शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

दुष्काळात विद्यार्थ्यांना मिळाला शिक्षणासाठी आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:28 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी श्रमदानातून उभा केलेल्या वडीगोद्री येथील आश्रमामुळे शेतकऱ्यांच्या व अनाथ मुलांना दुष्काळी परिस्थितीत शिक्षणासाठी आधार मिळाला आहे.

राजू छल्लारे ।लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी श्रमदानातून उभा केलेल्या वडीगोद्री येथील आश्रमामुळे शेतकऱ्यांच्या व अनाथ मुलांना दुष्काळी परिस्थितीत शिक्षणासाठी आधार मिळाला आहे. यामुळे सद्य:स्थितीत अंबड, घनसावंगी व गेवराई तालुक्यातील ६७ विद्यार्थी ज्ञानार्जन करित आहेत.सर्व धर्माच्या मुलांना आपलं जीवन सुसंस्कारीत घडविता यावे, यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय व्हावी, या हेतूने अखिल भारतीय श्री. गुरूदेव सेवामंडळ गुरूवकुंज आश्रम (जिल्हा, अमरावती) अंतर्गत येथे श्री. गुरूदेव सेवाश्रमाची स्थापना सन १९६३ मध्ये करण्यात आली होती.भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, तत्कालीन गृहमंत्री गुलजारीलाल नंदा, विनोबा भावे, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, पाचलेंगावकर महाराज अशा अनेक थोर मंडळींनी या आश्रमाला भेटी दिल्या आहेत. या आश्रमामधील मुलांची नियमित सकाळी ध्यान साधना करणे, सूर्य नमस्कार, सामुदायिक प्रार्थना, योगासने, मल्लखांब अशी दिनचर्या ठरलेली आहे.राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाची मान्यता ५२ विद्यार्थ्यांची आहे. पण, सद्या स्थितीत दुष्काळी परिस्थितीमुळे येथे ६७ विद्यार्थी रहात आहेत. यात गरजूवंत, शेतकरी, अनाथ आदी मुलांचा समावेश आहे. याविद्यार्थ्यांना दररोज शिक्षण देण्यात येते.मात्र, ५५ वर्षांपूर्वी या आश्रमाचे बांधकाम करण्यात आले असल्याने यातील काही खोल्या जिर्ण झाल्या आहेत. सद्या स्थितीत खोल्यांची दुरूस्ती करण्यासाठी संस्थेकडे आर्थिक बजेट नसल्याने दानशूर व्यक्तींनी यास सढळ हाताने मदत करावी, तसेच या तिर्थक्षेत्राचा विकास आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी होत आहे. आश्रमाची दुरुवस्था झाल्याने याकडे प्रशासनानेही लक्ष देण्याची गरज आहे. दुष्काळात शेतक-यांच्या व अनाथ मुलांना राहण्याची सोय होत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजEducationशिक्षण