शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

जालन्यात डाळींच्या भावात अचानक तेजी; शेतकऱ्यांना मिळाले चांगले दर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 12:05 IST

बाजार गप्पा : जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींच्या भावात अचानक तेजी आल्याने शेतकऱ्यांना चांगले दर मिळत आहेत.

- संजय देशमुख (जालना)

जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींच्या भावात अचानक तेजी आल्याने शेतकऱ्यांना चांगले दर मिळत आहेत. असे असले तरी ही तेजी फार दिवस टिकणार नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. साखरेचा कोटा केंद्र सरकारने जाहीर केला असून, तो २२ लाख मेट्रिक टन आहे. दिवाळी संपताच साखरेच्या दरात ५० रुपयांची घसरण झाली.

पावसाने हुलकावणी दिल्याने यंदा जालना बाजारपेठेत मूग, तूर तसेच उडदीची पाहिजे तशी आवक आलेली नाही. याचा परिणाम डाळींच्या भाववाढीवर झाल्याचे सांगण्यात आले. तूर, हरभरा डाळीत प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपयांची तेजी आली आहे. मागणीच्या तुलनेत डाळींची आवक कमी झाल्याने हे भाव वाढले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये प्रथमच तेजी आल्याचे दिसून आले. दिवाळी संपल्यावर बाजारातील ग्राहकीही कमी झाली आहे.

शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापूस खरेदीला खासगी बाजारात प्रारंभ झाला आहे. मात्र, पाहिजे तेवढा दर मिळत नसल्याने आजही जालन्यातील कापूस गुजरातकडे जात आहे. तेथील व्यापारी थेट गावात गाडी आणून कापूस जागेवर खरेदी करीत असल्याने शेतकरी थोडा कमी भाव मिळत असला, तरी तो रोखीने मिळत असल्याने व्यापाऱ्यांना कापूस विक्री करीत असल्याचे चित्र आहे. जालना बाजारपेठेत सध्या सोयाबीनची आवक ही ५०० हजार क्विंटलपेक्षा जास्त असून, यातही क्विंटलमागे चांगल्या सोयाबीनला ३३०० रुपयांचा भाव मिळत आहे.

ज्वारीदेखील बऱ्यापैकी येत असली तरी त्याचे भाव गेल्या आठवड्यातीलच कायम आहेत. नवीन गुळाची आवक आता सुरू झाली असून, कोल्हापूर, लातूर तसेच शेजारील विदर्भातून गुळाची आवक येत आहे. शासनाने सुरू केलेल्या हमीभाव केंद्रावर मात्र शेतकरी फिरकत नसल्याचे चित्र आहे. दिवाळी संपल्यानंतर आता व्यापाऱ्यांना ग्राहकांची चिंता सतावत असल्याचे बोलले जात आहे. मोसंबीची आवक बऱ्यापैकी असली तरी शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी