शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

अशी असावी जिद्द! पाणीसाठा कमी झाल्याने मासेमारी धोक्यात, मच्छीमारांनी केली टरबूज शेती

By शिवाजी कदम | Updated: January 9, 2024 14:34 IST

मासेमारी व्यवसाय अडचणीत आल्याने परतूर तालुक्यातील मच्छीमार बांधवांनी गाळपेऱ्यात अशी कलिंगड लागवड सुरू केली आहे.

- शेषराव वायाळपरतूर : यंदा निम्न दुधना प्रकल्पात पाणीसाठा न वाढल्याने मच्छीमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. मासेमारी करणाऱ्या बांधवांनी या कठीण काळातदेखील जिद्द न सोडता टरबूज अर्थात कलिंगड लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आहे. यंदा पाणी कमी असल्याने टरबुजास चांगला दर मिळेल अशी त्यांना आशा आहे.

परतूर तालुक्याला निम्न प्रकल्प हा सिंचन पिण्याचे पाणी व मासेमारांसाठी वरदान ठरला आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यात बागायती क्षेत्र वाढले आहे. तसेच दरवर्षी होणारे मासेमार बांधवांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबले आहे. धरणात मत्स्यबीज सोडून मासेमार बांधव आपली उपजीविका भागवितात. मात्र मागील वर्षी पाऊस न झाल्याने प्रकल्पात केवळ १८.५९ टक्के जिवंत पाणी साठा राहिला आहे. धरणात पाणी नसल्याने मच्छीमारी व्यवसाय करणे अडचणीचे बनले आहे. धरणात पाणी नसल्याचा परिणाम शेतकऱ्यांसह मच्छीमारावरही होत असल्याने पर्यायी रोजगार शोधण्याची वेळ यावर्षी त्यांच्यावर आली आहे.

कलिंगडाची लागवडही कमीचधरणात पाणी नसल्याने मासेमारी व्यवसाय ठप्प झालेला आहे. यामुळे पर्यायी रोजगार शोधण्यासाठी कलिंगड लागवडीकडे वळले आहेत.दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणारी कलिंगडाची लागवड यावर्षी पाणी नसल्याने घटली आहे. मात्र, लागवड घटल्याने दर चांगला मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे.

उपासमारीची वेळसध्या धरणात पाणी नसल्याने अहोरात्र पाण्यात फिरूनही मासे सापडत मिळत नाही. यामुळे मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न आमच्या समोर आहे. शासनाने मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांना मदत करावी.- तुकाराम बलिये, मच्छीमार.

पाणी नसल्याने सोसायटी अडचणीतमागील दोन वर्षांपासून आमची सोसायटी आर्थिक अडचणीत आली आहे. मागील वर्षी अवकाळी पावसाने टाकलेले कोट्यवधीचे मत्स्यबीज वाहून गेले, तर यावर्षीही लाखो रुपयाचे टाकले आहे, मात्र धरणात पाणी नसल्याने हे बीजही वाया जाणार आहे. शासनाने या मच्छीमार सोसायटीस मदत करून रोजगाराचा प्रश्न सोडवावा.- निवृती लिंबुरे. मच्छीमार सोयायटी, चेअरमन

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालनाfishermanमच्छीमार