शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"जरांगेंचा दृष्टीकोण अन् आमचे उदिष्ट्य एकच"; संभाजीराजे छत्रपतींनी विधानसभेबाबत दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 23:43 IST

संभाजीराजे छत्रपती आणि मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात बुधवारी तब्बत तीन तास चर्चा झाली.

वडीगोद्री (जालना):  मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीवरुन सत्ताधारी पक्षांना इशारा दिला आहे. सरकारने आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आपण विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करु आणि महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करु, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी येथे आले होते. त्यांच्यात तीन तास चर्चा झाली. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे भेटीत काय चर्चा झाली हे सांगितले.

"मनोज जरांगेंची तब्येत बिघडल्यानं इथं आलो होतो. या भेटीत राजकीय चर्चा झाली आहे. मनोज जरांगे यांचं कौतुक करावसं वाटलं होतं. अनेक वर्षांपासून मनोज जरांगे यांना ओळखतो. जरांगे यांना नेहमी सपोर्ट करण्याची भूमिका आहे. वेळ भरपूर होता त्यामुळं चांगली चर्चा झाली आहे. एक मोठं एवढं साम्राज्य उभं केलं म्हणून शाबासकी देण्यासाठी आलो आहे. मनमोकळ्या मनाने चर्चा झाली आणि मला त्यांनी तब्येतीची काळजी घेणार असा शब्द दिला आहे," असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं.

बहुतांश सगळ्या मागण्या सारख्या आहेत. सरकरनं स्पष्ट बोलायला पाहिजे होतं की दहा टक्के आरक्षण कसं टिकणार तीन तास बसून चांगली चर्चा झालीये. सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. शेवटी २९ तारखेला तेच भूमिका स्पष्ट करणार आहेत. सगळे आपआपलं स्वतंत्र आहेत. मनोज जरांगे पाटील यांचा दृष्टीकोण अन् आमचं उदिष्ट्य एक त्यामुळे आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकत्र येऊन लढा द्यायचा की नाही याबाबत प्राथमिक सकारात्मक चर्चा झाली आहे, असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

सरकार विरोधात जरांगे पाटील बोलायला खंबीर आहेत. राजू शेट्टी यांची अजून भेट झाली नाही. ते आमच्याच कोल्हापूरचे आहेत असेही  संभाजीराजे छत्रपती म्हणाले. संभाजीराजेंच्या भेटीवर बोलताना जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा आणि राजकारणाचा भाग वेगळा असल्याचे म्हटलं आहे.

"थोडी फार चर्चा झाली आहे. गादीचा सन्मान करत आलो आहोत. राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसतात हे शिकलो आहे आंदोलनाचा आणि राजकारणाचा भाग वेगवेगळा आहे. जर २९ तारखेला ठरलं तर गरजवंत समाजाच्या प्रश्नाकरिता लढा असणार आहे. समीकरणं बघतोय कसं चाललंय. मला समाजाचा विचार घ्यायचा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावायचे मला न्याय द्यायचा आहे. समाज मालक आहे समाजाला विचारून निर्णय घ्यायचा आहे," असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती