शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

उद्दिष्ट ३२ हजारांचे, लाभ मात्र ९ हजार जणांनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:33 IST

माता व बालकांच्या मृत्यू दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे होत नसल्याचे दिसून येत आहे.

दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माता व बालकांच्या मृत्यू दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे होत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याला २०१७-१८ या दोन वर्षांत ३२ हजार ६५९ लाभार्थ्यांचे उद्द्ष्टि होते. परंतु, त्यापैकी फक्त ९ हजार ८६८ लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळाला.आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या स्थितीत ज्या महिला गर्भवती आहेत, त्यापैकी ५३ टक्के महिला पहिल्यांदाच गर्भवती झाल्या आहेत. या सर्व महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या पोर्टलनुसार, जिल्ह्याला जानेवारी २०१७ ते दिसेंबर २०१८ अखेरपर्यंत ३२ हजार ६५९ महिलांना या योजनेचा लाभ द्याचा होता. परंतु, ९ हजार ८६८ महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला.टप्प्याने मिळतो लाभगर्भवती महिलेने गर्भावस्थेत स्वत: ची काळजी घ्यावी, पौष्टिक आहार मिळावा या उद्देशातून टप्याटप्याने लाभ देण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जाती, अनूसूचित जमाती, बीपीएल अशी अट ठेवण्यात आली आहे. पहिल्या बाळाच्या वेळी नोकरपेशातील, अंगणवाडी सेविका, सहायिका, आशा यांना लाभ देण्यात येतो. लाभार्थ्यांच्या बँक, डाक खात्यात हा लाभ जमा केला जातो.यासाठी लाभार्थ्यांचा खाते क्रमांक व आधार क्रमांक आवश्यक आहे. गर्भवतीच्या नोंदणीच्यावेळी १ हजार रुपये तर सहा महिने पूर्ण झाल्यावर २ हजार रुपये देण्यात येते. प्रसूतीनंतर बाळाची जन्म नोंदणी व पेंटावैलेट-३ दिल्यानंतर १४ आठवडे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात २ हजार रुपये देण्यात येते.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाHealthआरोग्य