शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आतापासूनच टँकरचा आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:34 IST

भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात जोरदार पाऊस न पडल्याने चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात जोरदार पाऊस न पडल्याने चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे. त्यामुळे परिसरातील पंधरा गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलसंकटाच्या भीतीने ग्रामस्थांत चिंंता पसरली आहे. सर्वसामान्यांचे डोळे परतीच्या पावसाकडे लागले आहेत.चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्पातून परिसरातील राजूरेश्वर मंदिर, राजूर, बाणेगाव, चांधई एक्को, चांधई ठोंबरी, चांधई टेपली, लोणगाव, पळसखेडा ठोंबरी, चिंचोली निपाणी, खामखेडा इ. पंधरा गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच राजूरला दर्शनासाठी येणाऱ्या भावि कांची तहान भागविली जाते. परंंंतु यावर्षी एकही जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतक-यांची खरीप हंगामातील पिके वाया गेली असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे संभाव्य पाणी समस्येचे सावट उभे राहिले आहे. राजूरसाठी नव्याने टंचाईग्रस्त योजनेअंतर्गत बाणेगाव मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सध्या पावसाळा असूनही प्रभागनिहाय चार दिवसांआड राजूरकरांना पाणी मिळत आहे. पावसाळ्यात चार दिवसानंतर पाणी मिळत असताना संभाव्य हिवाळा, उन्हाळ्यात काय परिस्थिती राहील, याची चिंंता ग्रामस्थांना सतावत आहे. सध्या राजूरकरांची तहान खाजगी टँकरवर सर्वाधिक भागवली जात आहे. पाणी समस्येची तीव्रता आणि ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन खाजगी टँकर चालकांनी पाण्याचे दर वाढवल्याने सर्वसामान्य जनता आर्थिक कोेंडीत सापडली आहे. येथे बहुतांश नागरिक मोल मजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह भागवतात परंतु त्यांना निम्मी मजुरी पाण्यासाठी खर्चावी लागत असल्याने नागरिकांत संताप आहे. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांची वाट लागल्याने मजुरांना रोजगार मिळणे अवघड होऊन बसले आहे. चांधई एक्को प्रकल्पात २० ते २५ टक्के जलसाठा आहे. प्रकल्पाची पाळू उघडी आहे. वाढत्या उन्हाची तीव्रता बघता जोत्याखाली असलेली पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणी पातळीत घटली आहे.तसेच होत असलेला अवैध पाणी उपसा थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाईmonsoon 2018मान्सून 2018