शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

‘एसडीएम’कडे टँकरचे अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:42 IST

शासनाने आता टँकर सुरू करण्याच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात आल्याने टंचाईवर लवकर मात करणे शक्य होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकर सुरू करण्यासाठीचा प्रत्येक प्रस्ताव हा पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी जात होता. परंतु यामुळे टँकर सुरू होण्यास बराच उशीर होत होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने आता टँकर सुरू करण्याच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात आल्याने यातून टंचाईवर लवकर मात करणे शक्य होणार आहे.जालना जिल्ह्यातील जवळपास बहुतांश गावात यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने पाणीटंचाईच्या झळा ऐन हिवाळ्यातच जाणवत आहेत. सद्यस्थितीत जालना जिल्ह्यात ६५ पेक्षा अधिक टँकर सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात जालना, भोकरदन, अंबड तसेच परतूर येथे महसूलचे चार उपविभागीय अधिकारी आहेत. आता ज्या गावात टँकर सुरू करायचे आहेत, तेथील ग्रामपंचायतीने ठराव घेऊन तो प्रस्ताव उपविभागीय अधिका-यांकडे पाठवायचे आहे. हे प्रस्ताव आल्यानंतर साधारणपणे तीन दिवसात टँकर सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी तहसील दारांनाही टँकरचे अधिकार दिले होते.जिल्ह्यातील गावांना पाणीपुरवठा करणाºया एजन्सीला टँकर लावताना त्यावर जीपीएस प्रणाली कार्यान्वित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, हे केवळ टेंडरमध्येच असते. प्रत्यक्षात जीपीएस प्रणाली कार्यान्वित नसल्याचे दिसून आले.जालना : टँंकरची संख्या २०० वर जाणारजालना जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत. हे लक्षात घेऊन प्रशासनाने ११ कोटी रूपयांचा पाणीपुरवठा आराखडा तयार केला आहे. त्याला मंजुरी दिली असून, त्यातून मागेल तेथे टँकर देण्यात येणार आहेत. यंदा टँकर २०० वर जातील.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईGovernmentसरकारdroughtदुष्काळ