शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

हिरव्या मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:45 IST

भोकरदन तालुक्यातील हिरव्या मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या वालसावंगी येथील बाजारपेठेत हिरव्या मिरचीला केवळ १५ रुपये भाव मिळाला.यात खर्चच अधिक झाल्याने शेतक-यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवालसावंगी : भोकरदन तालुक्यातील हिरव्या मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या वालसावंगी येथीलबाजारपेठेत हिरव्या मिरचीला केवळ १५ रुपये भाव मिळाला.यात खर्चच अधिक झाल्याने शेतक-यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.येथील बाजारपेठेपेक्षा दुस-या बाजारपेठेत अधिक भाव मिळत असल्याने व्यापारी मुद्दाम कमी भावात मिरची खरेदी करत असल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला. येथिल बाजारपेठेत दररोज ४ वाजता लिलाव पद्धतीने हराशी होते. परंतु लिलाव प्रत्येक गाड़ीचा न करता एकाच गाड़ीचा होतो व तो लिलावावर सर्वात जास्त बोली लागते.यामुळे सर्व शेतक-यांना समान भाव मिळत नसल्याचे शेतक-यांनी सांगितले. लिलाव प्रत्येक मिरची पोत्याचा झाला पाहिजे अशी शेक-यांची मागणी आहे. मिरचिचा लिलाव हा धावड़ा - वालसावंगी या मुख्य मार्गावर होत असल्याने वाहतूकीवर त्याचा परिणाम होत असल्याने हा लिलाव दुसरीकडे घ्यावा अशी वाहनधारकांची मागणी आहे.यंदा परिसरातील शेतक-यांनी मिरची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. त्यातून चांगले उत्पन्न मिळेले अशी अपेक्षा होती. मात्र, उत्पन्न तर सोडाच परंतू लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतक-यांच्या डोळ्यात आज तरी मिरचिने पाणी आणले आहे. लिलाव होतानाचा भाव हा सर्व शेतक-यांना समान मिळाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच भाव कधी वाढेल याकडे शेतक-यांचे लक्ष लागून आहे.उत्पादन खर्च अधिक होत आहे भाव कमी असल्याने परवडत नसल्याचे शेतकरी सांगतात. लिलाव पद्धतीत वेगळा भाव करतात व प्रत्यक्ष हातात कमी भाव देतात. असा भेदभाव न करता सरसकट शेतक-यांना जो भाव मिळाला तोच भाव सर्वांना द्यावा अशी मागणी येथील शेतकरी भानुदास खड़के, भगवान वाघ, राजू कोथळकर, नारायण गवळी, यांच्यासह इतर शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :vegetableभाज्याFarmerशेतकरी