शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 05:27 IST

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वसंध्येलाच २१ एप्रिल रोजी जालना येथील आदर्श संजयराव राऊत आणि त्याचे आई-वडील हे पहलगाम येथील हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेले होते.

जालना : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वसंध्येला २१ एप्रिल रोजी सायंकाळी ‘आप काश्मिरी हो क्या? हिंदू हो क्या? आप यहाँ के नही लगते’, असे प्रश्न विचारत दहशतवाद्यांनी संवाद साधल्याचा दावा जालना येथील आदर्श राऊत याने बुधवारी केला आहे. दहशतवाद्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर स्वत:सोबत घडलेल्या घटनेची माहिती ‘एनआयए’ला ई-मेलद्वारे दिल्याचेही राऊत यांनी सांगितले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वसंध्येलाच २१ एप्रिल रोजी जालना येथील आदर्श संजयराव राऊत आणि त्याचे आई-वडील हे पहलगाम येथील हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेले होते. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला तेथे चालत किंवा घोडा घेऊन जावे लागते. त्यामुळे आदर्श याने घोडा घेऊन वर जाणे पसंत केले. ते मॅगी स्टॉलवर थांबले  असता पाच-सहा जण त्यांच्याकडे आले.

आप यहाँ के नही लगते? यावर आदर्श म्हणाला...

‘आप काश्मिरी हो क्या, आप हिंदू हो क्या, आप यहाँ के नही लगते’, असे प्रश्न त्यांनी केले. त्यावर आदर्श याने ‘नही, मैं यहाँ का ही हूँ...’ असे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्ती ‘आज भीड कम है’ असे म्हणत तेथून निघून गेल्या. त्यानंतर आदर्श राऊत हा हॉटेलमध्ये गेला.

दुसऱ्या दिवशी २२ एप्रिलला सकाळी ते  श्रीनगरमध्ये गेले. त्याचवेळी पहलगाममध्ये हल्ला झाल्याची माहिती मिळाली. सर्व पर्यटक भयभीत झाले. 

२१ ला करायचा होता हल्ला

घटनेनंतर दहशतवाद्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध झाले. त्यातील एकाने आपल्याशी संवाद साधल्याचे आदर्शने वडिलांना सांगितले. दहशतवाद्यांनी केलेली विचारणा पाहता त्यांना २१ एप्रिलला हल्ला करावयाचा होता; गर्दी कमी असल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी हल्ला केल्याचे दिसते.

वडिलांशी चर्चा केल्यानंतर आदर्श याने ‘एनआयए’ला ई-मेलद्वारे माहिती दिली. विमान प्रवास सुरू झाल्यानंतर २६ रोजी श्रीनगरहून मुंबई येथे आणि तेथून रेल्वेने जालन्यात आल्याचेही आदर्श राऊत म्हणाला.

‘सीआयडी’ने केला संपर्क

राऊत याने ई-मेल केला असला तरी अद्याप एनआयएकडून त्यांच्याशी संपर्क करण्यात आलेला नाही. परंतु ही माहिती मिळताच बुधवारी सीआयडीच्या पथकाने आदर्श राऊत याच्याशी संपर्क साधून चौकशी केली आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला