शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

आतापासूनच टँकरचा आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:34 IST

भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात जोरदार पाऊस न पडल्याने चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात जोरदार पाऊस न पडल्याने चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे. त्यामुळे परिसरातील पंधरा गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलसंकटाच्या भीतीने ग्रामस्थांत चिंंता पसरली आहे. सर्वसामान्यांचे डोळे परतीच्या पावसाकडे लागले आहेत.चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्पातून परिसरातील राजूरेश्वर मंदिर, राजूर, बाणेगाव, चांधई एक्को, चांधई ठोंबरी, चांधई टेपली, लोणगाव, पळसखेडा ठोंबरी, चिंचोली निपाणी, खामखेडा इ. पंधरा गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच राजूरला दर्शनासाठी येणाऱ्या भावि कांची तहान भागविली जाते. परंंंतु यावर्षी एकही जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतक-यांची खरीप हंगामातील पिके वाया गेली असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे संभाव्य पाणी समस्येचे सावट उभे राहिले आहे. राजूरसाठी नव्याने टंचाईग्रस्त योजनेअंतर्गत बाणेगाव मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सध्या पावसाळा असूनही प्रभागनिहाय चार दिवसांआड राजूरकरांना पाणी मिळत आहे. पावसाळ्यात चार दिवसानंतर पाणी मिळत असताना संभाव्य हिवाळा, उन्हाळ्यात काय परिस्थिती राहील, याची चिंंता ग्रामस्थांना सतावत आहे. सध्या राजूरकरांची तहान खाजगी टँकरवर सर्वाधिक भागवली जात आहे. पाणी समस्येची तीव्रता आणि ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन खाजगी टँकर चालकांनी पाण्याचे दर वाढवल्याने सर्वसामान्य जनता आर्थिक कोेंडीत सापडली आहे. येथे बहुतांश नागरिक मोल मजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह भागवतात परंतु त्यांना निम्मी मजुरी पाण्यासाठी खर्चावी लागत असल्याने नागरिकांत संताप आहे. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांची वाट लागल्याने मजुरांना रोजगार मिळणे अवघड होऊन बसले आहे. चांधई एक्को प्रकल्पात २० ते २५ टक्के जलसाठा आहे. प्रकल्पाची पाळू उघडी आहे. वाढत्या उन्हाची तीव्रता बघता जोत्याखाली असलेली पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणी पातळीत घटली आहे.तसेच होत असलेला अवैध पाणी उपसा थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाईmonsoon 2018मान्सून 2018