शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

टंचाई दूर करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:37 IST

लवकरच शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देसंगीता गोरंट्याल : शहरवासियांना आठवड्यातून दोनवेळा पाणी देण्याचे नियोजन

जालना : जालना शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी नगर परिषद प्रशासनातर्फे सवोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. वॉल्व्ह दुरुस्ती, मोठ्या प्रमाणात सुरु असलेली गळती दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून लवकरच शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे.जालना शहरातील नवीन जालना भागासाठी घाणेवाडी जलाशयातून पाणी पुरवठा केला जात होता. मात्र घाणेवाडी जलाशयाने तळ गाठल्यामुळे या जलाशयातून नवीन जालना भागाला केला जाणारा पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे नवीन जालना भागाला देखील जायकवाडी- जालना या पाणी पुरवठा योजनेव्दारेच पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच या योजनेवरील वॉल्व्ह विविध ठिकाणी फोडून पाणी चोरण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढले होते. शिवाय काही ठिकाणी जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर माजी आ. कैलास गोरंट्याल, मुख्याधिकारी संतोष खांडेकर व आपण स्वत: जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून हा सर्व प्रकार त्यांच्या कानावर टाकला. त्यानंतर पाचोड ते दावरवाडी दरम्यान मोठ्या प्रमाणात सुरु असलेली पाणी चोरी रोखण्यात यश आले आहे. अंबड येथील २४ एमएलडी क्षमतेच्या जलशुध्दीकरण केंद्रातून जालना शहराला मागील काही दिवसापर्यंत केवळ सहा एमएलडीच पाणी पुरवठा होत होता. आता जवळपास पंधरा ते सोळा एमएलडी पाणी पुरवठा शहराला होत असून अंबड जलशुध्दीकरण केंद्रात बंद अवस्थेत असलेले पंधरा एमएलडी क्षमतेचे दुसरे जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वीत करण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनातर्फे युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. हे जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वीत झाल्यानंतर जालना शहराला जायकवाडी- जालना या योजनेव्दारे जवळपास ३५ ते ४० एमएलडी पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे जालना शहरवासियांना आठ आठवाड्यातून दोन वेळा पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषदwater shortageपाणीटंचाई