शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

९० हजार ग्रामस्थांना ४६ टँकरचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 23:11 IST

सप्टेंबरच्या अखेरीसही तालुक्यातील ३१ गावांना ४६ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळा शेवटच्या टप्प्यात असला तरी जालना तालुक्यात मोठा पाऊस झालेला नाही. परिणामी सप्टेंबरच्या अखेरीसही तालुक्यातील ३१ गावांना ४६ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या टँकरद्वारे ९० हजार २२२ ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.जालना तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ६८६.२० मिमी इतकी आहे. आजवर वार्षिक सरासरीच्या ६२४.७९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असून, तालुक्यात आजवर ४०७.३२ मिमी म्हणजे ५९.३६ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तालुक्यातील प्रकल्पांची तहान कायम आहे. परिणामी ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न आजही कायम आहे. परतीच्या पावसाने तालुकावासियांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, प्रकल्प भरण्यासारखे मोठे पाऊस अद्यापही झालेले नाहीत. परिणामी जिल्ह्यातील ३१ गावांना व ८ वाड्यांना ४५ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तर टँकरसाठी ३१ अधिग्रहणे व इतर गावांसाठी ३ अधिग्रहणे अशी एकूण ३४ अधिग्रहणे तालुक्यातील गावा-गावात करण्यात आली आहेत. तालुक्यातील नेर, सारवाडी शेवगा, पिरकल्याण, मानेगाव खालसा, उटवद, हास्ते पिंपळगाव, घेंटुळी, पारेगाव, नंदापूर, पिंपरी डुकरी, टाकरवन, हिवरा रोषणगाव, कोळवाडी, हिवर्डा, बठाण, एरंडवडगाव, चितळी पुतळी, वडगाव, दरेगाव, साळेगाव नेर, वाघु्रळ जहागीर, लोंठेवाढी, कुंबेफळ सिंदखेड या गावांसह वाड्यांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे.केवळ एक शासकीय टँकरतालुक्यात मंजूर असलेल्या ४६ पैकी केवळ १ शासकीय टँकर पाणीपुरवठ्यासाठी धावत आहे. इतर सर्व टँकर खासगी आहेत. त्यात मंजूर १२३ पैकी केवळ ६६ खेपा होत आहेत. तर ५७ खेपा कमी होत आहेत. सरासरी हे प्रमाण असून, पाण्याची टंचाई, विजेचा प्रश्न, इतर तांत्रिक अडचणींमुळे या खेपा कमी होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.ग्रामीण भागातील अवस्था बिकटजालना शहरासह ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक गावातून टँकर, अधिग्रहणाची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे. तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून, स्वत:च्या शेतातून गावा-गावाला पाणीपुरवठा केला आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ