शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मण समाजाचे ताम्हण-पळी बजाव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:32 IST

फोटो जालना : शासन-प्रशासन दरबारी दुर्लक्षित असलेल्या ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने आंदोलने सुरू आहेत. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले ...

फोटो

जालना : शासन-प्रशासन दरबारी दुर्लक्षित असलेल्या ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने आंदोलने सुरू आहेत. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत आणि शासनाला जागे करण्यासाठी ब्राह्मण समाजाच्या वतीने सोमवारी गांधी चमन येथे ताम्हण-पळी बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी जय परशुरामच्या गजराने परिसर दणाणून गेला होता.

ब्राह्मण समाजाचे अनेक प्रश्न शासन-प्रशासन दरबारी प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य करून समाजाला न्याय द्यावा, यासाठी समाजाच्या वतीने वेळोवेळी लोकशाही मार्गाने तहसील, जिल्हाधिकारी, आयुक्त कार्यालयासमोर आंदोलने करण्यात आली. मुंबईच्या आझाद मैदानावर महाधरणे करून तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन समस्या मांडल्या, परंतु त्यांनीही दुर्लक्ष केले. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर, २०२० या दोन महिन्यांत राज्यातील आजी- माजी मंत्री, खासदार, आमदार या सर्व लोकप्रतिनिधींना प्रलंबित मागण्यांचे स्मरणपत्र देऊन हिवाळी अधिवेशनात समाजाच्या मागण्यांचा विचार करून ठोस निर्णय घेण्याची विनंती केली, परंतु सरकारने यावर कसलाच निर्णय न घेतल्याने १ ते २२ जानेवारीपर्यंत राज्यातील तहसील, जिल्हाधिकारी, आयुक्त कार्यालयासमोर ताम्हण-पळी वाजवून जागो सरकार जागोचा नारा समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने दिला आहे.

जालना येथील आंदोलनात ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे दीपक रणनवरे यांच्यासह विलास नाईक, भाजपाचे जिल्हा संघटक सिद्धिविनायक मुळे, आर. आर. जोशी, संजय देशपांडे, अमित कुलकर्णी, अनंत वाघमारे, शशिकांत दाभाडकर, सुमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, सुनील जोशी, मधुसूदन दंडारे, विनोद कुलकर्णी, भाजप सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष शुभांगी देशपांडे, सुलभा कुलकर्णी, अर्पणा राजे, दीपाली बिन्नीवाले, शालिनी पुराणिक, संपदा कुलकर्णी, कलाशिक्षक संतोष जोशी, आनंदी अय्यर, मुकुंद कुलकर्णी, कृष्णा दंडे, रमाकांत धर्माधिकारी, सुजाता कुलकर्णी, कल्याणी कुलकर्णी, भारती रणनवरे आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न लावून धरू

या आंदोलन स्थळाला माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठीही अनेक प्रयत्न केले. काही तांत्रिक कारणांमुळे ते प्रलंबितच राहिले. आताही महामंडळासह जे काही प्रश्न, मागण्या असतील, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करू, अशी ग्वाही खोतकर यांनी दिली.