शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
2
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
3
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
4
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
5
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
6
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
7
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
8
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
9
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
10
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
11
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
12
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
13
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
14
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
15
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
17
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
18
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
19
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
20
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश

फार्मसी, तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:03 IST

दहावीनंतर तांंत्रिक शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कायम असून, यंदा फार्मसीला जास्त पसंती असल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दहावी आणि बारावीचे निकाल लागून आता विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका आणि टीसी मिळाली आहे. त्यामुळे आयटीआयसह अभियांत्रिकी आणि अन्य विद्या शाखांमध्ये प्रवेशाची लगीनघाई दिसून येत आहे. दहावीनंतर तांंत्रिक शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कायम असून, यंदा फार्मसीला जास्त पसंती असल्याचे दिसून आले.एकूणच जालना शहर व जिल्ह्यात सध्या सर्वत्र प्रवेशोत्सव सुरू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये, परंपरागत कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांसाठी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. मात्र, अनेकांनी याला पर्याय म्हणून ठेवले असून, अनेकांचा कल हा आयटीआय तसेच अभियांत्रिकीसह औषध निर्माण शास्त्र विभागाकडे आहे. या संदर्भात आयटीआयचे प्राचार्य डी.बी. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, आयटीआयमध्ये केवळ ३८८ विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याची क्षमता आहे. परंतु प्रवेश सुरू होऊन तीनच दिवस झाले असले तरी, एक हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रवेश नोंदणीसाठी ३० जून अंतिम तारीख आहे. यावेळ पर्यंत किमान तीन हजार विद्यार्थ्यांचे अर्ज येतील अशी अपेक्षा आहे. हे अर्ज आल्यावर त्याची छाननी होऊन कुठल्या ट्रेडसाठी संबंधित विद्यार्थी पात्र आहे, याचा तपशील गोळा केल्यावर प्रत्यक्ष प्रवेशाला प्रारंभ होणार असल्याचे ते म्हणाले.येथील मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयात एआयसीटीचे नोंदणी केंद्र होते. तेथे अभियांत्रिकीसह फार्मसी अभ्यासक्रमासाठीची नोंदणी करण्यात आली असून, २२ जून पर्यत ७२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती प्राचार्य बिरदार यांनी दिली.जालना : तंत्रनिकेतनचे यंदा सबकुछ आॅनलाईनशासकीय तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा पूर्वीप्रमाणे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जे किट देण्यात येते ते बंद केले आहे. यंदा सर्व प्रवेश हे आॅनलाईन होणार आहेत. नोंदणी केल्यावर विद्यार्थ्यांना त्यांचा पासवर्ड देण्यात येणार आहे. पासवर्ड दिल्यावर विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठीचे शुल्क देखील आॅनलाईन भरावयाचे आहे. पूर्वी ज्या प्रमाणे राष्ट्रीयकृत बँकांचे डिमांड ड्राप्ट लागत असत, ते आता बंद केले असून, पेमेंट बँक अथवा डेबीटकार्डच्या माध्यमातून विद्यार्थी शुल्क भरू शकतात. तसेच आता बँकांनी डीडी कॅन्सल करायचा झाल्यास त्याचे चार्जेस भरमसाठ वाढवले आहेत. एक हजार रूपयांचा डीडी. रद्द करायवा झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे जवळपास २६७ रूपये कापले जात आहेत.विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतला बायोमेट्रीक हजेरीचा धसकाशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी चालू शैक्षणिक वर्षापासून विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी ही बायोमेट्रिक पध्दतीने घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे खासगी क्लासमध्ये जातांना अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे फारसे काही हाती लागणार नसल्याचे मत व्यक्त होत आहे. दहावी तसेच बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणांना सीईटीमुळे काहीच किंमत नसल्याने महाविद्यालयाच्या हजेरीवर त्याचा परिणाम झाला आहे. बायोमेट्रिकचा निर्णय यापूर्वीही झाला होता, त्याची अंमलबजावणी शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Educationशिक्षणcollegeमहाविद्यालय