शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा; रूई येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:49 IST

अंबड तालुक्यातील रुई येथे सुरू असलेल्या टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील रुई येथे सुरू असलेल्या टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांनी तक्रारीद्वारे ही बाब पंचायत समितीच्या निदर्शनास आणून दिली. तक्रारीनुसार पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करीत गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.रुई येथे सद्यस्थितीत अधिकृत अधिग्रहण करण्यात आलेल्या विहिरीऐवजी बसस्थानकापासून अर्धा किलोमीटर अंतरावरून पैठण डाव्या कालव्यातील साचलेले पाणी गावात खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा दूषित पाणी पुरवठा तात्काळ बंद करून पिण्यायोग्य व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर पंचांसमक्ष पंचायत समितीचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे एस. ए. जाधव यांनी सकाळी पंचनामा केला. दूषित पाण्यामुळे साथरोग पसरण्याची भिती आहे. गावात अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ताबडतोब कार्यवाही करून ग्रामपंचायतने अधिग्रहण केलेल्या विहिरीतूनच शुद्ध पाण्याचा टँकरद्वारे गावाला पुरवावा, असे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. पंचनाम्यावर एकनाथ पटेकर, ईश्वर धाईत, शरद मुळे, कृष्णा खंडरे, तात्यासाहेब राजगुरू, संजय लहामगे आदींची स्वाक्षरी आहे. दरम्यान, पंचायत समितीच्या पुढील भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणHealthआरोग्यpanchayat samitiपंचायत समिती