शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात लघु, मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:14 IST

जालना जिल्ह्यात यंदा दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता जलसंकट मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देगुरांचा पाणी प्रश्न गंभीर : अनेक गावांची तहान भागवणे झाले अवघड, टँकर भरण्यासाठी विहिरींचाच आधार

जालना : जालना जिल्ह्यात यंदा दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता जलसंकट मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे. फ्रेबु्रवारीच्या मध्यातच जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने गुरांसह माणसांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.जालना जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात आज घडीला १.२६ तर ५७ लघु प्रकल्पात सध्या केवळ १.३५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प कोरडे असून, ३ प्रकल्पांमध्ये पाणीपातळी ही जोत्याच्या पातळीखाली आहे. लघु प्रकल्पांचा विचार केल्यास त्यातील ३७ तलाव हे कोरडे पडले आहेत. १४ तलावांची पाणी पातळी ही जोत्याखाली आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये मिळून खूपच कमी पाणी शिल्लक असल्याने शेतकरी आणि विशेष करून पशुपालक भयभीत झाले आहेत.जालना जिल्ह्यात यंदा केवळ ६१ टक्केच पर्जन्यमान झाले आहे. त्याचा मोठा परिणाम पिकांसह पाण्याच्या साठवणूकीवर झाला आहे. विहिरींची पाणीपातळी खोल गेल्याने अनेक शेतकरी उभे-आडवे बोअर त्यात घेऊन जास्तीत जास्त भूगर्भातील पाणीसाठा कसा वापरता येईल याकडे वळले आहेत. अनेक गावांमध्ये हातपंप घेण्यासाठी गाड्या जात आहेत. मात्र ३०० ते ४०० फूट खोलवर जाऊनही पक्के पाणी लागत नसल्याचे दिसून आले. एकूणच जालना जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची अवस्था पुढील काही महिन्यांत आणखी गंभीर होणार आहे.बाष्पीभवनाचाही परिणामजालना जिल्ह्यात पाऊस कमी पडला हे वास्तव आहे. परंतु मध्यंतरी कडक उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने देखील तलावातील पाणीपातळी घटल्याचे सांगण्यात आले. त्यातच मध्यंतरी अनेक शेतकºयांनी आहे, त्या पाण्यातून विद्युत मोटीरींच्या मदतीने पाणीचोरी केल्याचे प्रकारही सर्रासपणे घडले. आता तर हे सर्व प्रकल्प कोरडे पडल्याने गुरांचा पाणीप्रश्न मोठा गंभीर बनला आहे.

टॅग्स :Jalanaजालनाwater shortageपाणीटंचाई