शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

भाजपच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या- अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:47 IST

देशातील शेतक-यांना कर्जमाफी देण्याची धमक केवळ आघाडीच्याच सरकारमध्ये असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथील प्रचार सभेत व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : देशात आणि राज्यात भाजपा - शिवसेना युतीचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. देशातील शेतक-यांना कर्जमाफी देण्याची धमक केवळ आघाडीच्याच सरकारमध्ये असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथील प्रचार सभेत व्यक्त केले आहे.जालना लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ चव्हाण यांची भोकरदन येथे शनिवारी सभा झाली. ते म्हणाले, २०१४ मध्ये अनेक गोंडस आश्वासने, अच्छे दिनचे स्वप्न दाखवून मोदी सरकार सत्तेमध्ये आले. मात्र, त्यानंतर केवळ पक्षामधील राजकीय नेत्यांनाच चांगले दिवस आले. सर्व सामान्य जनता, शेतकरी मात्र, भरडला गेला. त्यांच्या काळात १५ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. एकट्या मराठवाड्यात २०० शेतक-यांनी जीव गमावले. विदर्भातील एका शेतकºयाने आत्महत्येपूर्वी मोदी व फडणवीस यांचे नाव लिहून चिठ्ठी ठेवली. तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत. या शेतक-याच्या घरी जाऊन मोदी व फडणवीस यांनी अच्छे दिन येतील म्हणून आश्वासन दिले होते़ या सरकारची ४३ कोटींची कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.शहीद पोलीस अधिका-यांबाबत भाजपच्या उमेदवार साध्वीने केलेले वक्तव्य म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा आहे. त्याचा चव्हाण यांनी निषेध केला. विलास औताडे यांनी मोदी आणि रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली. यावेळी आ. राजेश टोपे, माजी आ़ चंद्रकांत दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, हाजी इब्राहिम यांची भाषणे झाली. माजी आ़ चंद्रकांत दानवे, माजी आ़ संतोष दसपुते, माजी आ़ धोडीराम राठोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, हाजी इब्राहिम जाणी, रामदास पालोदकर, बाबूराव कुळकर्णी, श्रीराम महाजन यांची उपस्थिती होती़ महेश औटी यांनी सूत्रसंचालन केले. राहुल देशमुख यांनी आभार मानले़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाAshok Chavanअशोक चव्हाण