शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसामुळे पेरणीपूर्व कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:29 IST

पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची लगबग सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमागील दोन दिवस जिल्ह्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची लगबग सुरू केली आहे. विशेषत: उकाड्यापासूनही काही प्रमाणात सुटका झाली आहे. असे असले तरी पेरणीसाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.रविवारी जालना शहरासह परिसरात ढगाळ वातावरण होते.वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी परिसरात शनिवारी दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. मागील पंधरा दिवसांपासून परिसरात कडक ऊन तापत होते. समाधानकारक पाऊस झाल्याने या भागातील काही शेतक-यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.दुष्काळामुळे शेतक-यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मृग नक्षत्र सुरु होवूनही पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. शनिवारी सायंकाळी वालसावंगी, धावडा, पारध, शेलूद, वडोद तांगडा, वाडी, पद्मावती परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतक-यांनी मका, कपाशी, मूग सोयाबीनची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. यंदा पाऊस उशिरा आल्याने बहुतांश शेतक-यांची धूळ पेरणी वाया गेली आहे. दोन दिवसापूर्वी केलेली पेरणी पावसामुळे साधल्याने समाधान व्यक्त होत आहे. पाण्याअभावी उन्हाळी मिरचीचे पीक धोक्यात आले होते. या पावसामुळे मिरचीचे पीक वाचले आहे. रविवारी आठवडी बाजार भरतो. मात्र, पाऊस पडल्याने गावातील शेतकरी कुटुंबातील शाळकरी मुलांसह सर्वच सदस्यांनी शेती कामासाठी शेतात धाव घेतली. त्यामुळे बाजारात नागरिकांची गर्दी कमी दिसत होती.राजूर : प्रदीर्घ विश्रांतीनंतर राजूरसह परिसरात शनिवारी सायंकाळी समाधानकारक भीज पाऊस झाला. त्यामुळे सुखावलेल्या शेतकºयांनी रविवारी चाढ्यावर मूठ धरत पेरणीची लगबग सुरू केल्याचे चित्र राजूर परिसरात दिसून आले.पावसाअभावी कपाशी लागवडीसह पेरण्या खोळंबल्या होत्या. दुष्काळाच्या चटक्याने त्रस्त असलेले शेतकरी पावसाने पाठ फिरवल्याने हैराण झाले होते. चातक पक्षाप्रमाणे शेतकरी पावसासाठी वाट पाहात होते. अखेर शनिवारी सायंकाळी राजूरसह परिसरात पावसाने हजेरी लावली. पेरणी योग्य पाऊस झाल्याने राजूरसह परिसरातील शेतक-यांनी खरीप पेरणीची लगबग सुरू केली आहे. रविवारी सकाळीच शेतक-यांनी शेतीचा रस्ता धरला. या भागात कपाशी लागवडीसह मूग, उडीद, मकाच्या पेरणीला सुरूवात केली. शेतकरी पेरणीच्या कामाला लागल्याने रविवारी आठवडी बाजारच्या गर्दीवर मोठा परिणाम दिसून आला.राजूरचा आठवडी बाजार तालुक्यात सर्वात मोठा असतो. पंचक्रोशितील सुमारे तीस ते पस्तीस गावातील नागरिक बाजारला हजेरी लावतात. परंतू शनिवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याने अनेकांनी बाजारात गर्दी करण्यापेक्षा शेतात जाणे पसंत केले. त्यामुळे आठवडी बाजारातील गर्दी कमी होऊन, येथील आर्थिक उलाढालीवरही परिणाम झाला होता.केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतक-यामध्ये उत्साह संचारला आहे. या भागातील शेतक-यांनी खरिपाच्या पेरणीची लगबग सुरु केली आहे.शनिवारी मृग व आद्रा नक्षत्राचा जोड होता. या जोडावर पावसाचे पेरणीयोग्य आगमन झाले. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या मार्गी लागणार असल्याचे दिसत आहे. रविवारी शाळेला सुटी असल्याने शेतकरी आपल्या मुलांसह शेतीमशागतीच्या कामी लागले होते. पाऊस नसल्याने गत अनेक दिवसांपासून खरिपाच्या पेरण्या खोंळबल्या होत्या. शनिवारच्या पावसाने पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला. ज्या शेतक-यांनी धुळपेरणी केली होत्या त्या देखील सार्थकी लागल्या आहेत.

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी