शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

फार्मसी, तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:03 IST

दहावीनंतर तांंत्रिक शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कायम असून, यंदा फार्मसीला जास्त पसंती असल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दहावी आणि बारावीचे निकाल लागून आता विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका आणि टीसी मिळाली आहे. त्यामुळे आयटीआयसह अभियांत्रिकी आणि अन्य विद्या शाखांमध्ये प्रवेशाची लगीनघाई दिसून येत आहे. दहावीनंतर तांंत्रिक शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कायम असून, यंदा फार्मसीला जास्त पसंती असल्याचे दिसून आले.एकूणच जालना शहर व जिल्ह्यात सध्या सर्वत्र प्रवेशोत्सव सुरू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये, परंपरागत कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांसाठी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. मात्र, अनेकांनी याला पर्याय म्हणून ठेवले असून, अनेकांचा कल हा आयटीआय तसेच अभियांत्रिकीसह औषध निर्माण शास्त्र विभागाकडे आहे. या संदर्भात आयटीआयचे प्राचार्य डी.बी. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, आयटीआयमध्ये केवळ ३८८ विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याची क्षमता आहे. परंतु प्रवेश सुरू होऊन तीनच दिवस झाले असले तरी, एक हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रवेश नोंदणीसाठी ३० जून अंतिम तारीख आहे. यावेळ पर्यंत किमान तीन हजार विद्यार्थ्यांचे अर्ज येतील अशी अपेक्षा आहे. हे अर्ज आल्यावर त्याची छाननी होऊन कुठल्या ट्रेडसाठी संबंधित विद्यार्थी पात्र आहे, याचा तपशील गोळा केल्यावर प्रत्यक्ष प्रवेशाला प्रारंभ होणार असल्याचे ते म्हणाले.येथील मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयात एआयसीटीचे नोंदणी केंद्र होते. तेथे अभियांत्रिकीसह फार्मसी अभ्यासक्रमासाठीची नोंदणी करण्यात आली असून, २२ जून पर्यत ७२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती प्राचार्य बिरदार यांनी दिली.जालना : तंत्रनिकेतनचे यंदा सबकुछ आॅनलाईनशासकीय तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा पूर्वीप्रमाणे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जे किट देण्यात येते ते बंद केले आहे. यंदा सर्व प्रवेश हे आॅनलाईन होणार आहेत. नोंदणी केल्यावर विद्यार्थ्यांना त्यांचा पासवर्ड देण्यात येणार आहे. पासवर्ड दिल्यावर विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठीचे शुल्क देखील आॅनलाईन भरावयाचे आहे. पूर्वी ज्या प्रमाणे राष्ट्रीयकृत बँकांचे डिमांड ड्राप्ट लागत असत, ते आता बंद केले असून, पेमेंट बँक अथवा डेबीटकार्डच्या माध्यमातून विद्यार्थी शुल्क भरू शकतात. तसेच आता बँकांनी डीडी कॅन्सल करायचा झाल्यास त्याचे चार्जेस भरमसाठ वाढवले आहेत. एक हजार रूपयांचा डीडी. रद्द करायवा झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे जवळपास २६७ रूपये कापले जात आहेत.विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतला बायोमेट्रीक हजेरीचा धसकाशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी चालू शैक्षणिक वर्षापासून विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी ही बायोमेट्रिक पध्दतीने घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे खासगी क्लासमध्ये जातांना अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे फारसे काही हाती लागणार नसल्याचे मत व्यक्त होत आहे. दहावी तसेच बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणांना सीईटीमुळे काहीच किंमत नसल्याने महाविद्यालयाच्या हजेरीवर त्याचा परिणाम झाला आहे. बायोमेट्रिकचा निर्णय यापूर्वीही झाला होता, त्याची अंमलबजावणी शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Educationशिक्षणcollegeमहाविद्यालय