शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात डाळींच्या भावात अचानक तेजी; शेतकऱ्यांना मिळाले चांगले दर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 12:05 IST

बाजार गप्पा : जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींच्या भावात अचानक तेजी आल्याने शेतकऱ्यांना चांगले दर मिळत आहेत.

- संजय देशमुख (जालना)

जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींच्या भावात अचानक तेजी आल्याने शेतकऱ्यांना चांगले दर मिळत आहेत. असे असले तरी ही तेजी फार दिवस टिकणार नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. साखरेचा कोटा केंद्र सरकारने जाहीर केला असून, तो २२ लाख मेट्रिक टन आहे. दिवाळी संपताच साखरेच्या दरात ५० रुपयांची घसरण झाली.

पावसाने हुलकावणी दिल्याने यंदा जालना बाजारपेठेत मूग, तूर तसेच उडदीची पाहिजे तशी आवक आलेली नाही. याचा परिणाम डाळींच्या भाववाढीवर झाल्याचे सांगण्यात आले. तूर, हरभरा डाळीत प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपयांची तेजी आली आहे. मागणीच्या तुलनेत डाळींची आवक कमी झाल्याने हे भाव वाढले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये प्रथमच तेजी आल्याचे दिसून आले. दिवाळी संपल्यावर बाजारातील ग्राहकीही कमी झाली आहे.

शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापूस खरेदीला खासगी बाजारात प्रारंभ झाला आहे. मात्र, पाहिजे तेवढा दर मिळत नसल्याने आजही जालन्यातील कापूस गुजरातकडे जात आहे. तेथील व्यापारी थेट गावात गाडी आणून कापूस जागेवर खरेदी करीत असल्याने शेतकरी थोडा कमी भाव मिळत असला, तरी तो रोखीने मिळत असल्याने व्यापाऱ्यांना कापूस विक्री करीत असल्याचे चित्र आहे. जालना बाजारपेठेत सध्या सोयाबीनची आवक ही ५०० हजार क्विंटलपेक्षा जास्त असून, यातही क्विंटलमागे चांगल्या सोयाबीनला ३३०० रुपयांचा भाव मिळत आहे.

ज्वारीदेखील बऱ्यापैकी येत असली तरी त्याचे भाव गेल्या आठवड्यातीलच कायम आहेत. नवीन गुळाची आवक आता सुरू झाली असून, कोल्हापूर, लातूर तसेच शेजारील विदर्भातून गुळाची आवक येत आहे. शासनाने सुरू केलेल्या हमीभाव केंद्रावर मात्र शेतकरी फिरकत नसल्याचे चित्र आहे. दिवाळी संपल्यानंतर आता व्यापाऱ्यांना ग्राहकांची चिंता सतावत असल्याचे बोलले जात आहे. मोसंबीची आवक बऱ्यापैकी असली तरी शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी