शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सोयाबीनचे बियाणे निघाले बोगस; कृषी विभाग कंपन्यांना कोर्टात खेचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 16:46 IST

कृषी विभागाने सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी करण्याचे आवाहन केले होते.

ठळक मुद्देजालना जिल्ह्यात ३६ पैकी २४ नमुने अप्रमाणित उगवण क्षमता ७० टक्क्यापेक्षा कमी२ हजार ७३१ शेतकऱ्यांना करावी लागली दुबार पेरणी

- दीपक ढोले

जालना : जिल्ह्यात खरीप हंगामात बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीनचे बियाणे उगवले नव्हते. कृषी विभागाने सदर बियाणाचे ३६ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यापैकी २४ नमुने अप्रमाणित आढळून आले असून, संबंधित कंपन्यांवर कृषी विभागातर्फे कोर्ट केसेस दाखल केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.

यंदा जूनच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळत आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या; परंतु बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकरी हतबल झाले होते. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. कृषी विभागाने सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर जिल्हाभरातून तब्बल २,७३१ तक्रारी प्राप्त झाल्या. तालुकास्तरीय समितीने पंचनामे करून नमुने घेतले. यात १,८०९ शेतकऱ्यांच्या बियाण्यात त्रुटी आढळून आल्या. यातील काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना बियाणे व नुकसानभरपाई दिली आहे; परंतु १४ कंपन्यांनी नुकसानभरपाई न दिल्याने त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत.

कृषी विभागाने सोयाबीन बियाणाचे ३६ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यापैकी २४ नमुने अप्रमाणित आढळून आले. बियाण्यात ७० टक्के उगवण क्षमता लागते; परंतु सदरील २४ नमुन्यांत उगवण क्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी आढळल्याने सदरील बियाणे उगवून आले नाही. संबंधित कंपन्यांवर कोर्ट केसेस दाखल केल्या जाणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

२ हजार ७३१ शेतकऱ्यांना करावी लागली दुबार पेरणीशेतकऱ्यांनी जूनच्या प्रारंभीच जोरदार पावसामुळे पेरण्या उरकल्या; परंतु सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. याबाबत जिल्हाभरातून २,७३१ तक्रारी दाखल झाल्या. आधीच कोरोनामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना उसनवारी करून दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही बहुतांश शेतकऱ्यांची सोयाबीन उगवले नाही. 

केवळ १३ कंपन्यांनी दिली भरपाई जवळपास ४१ कंपन्यांचे बियाणे बोगस असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी केवळ १३ कंपन्यांनी ८८ शेतकऱ्यांना बियाणे अथवा पैशाच्या स्वरूपात भरपाई दिली आहे. यात ६१ शेतकऱ्यांना बियाणाची बॅग, तर उर्वरित शेतकऱ्यांना ३ लाख २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली. 

केसेस दाखल करणार जिल्हाभरातून सोयाबीन न उगवल्याच्या २,७३१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आम्ही आधीच १४ कंपन्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. बियाणांचे ३६ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यापैकी २४ नमुने अप्रमाणित आले आहेत. संबंधित कंपन्यांवर  केसेस दाखल करण्यात येणार आहेत.     - भीमराव रणदिवे, कृषी विकास अधिकारी, जि.प. जालना

तालुकानिहाय प्राप्त तक्रारीतालुका    प्राप्त तक्रारीजालना     २२३बदनापूर    ४३मंठा    ९०७अंबड    १३३घनसावंगी    ३९६जालना    २७भोकरदन    ५५परतूर    ९४७एकूण    २७३१ 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी