शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

जालन्यात डाळींच्या भावात अचानक तेजी; शेतकऱ्यांना मिळाले चांगले दर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 12:05 IST

बाजार गप्पा : जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींच्या भावात अचानक तेजी आल्याने शेतकऱ्यांना चांगले दर मिळत आहेत.

- संजय देशमुख (जालना)

जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींच्या भावात अचानक तेजी आल्याने शेतकऱ्यांना चांगले दर मिळत आहेत. असे असले तरी ही तेजी फार दिवस टिकणार नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. साखरेचा कोटा केंद्र सरकारने जाहीर केला असून, तो २२ लाख मेट्रिक टन आहे. दिवाळी संपताच साखरेच्या दरात ५० रुपयांची घसरण झाली.

पावसाने हुलकावणी दिल्याने यंदा जालना बाजारपेठेत मूग, तूर तसेच उडदीची पाहिजे तशी आवक आलेली नाही. याचा परिणाम डाळींच्या भाववाढीवर झाल्याचे सांगण्यात आले. तूर, हरभरा डाळीत प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपयांची तेजी आली आहे. मागणीच्या तुलनेत डाळींची आवक कमी झाल्याने हे भाव वाढले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये प्रथमच तेजी आल्याचे दिसून आले. दिवाळी संपल्यावर बाजारातील ग्राहकीही कमी झाली आहे.

शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापूस खरेदीला खासगी बाजारात प्रारंभ झाला आहे. मात्र, पाहिजे तेवढा दर मिळत नसल्याने आजही जालन्यातील कापूस गुजरातकडे जात आहे. तेथील व्यापारी थेट गावात गाडी आणून कापूस जागेवर खरेदी करीत असल्याने शेतकरी थोडा कमी भाव मिळत असला, तरी तो रोखीने मिळत असल्याने व्यापाऱ्यांना कापूस विक्री करीत असल्याचे चित्र आहे. जालना बाजारपेठेत सध्या सोयाबीनची आवक ही ५०० हजार क्विंटलपेक्षा जास्त असून, यातही क्विंटलमागे चांगल्या सोयाबीनला ३३०० रुपयांचा भाव मिळत आहे.

ज्वारीदेखील बऱ्यापैकी येत असली तरी त्याचे भाव गेल्या आठवड्यातीलच कायम आहेत. नवीन गुळाची आवक आता सुरू झाली असून, कोल्हापूर, लातूर तसेच शेजारील विदर्भातून गुळाची आवक येत आहे. शासनाने सुरू केलेल्या हमीभाव केंद्रावर मात्र शेतकरी फिरकत नसल्याचे चित्र आहे. दिवाळी संपल्यानंतर आता व्यापाऱ्यांना ग्राहकांची चिंता सतावत असल्याचे बोलले जात आहे. मोसंबीची आवक बऱ्यापैकी असली तरी शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी