचण्यासाठी "५० खोके...एकदम ओके" अशी घोषणा माध्यमांसमोर दिली होती.

Vidhan Sabha Result ( Marathi News ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आणि पक्षाच्या ५६ पैकी ४० आमदारांनी शिंदे यांची साथ देणे पसंत केले. उद्धव ठाकरेंपासून दूर होण्यासाठी या आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीतील विविध नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यातच काँग्रेसचे तत्कालीन आमदार कैलास गोरंट्याल यांनी शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना डिवचण्यासाठी "५० खोके...एकदम ओके" अशी घोषणा माध्यमांसमोर दिली. नंतरच्या काळात राज्यभरात ही घोषणा बऱ्याच काळ चर्चेत होती. मात्र विधानसभा निवडणूक येईपर्यंत हा विषय मागे पडला आणि सरकारच्या लाडकी बहीण योजनेनं महाविकास आघाडीच्या सर्वच मुद्द्यांना चितपट केलं. तसंच ही घोषणा देणारे कैलास गोरंट्याल हेदेखील जालना विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.

राज्याचे लक्ष लागलेल्या जालना विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी ३१ हजार ६५१ इतक्या मताधिक्याने बाजी मारली. तर काँग्रेसचे उमेदवार आ. कैलास गोरंट्याल यांचा पराभव झाला. जालना विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत २६ उमेदवार उभे होते. त्यातही काँग्रेसकडून आ. कैलास गोरंट्याल, शिंदेसेनेकडून अर्जुन खोतकर यांच्यातच सरळ लढत होत होती.  वंचितचे डेव्हिड घुमारे, भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार अशोक पांगारकर, काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीतील चुरस वाढली होती. 

प्रचारादरम्यान निवडणुकीच्या उमेदवारांनी एकमेकांवर टीकेचे बाण सोडत वातावरण चांगलेच तापविले होते. उमेदवारांनी शहरी, ग्रामीण भागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून प्रचार केला. सभा, कॉर्नर बैठकांवरही लक्ष देण्यात आले होते. प्रचाराच्या या धामधुमीनंतर २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेत जालना विधानसभा मतदारसंघात ६४.३९ टक्के मतदान झाले होते. तर शनिवारी झालेल्या मतमोजणीनंतर या मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकला असून, शिंदेसेनेचे अर्जुन खोतकर यांनी ३१ हजार ६५१ मते अधिक घेत विजय मिळविला. खोतकर यांना १ लाख ४ हजार ६६५ इतकी तर पराभूत उमेदवार गोरंट्याल यांना ७३ हजार १४ मते मिळाली आहेत. 

या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज यांना ३० हजार ४५४ मते घेतली असून, ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. वंचितचे उमेदवार डेव्हिड घुमारे यांना ६,३२२, भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार अशोक पांगारकर यांना २,२२७ मते मिळाली. इतर पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांना मात्र अपेक्षित मते मिळालेली नाहीत. एकूणच या निकालानंतर अर्जुन खोतकर, अभिमन्यू खोतकर यांच्यासह महायुतीतील मित्र पक्षांच्या पदाधिकारी, समर्थकांसह शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. मतमोजणी केंद्रासह खोतकर यांच्या निवासस्थान परिसरातही एकच जल्लोष केला जात होता. खोतकर समर्थकांनी रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध भागांत एकच जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली.

गोरंट्याल यांच्या पराभवाचे कारण... 

काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा ३१ हजार ६५१ मतांनी पराभव झाला. तर काँग्रेस पक्षातील बंडखोर उमेदवार अब्दुल हाफिज यांनी ३० हजार ४५४ मते घेतली. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत निकाल लागेल, ही मविआची आशा विधानसभेच्या निकालात फोल ठरली. दरम्यान, जनतेने दिलेला कॉल आपल्याला मान्य असून, यापुढेही आपण जनतेच्या सेवेत कार्यरत राहणार आहोत. आजवर पाणीप्रश्न सोडविण्यासह मेडिकल कॉलेज मंजूर करून सुरू करण्यात यश आले आहे. यापुढेही जनसेवा सुरूच राहील, असे कैलास गोरंट्याल यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024jalna-acजालनाcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदे