शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
5
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
6
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
7
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
9
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
10
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
11
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
12
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
13
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
14
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
15
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
16
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
17
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
18
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
19
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
20
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

उद्दिष्ट ३२ हजारांचे, लाभ मात्र ९ हजार जणांनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:33 IST

माता व बालकांच्या मृत्यू दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे होत नसल्याचे दिसून येत आहे.

दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माता व बालकांच्या मृत्यू दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे होत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याला २०१७-१८ या दोन वर्षांत ३२ हजार ६५९ लाभार्थ्यांचे उद्द्ष्टि होते. परंतु, त्यापैकी फक्त ९ हजार ८६८ लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळाला.आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या स्थितीत ज्या महिला गर्भवती आहेत, त्यापैकी ५३ टक्के महिला पहिल्यांदाच गर्भवती झाल्या आहेत. या सर्व महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या पोर्टलनुसार, जिल्ह्याला जानेवारी २०१७ ते दिसेंबर २०१८ अखेरपर्यंत ३२ हजार ६५९ महिलांना या योजनेचा लाभ द्याचा होता. परंतु, ९ हजार ८६८ महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला.टप्प्याने मिळतो लाभगर्भवती महिलेने गर्भावस्थेत स्वत: ची काळजी घ्यावी, पौष्टिक आहार मिळावा या उद्देशातून टप्याटप्याने लाभ देण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जाती, अनूसूचित जमाती, बीपीएल अशी अट ठेवण्यात आली आहे. पहिल्या बाळाच्या वेळी नोकरपेशातील, अंगणवाडी सेविका, सहायिका, आशा यांना लाभ देण्यात येतो. लाभार्थ्यांच्या बँक, डाक खात्यात हा लाभ जमा केला जातो.यासाठी लाभार्थ्यांचा खाते क्रमांक व आधार क्रमांक आवश्यक आहे. गर्भवतीच्या नोंदणीच्यावेळी १ हजार रुपये तर सहा महिने पूर्ण झाल्यावर २ हजार रुपये देण्यात येते. प्रसूतीनंतर बाळाची जन्म नोंदणी व पेंटावैलेट-३ दिल्यानंतर १४ आठवडे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात २ हजार रुपये देण्यात येते.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाHealthआरोग्य