शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

९० हजार ग्रामस्थांना ४६ टँकरचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 23:11 IST

सप्टेंबरच्या अखेरीसही तालुक्यातील ३१ गावांना ४६ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळा शेवटच्या टप्प्यात असला तरी जालना तालुक्यात मोठा पाऊस झालेला नाही. परिणामी सप्टेंबरच्या अखेरीसही तालुक्यातील ३१ गावांना ४६ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या टँकरद्वारे ९० हजार २२२ ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.जालना तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ६८६.२० मिमी इतकी आहे. आजवर वार्षिक सरासरीच्या ६२४.७९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असून, तालुक्यात आजवर ४०७.३२ मिमी म्हणजे ५९.३६ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तालुक्यातील प्रकल्पांची तहान कायम आहे. परिणामी ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न आजही कायम आहे. परतीच्या पावसाने तालुकावासियांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, प्रकल्प भरण्यासारखे मोठे पाऊस अद्यापही झालेले नाहीत. परिणामी जिल्ह्यातील ३१ गावांना व ८ वाड्यांना ४५ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तर टँकरसाठी ३१ अधिग्रहणे व इतर गावांसाठी ३ अधिग्रहणे अशी एकूण ३४ अधिग्रहणे तालुक्यातील गावा-गावात करण्यात आली आहेत. तालुक्यातील नेर, सारवाडी शेवगा, पिरकल्याण, मानेगाव खालसा, उटवद, हास्ते पिंपळगाव, घेंटुळी, पारेगाव, नंदापूर, पिंपरी डुकरी, टाकरवन, हिवरा रोषणगाव, कोळवाडी, हिवर्डा, बठाण, एरंडवडगाव, चितळी पुतळी, वडगाव, दरेगाव, साळेगाव नेर, वाघु्रळ जहागीर, लोंठेवाढी, कुंबेफळ सिंदखेड या गावांसह वाड्यांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे.केवळ एक शासकीय टँकरतालुक्यात मंजूर असलेल्या ४६ पैकी केवळ १ शासकीय टँकर पाणीपुरवठ्यासाठी धावत आहे. इतर सर्व टँकर खासगी आहेत. त्यात मंजूर १२३ पैकी केवळ ६६ खेपा होत आहेत. तर ५७ खेपा कमी होत आहेत. सरासरी हे प्रमाण असून, पाण्याची टंचाई, विजेचा प्रश्न, इतर तांत्रिक अडचणींमुळे या खेपा कमी होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.ग्रामीण भागातील अवस्था बिकटजालना शहरासह ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक गावातून टँकर, अधिग्रहणाची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे. तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून, स्वत:च्या शेतातून गावा-गावाला पाणीपुरवठा केला आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ