शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रस्त्यावरील फुटपाथवर विक्रेत्यांचेच राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST

नगरपालिकेच्या पथकाने यापूर्वी वेळोवेळी अतिक्रमण धारकांवर कारवाई केली आहे. मुख्य बाजारातील अतिक्रमणे हटिवली आहेत. मात्र, कारवाईच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या ...

नगरपालिकेच्या पथकाने यापूर्वी वेळोवेळी अतिक्रमण धारकांवर कारवाई केली आहे. मुख्य बाजारातील अतिक्रमणे हटिवली आहेत. मात्र, कारवाईच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पुन्हा रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून व्यवसाय थाटले जात आहेत. या अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद होत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीचे प्रकारही वाढत आहेत. याचा त्रास पादचारी नागरिकांना होत आहे. त्यामुळे अतिक्रमण विरोधी पथकाने सातत्याने कारवाई मोहीम राबविण्याची गरज आहे. शिवाय या व्यावसायिकांना नगरपालिकेने पर्यायी जागा देणे गरजेचे आहे.

कोरोना संसर्गाचा धोका

कोरोना रूग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, रूग्णसंख्या कायम आहे. विशेषत: आढळून येणाऱ्या रूग्णांमध्ये जालना शहरातीलच रूग्ण अधिक आढळून येत आहेत. त्यामुळे बाजारातील गर्दीमुळे पुन्हा कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होताना दिसत आहे.

स्वस्त मिळते म्हणून ग्राहकांचीही गर्दी

दुकानात विकले जाणारे साहित्य आणि फुटपाथवर हातगाड्यांवर विकले जाणारे साहित्य याच्या दरात मोठी तफावत असते. त्यामुळे दुकानात मिळणारी वस्तू ही हातगाड्यावर स्वस्त मिळते म्हणून अनेक ग्राहक रस्त्याच्या कडेला थांबलेल्या हातगाड्यांवर थांबून साहित्य खरेदीसाठी गर्दी करतात.

शहरातील मुख्य मार्गासह बाजारपेठेतील रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणावर वेळोवेळी कारवाई केली जात आहे. अनेकांना नोटीसाही देण्यात आल्या आहेत. शहरातील ज्या भागात अतिक्रमणे झाली असतील तेथे पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येईल.

-नितीन नार्वेकर, मुख्याधिकारी