शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर; प्रशासकीय दुर्लक्ष, अपुऱ्या निधीने बारव संवर्धन कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 16:22 IST

संवर्धनासाठी प्राप्त निधी अपुरा; लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे

- अशोक डोरलेअंबड : शहराच्या विविध भागात होळकरकालीन दहा ऐतिहासिक बारव असून, प्रशासकीय दुर्लक्षामुळे या बारव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही इतिहासप्रेमींनी बारव संवर्धनासाठी मोहीम राबविल्यानंतर शासनाने निधी उपलब्ध करून दिला. परंतु, दिलेला निधीही अपुरा असून, बारव संवर्धनासाठी अधिक निधीची आवश्यकता आहे.

अंबड शहराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला असून, २५० वर्षानंतरही  मंदिर व बारवेच्या इतिहासातील पाऊलखुणा शहरात आढळतात. शहरातील सर्वात मोठी बारव म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानातील पुष्कर्णी बारवेकडे पाहिले जाते. या बारवेत महादेव मंदिर असून, चारही बाजूंनी बारवेत उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. आतमध्ये चार घाट तसेच देवकोष्टक आहे. अंबड ते डोंगरातील महादेव रस्त्याच्या शेजारी असलेल्या तांबोळी यांच्या मळ्यात चिचंबारव आहे. पूर्वी या परिसरात चिचेंचे बन आणि पानमळा असल्याने बारवेस चिचंबारव, चिचंविहीर असे म्हटले गेले. डोंगरातील महादेव मंदिराच्या पायथ्याशी शिवलिंग आकाराची बारव असून, या बारवेत उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तसेच पशुपक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी या बारवेची निर्मिती केली होती. या बारवेचा गतवर्षी जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

होळकर नगरमध्ये राणीच्या वेशीजवळ नागोबा बारव असून, पूर्वी या बारवेत उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. मात्र नागरिकांनी बारवेच्या पायऱ्या बुजवून चौकोनी हौदाच्या आकारासारखा आकार या बारवेचा केला आहे. शहरातील एकमेव व सुरक्षित असलेली बारव म्हणजे कावंदी बारव आहे. व्यंकटेश गार्डनच्या पाठीमागे तीन वेगवेगळ्या बारव असून, या बारवांना मोतीबाग बारव म्हणतात. तीनपैकी दोन बारवांचा उपयोग श्री. बालाजी देवस्थान योग्य रितीने घेत असून, तिसरी बारव बुजवण्याच्या मार्गावर आहे. बियाबानी दर्गा परिसरात सासू-सुनेची बारव आहे. डोंगरावर गैबीनाथ-गहीनीनाथ पीर असून हिंदू-मुस्लीम लोक येथे दर्शनासाठी जातात. या भागातील बारवेचे दगड काढण्यात आले आहेत. श्री मत्स्योदरी देवीच्या पूजेअर्चेसाठी अहिल्यादेवी होळकर यांनी पुष्पवाटिका निर्माण केली होती. या पुष्पवाटिकेतील फुलांच्या झाडांना पाणी देण्यासाठी तसेच देवीच्या स्थानासाठी शिवलिंग आकाराची दगडी बारव निर्माण केली होती. या बारवेचा आजही पुष्पवाटिकेसाठी वापर केला जातो. 

महाद्वारी बारवेची अवस्था बिकटशहरातील भाजीमंडी परिसरात महाद्वारी नावाने बारव निर्माण केलेली आहे. सध्या बारवेच्या परिसरात झाडे उगवली असून, काहींचा बारव बुजवण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या तक्रारी या भागातील नागरिक करीत आहेत. या बारवेत आजही पाणी असून केवळ आजूबाजूला उगवलेली झाडेझुडपे दूर करून कचरा काढल्यास बारव स्वच्छ होईल. बारवेला बारमाही पाणी राहत असल्याने या बारवेचा उपयोग पोहण्यासाठी केला जातो.

दुरुस्ती प्रस्ताव तयार आहेत अंबड शहरातील बारवांच्या संवर्धनासाठी शासनाकडून काही निधी मंजूर झालेला असून, या अंतर्गत बारव संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. काही बारवांची साफसफाई सुरू केली आहे. काही बारव दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. लवकरच त्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. या कामी गरजेनुसार लोकसहभागही घेतला जाणार आहे.- विक्रम मांडुरके, मुख्याधिकारी अंबड

टॅग्स :JalanaजालनाWaterपाणीhistoryइतिहास