शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

बोगस बियाणे विक्रे त्यांना धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:56 AM

येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी शासनस्तरावर व्यापक नियोजन केले जात आहे. शेतक-यांना बोगस बियाणांची विक्री करणा-या विक्रेत्यांसह उत्पादक कंपनीवर थेट कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी शासनस्तरावर व्यापक नियोजन केले जात आहे. शेतक-यांना बोगस बियाणांची विक्री करणा-या विक्रेत्यांसह उत्पादक कंपनीवर थेट कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिलेजिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात सोमवारी आयोजित खरीप हंगाम २०१८ च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीष टोपे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, पीककर्ज वाटपात गतवर्षी बँकांनी चांगले काम केले आहे. पीकविमा योजनेमध्ये जिल्हा देशात प्रथम आला. शेतक-यांना कर्ज वाटप करत असताना दलालांचा हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.पात्र व गरजू शेतक-याला पीककर्ज मिळावे व दलालांचा कुठलाही हस्तक्षेप यामध्ये होऊ नये यासाठी बँकांनी प्रत्येक शाखेमध्ये सीसीटीव्ही बसवावेत. महसूल, कृषी विभागाच्या अधिका-यांनी वेळोवेळी बँकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तपासणी करून दलालांना चाप लावावा. बँकांनी उद्दिष्टानुसार शेतक-यांना पीक कर्जाचे वाटप करावे. या कामात टाळाटाळ करणा-या बँकेविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशाराही लोणीकर यांनी दिला. येत्या खरीप हंगाता कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी गाव पातळीवर आतापासून जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या विविध योजनांबरोबच उन्हाळ्यातील पाणीटंचाई निवारणार्थ राबविण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी उपयुक्त सूचना मांडल्या तर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाची माहिती दिली. प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी पॉवर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून खरीप हंगामाची माहिती दिली. या बैठकीस कृषी विभागातील अधिकारी, विविध बँकांचे प्रतिनिधींची उपस्थिती होती.राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, शेतक-यांवर सातत्याने अनेक संकटे येत आहेत. खरीप हंगामामध्ये शेतक-यांना खते, बी-बियाणे, पतपुरवठा, मुबलक वीज मिळवणे आवश्यक असून, त्यासाठी योग्य नियोजन करावे. शासकीय योजनांबाबत ग्रामीण भागात व्यापक जनजागृती करण्यात यावी. नुकत्याच झालेल्या गारपिटीमध्ये शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव शासनास पाठविण्याचे निर्देश खोतकर यांनी यावेळी दिले.

टॅग्स :FarmerशेतकरीBabanrao Looneykarबबनराव लोणीकरagricultureशेतीArjun Khotkarअर्जुन खोतकरzpजिल्हा परिषद