शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:03 IST

अंबड तालुक्यातील ६५ गावांचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ महावितरणच्या विरोधात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वडीगोद्री येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील ६५ गावांचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ महावितरणच्या विरोधात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वडीगोद्री येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.तालुक्यातील अनेक गावामधील नागरिकांनी वीज बिल भरणा केलेला आहे. तसेच नागरिक नियमितपणे बिले भरत आहेत. त्या लोकांवर एक प्रकारे महावितरण कंपनीकडून अन्याय केला जात आहे. तालुक्यात शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना महावितरण कंपनीने कुठलीही पूर्व सूचना न देता २५ गावाचा विद्युत पुरवठा खंडित केला.तसेच ४० गावाचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणने काढल्याने शेतक-यांत संताप व्यक्त होत आहे. शेतकरी आर्थिक संकटात असताना महावितरण कंपनी जुलमी पद्धतीने वागत असल्याचा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यानी केला.अनेक शेतकरी कर्जर् बाजारीपणामुळे आत्महत्या करत असताना महावितरण कंपनीने शेतक-यांना वेठीस धरले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनामध्ये भाजपा सरकारबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.महावितरणकडे नागरिकांनी मीटर मिळण्याकरिता कोटेशन, नवीन मीटरची मागणी केली. परंतु त्या नागरिकांना पैसे भरूनही परवाना व मीटर देण्यात येत नाही. मागील पंधरवड्यात वादळ वा-याने पडलेले विद्युत खांब आजपर्यंत महावितरणकडून उभे करण्यात आले नाही.जमीनदोस्त झालेले खांब जशास तसे पहायला मिळत आहे. खांब पडून झालेले नुकसान व निर्माण झालेली वीज समस्या दूर करण्यासाठी कुठलीही योजना नाही. ग्राहकांना देण्यासाठी महावितरणकडे केबल, मीटर देखील नाहीत. महावितरणचे कर्मचारी हे रीडिंग घेण्यासाठी घरोघरी न जाता कुठेतरी एकाच ठिकाणी बसून अंदाजे रीडिंग टाकून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा पद्धतीने वीजबिल आकारले जाते. अशा एक ना अनेक समस्या असताना त्याकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभार चालू आहे.तसेच महावितरण कंपनीने आपला मनमानी पणा थांबवून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी जि. प. उपाध्यक्ष सतीश टोपे, जिल्हा बँकेचे चेअरमन मनोज मरकड, जि.प.सदस्य विष्णूपंत गायकवाड, संजय पटेकर, भाऊसाहेब कनके, सदाशिव दुफाके, बापूराव खटके, किरण तारख, विकास कव्हळे, भागुजी मैंद, बाबासाहेब बोंबले, अशोक मांगदरे, राजन उढाण, सहदेव भारती, बाबासाहेब मस्के, सलीम शेख, बाबासाहेब गावडे,नारायण वायाळ, आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलनNCPराष्ट्रवादी काँग्रेस