शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

बारावीच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल; हॉस्टेलवर संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 18:48 IST

बारावी परीक्षेला अवघे काही दिवस बाकी असताना विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

बदनापूर ( जालना): येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वसतिगृहात बारावीत शिकणाऱ्या एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले. ही घटना बुधवारी ( दि. ५) रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ज्योती संजय सुरासे असे मृत मुलीचे नाव आहे. बारावी परीक्षेला अवघे काही दिवस बाकी असताना विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

येथील तहसील परिसरात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे वसतिगृह आहे. येथे ज्योती संजय सुरासे ( 17 वर्ष रा.किन्होळा तालुका बदनापूर) ही शहरातील एका महाविद्यालयात १२ वीत शिक्षण घेत होती. तिचे वास्तव्य वसतिगृहात होते. ज्योतीने बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास वसतिगृहातील आपल्या खोलीमध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. ज्योती घरातील मोठी मुलगी होती. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी दिली.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाJalanaजालना