शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

टंचाई दूर करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:37 IST

लवकरच शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देसंगीता गोरंट्याल : शहरवासियांना आठवड्यातून दोनवेळा पाणी देण्याचे नियोजन

जालना : जालना शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी नगर परिषद प्रशासनातर्फे सवोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. वॉल्व्ह दुरुस्ती, मोठ्या प्रमाणात सुरु असलेली गळती दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून लवकरच शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे.जालना शहरातील नवीन जालना भागासाठी घाणेवाडी जलाशयातून पाणी पुरवठा केला जात होता. मात्र घाणेवाडी जलाशयाने तळ गाठल्यामुळे या जलाशयातून नवीन जालना भागाला केला जाणारा पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे नवीन जालना भागाला देखील जायकवाडी- जालना या पाणी पुरवठा योजनेव्दारेच पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच या योजनेवरील वॉल्व्ह विविध ठिकाणी फोडून पाणी चोरण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढले होते. शिवाय काही ठिकाणी जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर माजी आ. कैलास गोरंट्याल, मुख्याधिकारी संतोष खांडेकर व आपण स्वत: जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून हा सर्व प्रकार त्यांच्या कानावर टाकला. त्यानंतर पाचोड ते दावरवाडी दरम्यान मोठ्या प्रमाणात सुरु असलेली पाणी चोरी रोखण्यात यश आले आहे. अंबड येथील २४ एमएलडी क्षमतेच्या जलशुध्दीकरण केंद्रातून जालना शहराला मागील काही दिवसापर्यंत केवळ सहा एमएलडीच पाणी पुरवठा होत होता. आता जवळपास पंधरा ते सोळा एमएलडी पाणी पुरवठा शहराला होत असून अंबड जलशुध्दीकरण केंद्रात बंद अवस्थेत असलेले पंधरा एमएलडी क्षमतेचे दुसरे जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वीत करण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनातर्फे युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. हे जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वीत झाल्यानंतर जालना शहराला जायकवाडी- जालना या योजनेव्दारे जवळपास ३५ ते ४० एमएलडी पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे जालना शहरवासियांना आठ आठवाड्यातून दोन वेळा पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषदwater shortageपाणीटंचाई