शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

तणनाशक फवारल्याने द्राक्ष बागेचे चार लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 00:12 IST

चार एकर द्राक्ष बागेवर कोणी अज्ञात इसमाने तणनाशक फवारल्याने दोन शेतकऱ्यांचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : येथील चार एकर द्राक्ष बागेवर कोणी अज्ञात इसमाने तणनाशक फवारल्याने दोन शेतकऱ्यांचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान दुष्काळात हा घाला आल्याने दोन्ही शेतकरी हतबल झाले असून त्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.याबाबत माहिती अशी की येथील गट क्रमांक २६२ मध्ये शंकर खोत व रवींद्र खोत यांची शेती आहे. फळबागेकडे वळलेल्या या शेतक-यांनी आपल्या शेतात प्रत्येकी दोन एकर द्राक्ष बाग लावली आहे. मोठ्या कष्टाने कलमा बांधून ठिबकवर हे शेतकरी या बागा जगवित होते. मात्र सोमवारी पहाटे शंकर खोत हे द्राक्ष बागेत गेले असता त्यांना द्राक्षाच्या वेली पिवळ्या पडलेल्या दिसल्या. बारकाईने पाहीले असता त्यांच्या संपूर्ण बागेसह शेजारील त्यांचे काका रवींद्र खोत यांच्याही बागेत हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. कोणीतरी अज्ञात इसमाने रात्रीच्या वेळी या दोन्ही बागेवर तणनाशक फवारुन दूषित भावनेने बाग उद्धस्त केल्याचे त्यांना कळले.मार्च महिन्यात लावलेल्या या बागांवर आतापर्यंत जवळपास चार लाख रुपये खर्च झाल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. लेकराप्रमाणे वाढविलेले ही द्राक्ष बाग ऐन दुष्काळात कोणीतरी उद्धस्त केल्याने हे शेतकरी हतबल झाले आहे. दरम्यान तहसीलदारांसह टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवून कारवाईची मागणी शेतकरी शंकर खोत व रवींद्र खोत यांनी केली आहे. याकडे पोलीसांनी अद्या लक्ष दिले नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीfruitsफळे