शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

दुष्काळात विद्यार्थ्यांना मिळाला शिक्षणासाठी आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:28 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी श्रमदानातून उभा केलेल्या वडीगोद्री येथील आश्रमामुळे शेतकऱ्यांच्या व अनाथ मुलांना दुष्काळी परिस्थितीत शिक्षणासाठी आधार मिळाला आहे.

राजू छल्लारे ।लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी श्रमदानातून उभा केलेल्या वडीगोद्री येथील आश्रमामुळे शेतकऱ्यांच्या व अनाथ मुलांना दुष्काळी परिस्थितीत शिक्षणासाठी आधार मिळाला आहे. यामुळे सद्य:स्थितीत अंबड, घनसावंगी व गेवराई तालुक्यातील ६७ विद्यार्थी ज्ञानार्जन करित आहेत.सर्व धर्माच्या मुलांना आपलं जीवन सुसंस्कारीत घडविता यावे, यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय व्हावी, या हेतूने अखिल भारतीय श्री. गुरूदेव सेवामंडळ गुरूवकुंज आश्रम (जिल्हा, अमरावती) अंतर्गत येथे श्री. गुरूदेव सेवाश्रमाची स्थापना सन १९६३ मध्ये करण्यात आली होती.भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, तत्कालीन गृहमंत्री गुलजारीलाल नंदा, विनोबा भावे, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, पाचलेंगावकर महाराज अशा अनेक थोर मंडळींनी या आश्रमाला भेटी दिल्या आहेत. या आश्रमामधील मुलांची नियमित सकाळी ध्यान साधना करणे, सूर्य नमस्कार, सामुदायिक प्रार्थना, योगासने, मल्लखांब अशी दिनचर्या ठरलेली आहे.राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाची मान्यता ५२ विद्यार्थ्यांची आहे. पण, सद्या स्थितीत दुष्काळी परिस्थितीमुळे येथे ६७ विद्यार्थी रहात आहेत. यात गरजूवंत, शेतकरी, अनाथ आदी मुलांचा समावेश आहे. याविद्यार्थ्यांना दररोज शिक्षण देण्यात येते.मात्र, ५५ वर्षांपूर्वी या आश्रमाचे बांधकाम करण्यात आले असल्याने यातील काही खोल्या जिर्ण झाल्या आहेत. सद्या स्थितीत खोल्यांची दुरूस्ती करण्यासाठी संस्थेकडे आर्थिक बजेट नसल्याने दानशूर व्यक्तींनी यास सढळ हाताने मदत करावी, तसेच या तिर्थक्षेत्राचा विकास आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी होत आहे. आश्रमाची दुरुवस्था झाल्याने याकडे प्रशासनानेही लक्ष देण्याची गरज आहे. दुष्काळात शेतक-यांच्या व अनाथ मुलांना राहण्याची सोय होत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजEducationशिक्षण