शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी जागते रहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:09 AM

लोकसभा निवडणुकीच्या काळात पूर्ववैमनस्यातून आॅनर किलिंगच्या घटना जिल्ह्यात होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगावी, यात हलगर्जीपणा करु नये असे आदेश औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणुकीच्या काळात पूर्ववैमनस्यातून आॅनर किलिंगच्या घटना जिल्ह्यात होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगावी, यात हलगर्जीपणा करु नये असे आदेश औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले.येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंघल यांनी जिल्ह्यातील पोलीस प्रमुखांची आढावा बैठक घेतली.यावेळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, चंपालाल शेवगण, सुनील जायभाये, सोपान बांगर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह जिल्ह्यातील अठरा पोलीस ठाणे प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.औरंगाबाद परिक्षेत्रात रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच रवींद्र सिंघल यांनी जालना येथे पोलिसांची आढावा बैठक घेतली.निवडणुकीच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही जण जाणीवपूर्वक कायदा व सुव्यवस्थेचा बिघडविण्याचा प्रयत्न करण्याची भीती असते.यामुळे पोलिसांनी अशा गुंडावर नजर ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, बेकायदेशीर शस्त्र, दारुविक्री करणाऱ्याविरुध्द कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी पोलीस प्रमुखांना दिल्या.तसेच निवडणूक काळात कोणत्या गोष्टीना पहिले प्राधान्य द्यावे याविषयी सिंघल यांनी सांगितले. बीड येथे पूर्ववैमनस्यातून एका पक्षाच्या नगरसेवकाचा खून करण्यात आला आहे.अशा घटना जिल्ह्यात घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेण्याचे आदेश यावेळी सिंघल यांनी दिले.पोलिसांचे कौतुकलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि एडीएसच्या पथकाने जुगाराचे अड्डे, दारु अड्ड्यांवर छापे मारुन अनेकांवर कारवाई केली. तिघा जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन हर्सूल कारागृहात रवानगी केली. तसेच दोघा जणांवर हद्दपारीची कारवाई केल्याने सिंघल यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे यावेळी कौतुक केले.जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रावर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून कुठलीच विपरीत घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी, सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे विपरीत घटना घडण्याची दाट शक्यता असते, यावर कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे आदेश यावेळी सिंघल यांनी दिले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalna Policeजालना पोलीस