शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई दूर करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:37 IST

लवकरच शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देसंगीता गोरंट्याल : शहरवासियांना आठवड्यातून दोनवेळा पाणी देण्याचे नियोजन

जालना : जालना शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी नगर परिषद प्रशासनातर्फे सवोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. वॉल्व्ह दुरुस्ती, मोठ्या प्रमाणात सुरु असलेली गळती दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून लवकरच शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे.जालना शहरातील नवीन जालना भागासाठी घाणेवाडी जलाशयातून पाणी पुरवठा केला जात होता. मात्र घाणेवाडी जलाशयाने तळ गाठल्यामुळे या जलाशयातून नवीन जालना भागाला केला जाणारा पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे नवीन जालना भागाला देखील जायकवाडी- जालना या पाणी पुरवठा योजनेव्दारेच पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच या योजनेवरील वॉल्व्ह विविध ठिकाणी फोडून पाणी चोरण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढले होते. शिवाय काही ठिकाणी जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर माजी आ. कैलास गोरंट्याल, मुख्याधिकारी संतोष खांडेकर व आपण स्वत: जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून हा सर्व प्रकार त्यांच्या कानावर टाकला. त्यानंतर पाचोड ते दावरवाडी दरम्यान मोठ्या प्रमाणात सुरु असलेली पाणी चोरी रोखण्यात यश आले आहे. अंबड येथील २४ एमएलडी क्षमतेच्या जलशुध्दीकरण केंद्रातून जालना शहराला मागील काही दिवसापर्यंत केवळ सहा एमएलडीच पाणी पुरवठा होत होता. आता जवळपास पंधरा ते सोळा एमएलडी पाणी पुरवठा शहराला होत असून अंबड जलशुध्दीकरण केंद्रात बंद अवस्थेत असलेले पंधरा एमएलडी क्षमतेचे दुसरे जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वीत करण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनातर्फे युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. हे जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वीत झाल्यानंतर जालना शहराला जायकवाडी- जालना या योजनेव्दारे जवळपास ३५ ते ४० एमएलडी पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे जालना शहरवासियांना आठ आठवाड्यातून दोन वेळा पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषदwater shortageपाणीटंचाई