शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

अध्यात्म हाच सुखी जीवन जगण्याचा पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:56 IST

आज टीव्हीसह मोबाईलच्या आक्रमणाने घराघरात एक प्रकारचे चित्रपटगृह झाले आहे. हे कुठे तरी थांबवायचे असेल तर त्याला अध्यात्माची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. रामप्रसाद साळुंके यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अध्यात्म हाच जीवनाचा पाया आहे. हजारो वर्षापूर्वी ज्यावेळी मंदिरे नव्हती, त्यवेळी घर हे एक मंदिर होते. मात्र कालांतराने स्वार्थ आणि परमार्थात दरी वाढत गेल्याने कुटुंबांमध्ये ताण-तणाव वाढत गेले. त्यातूनच मंदिरांची निर्मिती झाली. मंदिरात जाताना आपण षडरिपू बाजूला ठेवूनच जाणे अपेक्षित असते, मात्र आपण कुठली ना कुठली इच्छापूर्ती व्हावी म्हणून देव-देव करत असू तर ते अध्यात्म नाही.आज टीव्हीसह मोबाईलच्या आक्रमणाने घराघरात एक प्रकारचे चित्रपटगृह झाले आहे. हे कुठे तरी थांबवायचे असेल तर त्याला अध्यात्माची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. रामप्रसाद साळुंके यांनी केले.चेतना ज्येष्ठ नागरिक संस्थेकडून रविवारी साळुंके यांच्या विशेष व्याख्यानोच आयोजन केले होते. यावेळी महेंद्रकुमार गुप्ता, सुभाष देविदान, अशोक हुरगट, अ‍ॅड. सीताराम धन्नावत यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. साळुंके यांचा परिचय झंवर यांनी करून दिला. यावेळी पुढे बोलताना त्यांनी हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे, हे सांगितले.भगवद् गीता हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्याचे सांगतानाच त्यांनी त्यात जे कौरव आणि पांडवांचे जे युध्द दर्शविले आहे, त्यात तथ्य नसल्याचे सांगून ते महाभारताच्या माध्यमातून त्यात आले आहे. श्रीकृष्णाने गीता अर्जुनाला सांगितली म्हणजे याचा अर्थ असा नसून, ती एकट्या अर्जुनाला सांगितली.अर्जुन या शब्दाचा अर्थ च मुळात आत्मसात करणारा असा आहे.एकूणच महाराष्ट्रात संतांनी जो भक्ती मार्ग दाखवला आहे, त्या वाटेवर आपण चालल्यास मिळालेले जीवन सार्थकी लागू शकते.आपल्यातील अहंकार आणि स्वार्थ बाजूला ठेवल्या निखळ आनंदी जीवन जगता येते. संसाररूपी रहाटगाडग्यात आपण केव्हा वयस्कर होतो, हे कळत नाही.किमान आता ज्येष्ठ नागरिक झाल्यावर आपण जबाबदारीतून मुक्त होऊन ईश्वराचे चिंतनात वेळ घालविण्याचे आवाहन साळुंके यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक हुरगट यांनी केले.

टॅग्स :Familyपरिवारspiritualअध्यात्मिक