शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

दुष्काळात विद्यार्थ्यांना मिळाला शिक्षणासाठी आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:28 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी श्रमदानातून उभा केलेल्या वडीगोद्री येथील आश्रमामुळे शेतकऱ्यांच्या व अनाथ मुलांना दुष्काळी परिस्थितीत शिक्षणासाठी आधार मिळाला आहे.

राजू छल्लारे ।लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी श्रमदानातून उभा केलेल्या वडीगोद्री येथील आश्रमामुळे शेतकऱ्यांच्या व अनाथ मुलांना दुष्काळी परिस्थितीत शिक्षणासाठी आधार मिळाला आहे. यामुळे सद्य:स्थितीत अंबड, घनसावंगी व गेवराई तालुक्यातील ६७ विद्यार्थी ज्ञानार्जन करित आहेत.सर्व धर्माच्या मुलांना आपलं जीवन सुसंस्कारीत घडविता यावे, यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय व्हावी, या हेतूने अखिल भारतीय श्री. गुरूदेव सेवामंडळ गुरूवकुंज आश्रम (जिल्हा, अमरावती) अंतर्गत येथे श्री. गुरूदेव सेवाश्रमाची स्थापना सन १९६३ मध्ये करण्यात आली होती.भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, तत्कालीन गृहमंत्री गुलजारीलाल नंदा, विनोबा भावे, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, पाचलेंगावकर महाराज अशा अनेक थोर मंडळींनी या आश्रमाला भेटी दिल्या आहेत. या आश्रमामधील मुलांची नियमित सकाळी ध्यान साधना करणे, सूर्य नमस्कार, सामुदायिक प्रार्थना, योगासने, मल्लखांब अशी दिनचर्या ठरलेली आहे.राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाची मान्यता ५२ विद्यार्थ्यांची आहे. पण, सद्या स्थितीत दुष्काळी परिस्थितीमुळे येथे ६७ विद्यार्थी रहात आहेत. यात गरजूवंत, शेतकरी, अनाथ आदी मुलांचा समावेश आहे. याविद्यार्थ्यांना दररोज शिक्षण देण्यात येते.मात्र, ५५ वर्षांपूर्वी या आश्रमाचे बांधकाम करण्यात आले असल्याने यातील काही खोल्या जिर्ण झाल्या आहेत. सद्या स्थितीत खोल्यांची दुरूस्ती करण्यासाठी संस्थेकडे आर्थिक बजेट नसल्याने दानशूर व्यक्तींनी यास सढळ हाताने मदत करावी, तसेच या तिर्थक्षेत्राचा विकास आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी होत आहे. आश्रमाची दुरुवस्था झाल्याने याकडे प्रशासनानेही लक्ष देण्याची गरज आहे. दुष्काळात शेतक-यांच्या व अनाथ मुलांना राहण्याची सोय होत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजEducationशिक्षण