शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

हिरव्या मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:45 IST

भोकरदन तालुक्यातील हिरव्या मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या वालसावंगी येथील बाजारपेठेत हिरव्या मिरचीला केवळ १५ रुपये भाव मिळाला.यात खर्चच अधिक झाल्याने शेतक-यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवालसावंगी : भोकरदन तालुक्यातील हिरव्या मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या वालसावंगी येथीलबाजारपेठेत हिरव्या मिरचीला केवळ १५ रुपये भाव मिळाला.यात खर्चच अधिक झाल्याने शेतक-यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.येथील बाजारपेठेपेक्षा दुस-या बाजारपेठेत अधिक भाव मिळत असल्याने व्यापारी मुद्दाम कमी भावात मिरची खरेदी करत असल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला. येथिल बाजारपेठेत दररोज ४ वाजता लिलाव पद्धतीने हराशी होते. परंतु लिलाव प्रत्येक गाड़ीचा न करता एकाच गाड़ीचा होतो व तो लिलावावर सर्वात जास्त बोली लागते.यामुळे सर्व शेतक-यांना समान भाव मिळत नसल्याचे शेतक-यांनी सांगितले. लिलाव प्रत्येक मिरची पोत्याचा झाला पाहिजे अशी शेक-यांची मागणी आहे. मिरचिचा लिलाव हा धावड़ा - वालसावंगी या मुख्य मार्गावर होत असल्याने वाहतूकीवर त्याचा परिणाम होत असल्याने हा लिलाव दुसरीकडे घ्यावा अशी वाहनधारकांची मागणी आहे.यंदा परिसरातील शेतक-यांनी मिरची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. त्यातून चांगले उत्पन्न मिळेले अशी अपेक्षा होती. मात्र, उत्पन्न तर सोडाच परंतू लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतक-यांच्या डोळ्यात आज तरी मिरचिने पाणी आणले आहे. लिलाव होतानाचा भाव हा सर्व शेतक-यांना समान मिळाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच भाव कधी वाढेल याकडे शेतक-यांचे लक्ष लागून आहे.उत्पादन खर्च अधिक होत आहे भाव कमी असल्याने परवडत नसल्याचे शेतकरी सांगतात. लिलाव पद्धतीत वेगळा भाव करतात व प्रत्यक्ष हातात कमी भाव देतात. असा भेदभाव न करता सरसकट शेतक-यांना जो भाव मिळाला तोच भाव सर्वांना द्यावा अशी मागणी येथील शेतकरी भानुदास खड़के, भगवान वाघ, राजू कोथळकर, नारायण गवळी, यांच्यासह इतर शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :vegetableभाज्याFarmerशेतकरी