शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सगेसोयऱ्यांबाबत कोणीतरी मुख्यमंत्र्यांना निर्णय घेऊ देत नाही; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

By शिवाजी कदम | Updated: February 20, 2024 19:30 IST

सरकारने फसवलं, सगेसोयऱ्याच्या कायद्याला बगल दिल्याने पुन्हा आंदोलनाची दिशा ठरणार: मनोज जरांगे

वडीगोद्री : राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. पण, आज अधिवेशनात घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. सरकारने सगेसोयऱ्यांच्या कायद्याला बगल देऊन १० टक्के आरक्षणाचा कायदा केला आहे. हा कायदा करण्याची कोणीच मागणी केलेली नसताना हे पाऊल सरकारने उचलले आहे, हे आम्हाला मान्य नाही. बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी आयोजित बैठकीत सांगितले. तसेच सगेसोयऱ्यांबाबत कोणीतरी मुख्यमंत्र्यांना निर्णय घेऊ देत नाही, असा गंभीर आरोप देखील जरांगे यांनी यावेळी केला.

आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण पाहिजे, आम्हाला टिकेल की नाही या लफड्यात पडायचं नाही. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे. जे पाहिजे ते आम्ही मिळवणारच आहोत. यासाठी मंगळवारी होणाऱ्या बैठकीसाठी मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. आमच्या हक्काच्या ओबीसीमधील आरक्षणाची मागणी आहे. त्याची अंमलबजावणी पाहिजे. आम्ही त्या मागणीवर ठाम आहोत. उगाच समाजाचा अपमान करायचा हे योग्य नाही. सरकारने विशेष अधिवेशनात सगेसोयऱ्यांच्या मागणीवर निर्णय घ्यायला पाहिजे होता. यासाठी आक्रोश करतोय त्या माता-माउलींची चेष्टा सरकार करत आहे. आम्ही आधीही स्वागत केले होते. आताही स्वागत करतो; पण आमच्या हक्काचे आरक्षण द्या, यापूर्वीही सांगितले होते. ते नाकारण्याचे काही कारणच नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

घाईगडबड नाहीच आहे. हरकती तपासण्यासाठी यंत्रणा आहे. आणखी मनुष्यबळ वाढवा. आम्ही संयमी आहोत. उद्या आमचा निर्णय ठरल्यावर त्यांना आमची भावना कळेल. आम्हाला आज हा दिवस बघायला लावला. अंमलबजावणी पाहिजे. हा हट्टीपणा नाहीये अधिकार आहे. सरकारने केलेल्या कायद्यामुळे पोरांचे काही कल्याण होणार नाही. मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवला नसता तर इतके दिवस आंदोलन चाललेच नसते. मी लेकरांचे वाटोळे नाही करू शकत. त्यांना मर्यादा आहे तशाच आम्हालाही आहेत, असे मनोज जरांगे म्हणाले. सरकारशी आमची वैयक्तिक काही वैर नाहीये, आंदोलनाची दिशा ठरली की, सगळे उडवणार आहेत. सगेसोयऱ्यांबाबत कोणीतरी मुख्यमंत्र्यांना काम करू देत नसल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी लावला आहे.

उपचार नाकारलेमनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सलाइन काढून घ्या असे म्हणत हाताला टाकलेली सलाइन स्वतः काढण्याचा प्रयत्न केला. आता सरकारचे उपचार बंद, असे जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना