शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा; रूई येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:49 IST

अंबड तालुक्यातील रुई येथे सुरू असलेल्या टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील रुई येथे सुरू असलेल्या टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांनी तक्रारीद्वारे ही बाब पंचायत समितीच्या निदर्शनास आणून दिली. तक्रारीनुसार पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करीत गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.रुई येथे सद्यस्थितीत अधिकृत अधिग्रहण करण्यात आलेल्या विहिरीऐवजी बसस्थानकापासून अर्धा किलोमीटर अंतरावरून पैठण डाव्या कालव्यातील साचलेले पाणी गावात खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा दूषित पाणी पुरवठा तात्काळ बंद करून पिण्यायोग्य व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर पंचांसमक्ष पंचायत समितीचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे एस. ए. जाधव यांनी सकाळी पंचनामा केला. दूषित पाण्यामुळे साथरोग पसरण्याची भिती आहे. गावात अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ताबडतोब कार्यवाही करून ग्रामपंचायतने अधिग्रहण केलेल्या विहिरीतूनच शुद्ध पाण्याचा टँकरद्वारे गावाला पुरवावा, असे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. पंचनाम्यावर एकनाथ पटेकर, ईश्वर धाईत, शरद मुळे, कृष्णा खंडरे, तात्यासाहेब राजगुरू, संजय लहामगे आदींची स्वाक्षरी आहे. दरम्यान, पंचायत समितीच्या पुढील भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणHealthआरोग्यpanchayat samitiपंचायत समिती