शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दहा उमेदवारांना पडली समसमान मते; चिठ्ठीतून निवडले विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:32 IST

बदनापूर : तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींची मतमोजणी सोमवारी पूर्ण झाली. त्यात तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमधील दहा उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे ...

बदनापूर : तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींची मतमोजणी सोमवारी पूर्ण झाली. त्यात तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमधील दहा उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे पाच जणांना विजयी घोषित करण्यात आले. यात दोन सख्ख्या भावांचा समावेश होता. चिठ्ठीत लहान भावाचे नाव आल्याने त्याला विजयी करण्यात आले.

तालुक्यातील तळणी-लोधेवाडी या ग्रामपंचायतीमध्ये वाॅर्ड क्रमांक एक मध्ये लोखंडे उत्तम कचरू व लोखंडे जालिंधर कचरू हे दोन सख्खे भाऊ एकाच वाॅर्डातून वेगवेगळ्या पॅनलकडून उभे होते. या ग्रामपंचायतीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर या दोन सख्ख्या भावांना समसमान प्रत्येकी २०९ मते मिळाली. त्यानंतर या दोघांचा चिठ्ठीद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये जालिंदर कचरू लोखंडे या लहान भावाच्या नावाची चिठ्ठी निघाल्यामुळे त्यांना तहसीलदार छाया पवार यांनी विजयी घोषित केले. तसेच तालुक्यातील पिरसावंगी येथील वाॅर्ड क्रमांक तीनमधून रंजना संपत मिसाळ व सोरमारे जनाबाई भगवान या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ९७ मते मिळाली होती. चिठ्ठीद्वारे जनाबाई भगवान सोरमारे यांना विजयी घोषित करण्यात आले. शेलगाव येथील वाॅर्ड क्रमांक ४ मधून अनुसूचित जाती या प्रवर्गातून इंदूबाई अनिल आहोळ व अमोल विलास तुपे या दोन उमेदवारांना प्रत्येकी २९६ मते मिळाली. त्यामध्ये चिठ्ठीद्वारे अमोल विलास तुपे यांना विजयी घोषित करण्यात आले. दाभाडी येथील वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये अर्चना नागोराव बकाल व सुवर्णा दगडू बकाल या दोन उमेदवारांना प्रत्येकी ३८७ मते मिळाली. चिठ्ठीद्वारे अर्चना नागोराव बकाल यांना विजयी घोषित करण्यात आले. डोंगरगाव दा येथील वाॅर्ड क्रमांक एकमध्ये माधुरी नारायण खरात व लताबाई अरुण राजळे यांना प्रत्येकी १९१ मते मिळाली. चिठ्ठीद्वारे माधुरी नारायण खरात यांना विजयी घोषित करण्यात आले.

भाजप, महाविकास आघाडीचा दावा

तालुक्यातील ३९ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या असून, एकूण ३०६ सदस्य निवडून आल्याचा दावा आ. नारायण कुचे यांनी केला आहे. तर माजी आ. संतोष सांबरे यांनी या मतमोजणीत अनेक ग्रामपंचायती स्वबळावर शिवसेनेच्या ताब्यात आल्या असून, काही ठिकाणी महाविकास आघाडीसोबत सरपंच होणार आहे. या विजयामुळे ग्रामीण भागातील जनतेचा कल शिवसेना व महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचा दावा केला जात आहे.

वाहतूक विस्कळीत

मतमोजणीचे ठिकाण जालना-औरंगाबाद महामार्गावर असल्याने येथे मतमोजणीसाठी आलेले उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, पॅनलप्रमुख व अन्य समर्थकांची मोठी गर्दी होती. कृषी संशोधन केंद्रापासून ते सोमठाणा फाट्यापर्यंत या महामार्गावरील एका बाजूची वाहतूक पूर्ण बंद केली होती. त्यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.