शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे बियाणे निघाले बोगस; कृषी विभाग कंपन्यांना कोर्टात खेचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 16:46 IST

कृषी विभागाने सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी करण्याचे आवाहन केले होते.

ठळक मुद्देजालना जिल्ह्यात ३६ पैकी २४ नमुने अप्रमाणित उगवण क्षमता ७० टक्क्यापेक्षा कमी२ हजार ७३१ शेतकऱ्यांना करावी लागली दुबार पेरणी

- दीपक ढोले

जालना : जिल्ह्यात खरीप हंगामात बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीनचे बियाणे उगवले नव्हते. कृषी विभागाने सदर बियाणाचे ३६ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यापैकी २४ नमुने अप्रमाणित आढळून आले असून, संबंधित कंपन्यांवर कृषी विभागातर्फे कोर्ट केसेस दाखल केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.

यंदा जूनच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळत आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या; परंतु बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकरी हतबल झाले होते. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. कृषी विभागाने सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर जिल्हाभरातून तब्बल २,७३१ तक्रारी प्राप्त झाल्या. तालुकास्तरीय समितीने पंचनामे करून नमुने घेतले. यात १,८०९ शेतकऱ्यांच्या बियाण्यात त्रुटी आढळून आल्या. यातील काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना बियाणे व नुकसानभरपाई दिली आहे; परंतु १४ कंपन्यांनी नुकसानभरपाई न दिल्याने त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत.

कृषी विभागाने सोयाबीन बियाणाचे ३६ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यापैकी २४ नमुने अप्रमाणित आढळून आले. बियाण्यात ७० टक्के उगवण क्षमता लागते; परंतु सदरील २४ नमुन्यांत उगवण क्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी आढळल्याने सदरील बियाणे उगवून आले नाही. संबंधित कंपन्यांवर कोर्ट केसेस दाखल केल्या जाणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

२ हजार ७३१ शेतकऱ्यांना करावी लागली दुबार पेरणीशेतकऱ्यांनी जूनच्या प्रारंभीच जोरदार पावसामुळे पेरण्या उरकल्या; परंतु सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. याबाबत जिल्हाभरातून २,७३१ तक्रारी दाखल झाल्या. आधीच कोरोनामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना उसनवारी करून दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही बहुतांश शेतकऱ्यांची सोयाबीन उगवले नाही. 

केवळ १३ कंपन्यांनी दिली भरपाई जवळपास ४१ कंपन्यांचे बियाणे बोगस असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी केवळ १३ कंपन्यांनी ८८ शेतकऱ्यांना बियाणे अथवा पैशाच्या स्वरूपात भरपाई दिली आहे. यात ६१ शेतकऱ्यांना बियाणाची बॅग, तर उर्वरित शेतकऱ्यांना ३ लाख २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली. 

केसेस दाखल करणार जिल्हाभरातून सोयाबीन न उगवल्याच्या २,७३१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आम्ही आधीच १४ कंपन्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. बियाणांचे ३६ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यापैकी २४ नमुने अप्रमाणित आले आहेत. संबंधित कंपन्यांवर  केसेस दाखल करण्यात येणार आहेत.     - भीमराव रणदिवे, कृषी विकास अधिकारी, जि.प. जालना

तालुकानिहाय प्राप्त तक्रारीतालुका    प्राप्त तक्रारीजालना     २२३बदनापूर    ४३मंठा    ९०७अंबड    १३३घनसावंगी    ३९६जालना    २७भोकरदन    ५५परतूर    ९४७एकूण    २७३१ 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी