शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

जालन्यात लघु, मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:14 IST

जालना जिल्ह्यात यंदा दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता जलसंकट मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देगुरांचा पाणी प्रश्न गंभीर : अनेक गावांची तहान भागवणे झाले अवघड, टँकर भरण्यासाठी विहिरींचाच आधार

जालना : जालना जिल्ह्यात यंदा दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता जलसंकट मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे. फ्रेबु्रवारीच्या मध्यातच जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने गुरांसह माणसांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.जालना जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात आज घडीला १.२६ तर ५७ लघु प्रकल्पात सध्या केवळ १.३५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प कोरडे असून, ३ प्रकल्पांमध्ये पाणीपातळी ही जोत्याच्या पातळीखाली आहे. लघु प्रकल्पांचा विचार केल्यास त्यातील ३७ तलाव हे कोरडे पडले आहेत. १४ तलावांची पाणी पातळी ही जोत्याखाली आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये मिळून खूपच कमी पाणी शिल्लक असल्याने शेतकरी आणि विशेष करून पशुपालक भयभीत झाले आहेत.जालना जिल्ह्यात यंदा केवळ ६१ टक्केच पर्जन्यमान झाले आहे. त्याचा मोठा परिणाम पिकांसह पाण्याच्या साठवणूकीवर झाला आहे. विहिरींची पाणीपातळी खोल गेल्याने अनेक शेतकरी उभे-आडवे बोअर त्यात घेऊन जास्तीत जास्त भूगर्भातील पाणीसाठा कसा वापरता येईल याकडे वळले आहेत. अनेक गावांमध्ये हातपंप घेण्यासाठी गाड्या जात आहेत. मात्र ३०० ते ४०० फूट खोलवर जाऊनही पक्के पाणी लागत नसल्याचे दिसून आले. एकूणच जालना जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची अवस्था पुढील काही महिन्यांत आणखी गंभीर होणार आहे.बाष्पीभवनाचाही परिणामजालना जिल्ह्यात पाऊस कमी पडला हे वास्तव आहे. परंतु मध्यंतरी कडक उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने देखील तलावातील पाणीपातळी घटल्याचे सांगण्यात आले. त्यातच मध्यंतरी अनेक शेतकºयांनी आहे, त्या पाण्यातून विद्युत मोटीरींच्या मदतीने पाणीचोरी केल्याचे प्रकारही सर्रासपणे घडले. आता तर हे सर्व प्रकल्प कोरडे पडल्याने गुरांचा पाणीप्रश्न मोठा गंभीर बनला आहे.

टॅग्स :Jalanaजालनाwater shortageपाणीटंचाई