शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

तीन दिवसाला एका शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST

दीपक ढोले जालना : अनेक संकटांशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांनी कोरोनाचाही मुकाबला सुरू केला आहे. मात्र, असे असले तरी ...

दीपक ढोले

जालना : अनेक संकटांशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांनी कोरोनाचाही मुकाबला सुरू केला आहे. मात्र, असे असले तरी गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील १०५ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.

नैसर्गिक, सुलतानी संकट, शेतमालाला नसलेला भाव, कर्जाचा डोंगर, अशा अनेक संकटांत सापडलेल्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला जीवनप्रवास थांबविला आहे. २००१ ते २०२० या काळात चार हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या वीस वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्या कमी हव्यात, यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या गेल्या. मात्र, यातील किती योजनांचा शेतकऱ्यांना थेट लाभ झाला, यावर वादविवाद सुरूच आहे. असे असले तरी शेतकऱ्यांमागे लागलेले समस्यांचे शुक्लकाष्ट काही संपलेले नाही. कधी अस्मानी, तर कधी सुलतानी अशा संकटात शेतकरी कायमच अडकलेला आहे. यंदा तर कोरोनाच्या संकटातही शेतकरीच अधिक भरडला जात आहे.

कोरोनामुळे शेतकरी अडचणीत

रबी हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना या काळातील पीक एकतर कवडीमोल भावाने विकण्याची, तर काहींवर अक्षरश: फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी या काळातही अडचणीत आला आहे. देशात लॉकडाऊन असताना शेतकरी आपल्या शेतातील माल विकावा कसा, या मानसिकतेत होते. यामुळेच मागील वर्षभरापासून जिल्ह्यातील १०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

१०५ पैकी ९० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळाला लाभ

जिल्ह्यात वर्षभरात १०५ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे एक लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते. वर्षभरात १०५ पैकी ९० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

आकडेवारी

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या - १०५

योजनेसाठी पात्र ठरलेले शेतकरी - ९०

आलेख काढावा

मागील आठ महिन्यांत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या

सप्टेंबर

१०

ऑक्टोबर

१४

नोव्हेंबर

०५

डिसेंबर

०७

जानेवारी

०८

फेब्रुवारी

०३

मार्च

०४

एप्रिल

००