शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

५०० पेक्षा अधिक वाहनांची ‘जीएसटी’कडून अचानक तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:58 IST

मंदीच्या गर्तेतून वाट काढत असलेल्या जालन्यातील उद्योगांच्या मागे ‘जीएसटी’ विभागाचा ससेमिरा लागल्याने मोठी खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मंदीच्या गर्तेतून वाट काढत असलेल्या जालन्यातील उद्योगांच्या मागे ‘जीएसटी’ विभागाचा ससेमिरा लागल्याने मोठी खळबळ उडाली. सोमवारी पहाटे २ वाजल्यापासूनच ‘जीएसटी’च्या अधिकाऱ्यांनी औद्योगिक वसाहतीतून मुख्य मार्गाला लागणाºया चौकांमध्ये ट्रकची अचानक थांबवून तपासणी केली. यामध्ये चालकांकडे ‘ई-वे’ बिल आढळून आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.जालना एक मोठे औद्योगिक आणि व्यापारी केंद्र असल्याने प्राप्तीकर विभागासह जीएसटी विभागाचाही जालन्यावर नेहमीच करडी नजर असते. गेल्यावर्षी देखील ‘ई-वे’ बिलाअंतर्गत तपासणी केली असता एक कोटी रुपयांचा दंड व्यापारी आणि उद्योजकांना ठोठाविण्यात आला होता.तसेच मध्यंतरी वेगवेगळे व्यापारक्षेत्र निवडून त्यांच्यावर अचानक कारवाई केल्याच्या घटनाही नवीन नाहीत.सोमवारी पहाटेपासूनच औद्योगिक वसाहत तसेच जालन्याकडून औरंगाबादकडे आणि औरंगाबाद येथून जालन्याकडे येणा-या मालवाहतूक करणा-या ट्रकची ४० जणांच्या पथकाने तपासणी केली. यामध्ये एक लाख रूपयांपेक्षा जास्त किमतीचा माल वाहून नेला जात असेल तर त्या मालासोबत संबंधित ट्रक चालकाकडे ‘ई-वे’ बिल असणे अनिवार्य करण्यात आले आहे.परंतु, बहुतांश जणांकडे हे बिल आढळून आले नसल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले.या संदर्भात राज्य कर उपायुक्त रवींद्र जोगदंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या कारवाईला दुजोरा दिला. परंतु, नेमका किती वाहनांवर दंड आकारण्यात आला, याची माहिती रात्री उशिरापर्यंत निश्चित झाले नसल्याचे ते म्हणाले. ई-वे बिलाची ही तपासणी ही राज्यभर सुरू असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :GST Officeमुख्य जीएसटी कार्यालयraidधाडMIDCएमआयडीसीroad transportरस्ते वाहतूक