शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

साठ वर्षात कर्ज बुडव्यांना देशाबाहेर जाऊ दिले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:58 IST

काँग्रेसने साठ वर्षात शत्रू देशांना धडा शिकवण्याबरोबरच एकाही कर्ज बुडव्याला देश सोडून जाऊ दिले नसल्याची घणाघती टीका खा. राजीव सातव यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर/ वाटूर : काँग्रेसने साठ वर्षात शत्रू देशांना धडा शिकवण्याबरोबरच एकाही कर्ज बुडव्याला देश सोडून जाऊ दिले नसल्याची घणाघती टीका खा. राजीव सातव यांनी केली. वाटूर फाटा येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त काँग्रेस पक्षाकडून विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून खा. राजीव सातव हे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. डी. पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, रामप्रसाद बोराडे, माजी खा. तुकाराम रेंगे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. कैलास गोरंटयाल, माजी आ. धोंडीराम राठोड, राजाभाऊ देशमुख, प्रा. सत्संग मुढे, आर. आर. खडके, भीमराव डोंगरे उपस्थित होते.यावेळी खा. सातव म्हणाले की, भाजपा सरकारमधील नेते नेहमी आपल्या भाषणात एकच विचारतात, काँग्रेसने साठ वर्षात काय केले? परंतु आम्ही तुमच्यासारखे विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखे कोट्यवधींच्या कर्ज बुड्यांना देश सोडून जाऊ दिले नाही. तसेच बँकांची कधीच एवढी दुरवस्था होऊ दिली नाही. नोटाबंदी करून यांच्याच नेत्यांनी व बॅकांनी घोटाळे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथविधीला बोलवले. आमचे मनमोहन सिंग दहा वर्षे या देशाचे पंतप्रधान राहिले पण त्यांनी पाकिस्तानात पाय ठेवला नाही. स्व. इंदिरा गांधीनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. या सरकारने छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मोडीत काढले असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष या जिल्ह्याचे आहेत. परंतु येथे शेतकऱ्यांना कर्जमाफीचाही लाभ मिळत नाही, पीकविमा नाही, बँका शेतक-यांना दारात उभे करायला तयार नाहीत. शेतकºयांचे कर्ज तुम्हाला माहीत नाही. या मतदार संघात सत्ताधारी स्वत:चे घर भरण्याचे काम करीत असल्याचेही सातव यांनी सांगितले. यावेळी मा. आ. सुरेशकुमार जेथलिया म्हणाले की, काँग्रेसची ताकद वाढत आहे. सत्ताधारी मनमानीपणे कारभार करीत आहेत. शेतकरी, सर्वसामान्य माणूस आज त्रस्त आहे. सर्वानी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :congressकाँग्रेसShahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंती