शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा; रूई येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:49 IST

अंबड तालुक्यातील रुई येथे सुरू असलेल्या टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील रुई येथे सुरू असलेल्या टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांनी तक्रारीद्वारे ही बाब पंचायत समितीच्या निदर्शनास आणून दिली. तक्रारीनुसार पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करीत गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.रुई येथे सद्यस्थितीत अधिकृत अधिग्रहण करण्यात आलेल्या विहिरीऐवजी बसस्थानकापासून अर्धा किलोमीटर अंतरावरून पैठण डाव्या कालव्यातील साचलेले पाणी गावात खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा दूषित पाणी पुरवठा तात्काळ बंद करून पिण्यायोग्य व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर पंचांसमक्ष पंचायत समितीचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे एस. ए. जाधव यांनी सकाळी पंचनामा केला. दूषित पाण्यामुळे साथरोग पसरण्याची भिती आहे. गावात अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ताबडतोब कार्यवाही करून ग्रामपंचायतने अधिग्रहण केलेल्या विहिरीतूनच शुद्ध पाण्याचा टँकरद्वारे गावाला पुरवावा, असे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. पंचनाम्यावर एकनाथ पटेकर, ईश्वर धाईत, शरद मुळे, कृष्णा खंडरे, तात्यासाहेब राजगुरू, संजय लहामगे आदींची स्वाक्षरी आहे. दरम्यान, पंचायत समितीच्या पुढील भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणHealthआरोग्यpanchayat samitiपंचायत समिती