शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

बनावट खतांचा कारखाना उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:18 IST

: कृषी अधीक्षक तसेच त्यांचे सहकारी हे शुक्रवारी अचानक राजलक्ष्मी कारखान्यात तपासणीसाठी गेले असता, तेथे चक्क सेंद्रिय खताचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कृषी अधीक्षक तसेच त्यांचे सहकारी हे शुक्रवारी अचानक राजलक्ष्मी कारखान्यात तपासणीसाठी गेले असता, तेथे चक्क सेंद्रिय खताचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे तसेच अन्य अधिकाऱ्यांनी हा बनावट खतांचा कारखाना उघडकीस आणून शेतक-यांची होणारी फसणूक थांबवली आहे.हा कारखाना नांदेड येथील एका बड्या उद्योजकाचा असल्याचे सांगण्यात आले. २४ तास उलटल्यावरही या प्रकरणातील नेमका मालक कोण हे ना कृषी विभागाला कळले ना, पोलिसांना, विशेष म्हणजे कृृषी खात्याच्या गुणव्ता नियंत्रण विभागाकडे संबंधित कारखाना कोणाच्या नावाने चालतो याची सविस्तर माहिती असते, असे असताना गुन्हा नोंदविताना तो अज्ञात आरोपीविरूध्द नोंदवण्यात आल्याने देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बाबत पोलीसांकडूनही रितसर माहिती मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. शेतकºयांच्या भावानांशी हा सर्व खेळ सुरू असतांना यंत्रणांना कारखाना कोण चालवत होते, त्या बनावट सेंद्रिय खत निर्मितीसाठी कच्चा माल कुठून येत होता, त्याचे पुरवठादार कोण हे समजू शकले नाही.दरम्यान, गुंडेवाडी येथील बनावट कारखान्यामध्ये जहाज या मुंबई येथील नामांकित ब्रॅण्डच्या नावाखाली बनावट खत विक्री केली जात होती. विशेष म्हणजे सेंद्रीय खताच्या नावाखाली काजूची अर्क काढलेली टरफले, झेंडूच्या झाडाचा भुसा आदी साहित्य वापरले जात होते. तसेच एक आयुर्वेदिक भुकटीही कृषी खात्याने जप्त केली आहे. या खताच्या वापरामुळे पिकांची वाढ गती होऊन त्यावर कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु कृषी खात्यातील अधिका-यांच्या म्हणण्यानुसार अशा साहित्यामुळे कुठलीच सुरक्षा मिळणे शक्य नसते.मोक्का लावण्याची गरजएकूणच खत उत्पादक उद्योजकाने यापूर्वी अशा किती बनावट खताची विक्री करून शेतकºयांच्या डोळ्यात धूळफेक केली अशी एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या संदर्भात कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांना विचारले असता, ते म्हणाले की, आम्ही गुन्हा नोंद केला आहे, आरोपी कोण त्याने हा गोरखधंदा कसा चालविला हा तपासाचा भाग असल्याचे सांगितले.- भीमराव डोंगरे, काँग्रेस नेते

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAgriculture Sectorशेती क्षेत्र