शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
3
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
4
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
5
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
6
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
7
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
8
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
10
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
11
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
12
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
13
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?
14
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
15
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
16
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
17
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
18
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
19
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
20
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक

‘साहेब... अवकाळी पावसाने सर्वच हिरावले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:27 IST

आम्हाला एकरी किमान २० हजाराची मदत मिळावी अशी मागणी जालना तालुक्यातील दरेगाव येथील महिला शेतकरी शांताबाई शेळके यांनी केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांकडे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवकाळी पावसाने हातातोंडांशी आलेला घास हिरवाल्याने आमचे मोठे नुकसान झाले आहे. आता शिल्लक कपाशी वेचण्यासाठी मजूर मिळणेही अवघड झाले आहे, रबी पेरणीही आता शक्य नसल्याने आम्हाला एकरी किमान २० हजाराची मदत मिळावी अशी मागणी जालना तालुक्यातील दरेगाव येथील महिला शेतकरी शांताबाई शेळके यांनी केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांकडे केली.यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी कपाशी, मका तसेच बाजरीची पाहणी केली. तर गवळी पोखरी शिवारातील द्राक्ष बागांचीही पथकाने पाहणी केली. रविवारी या पथकाने कडेगाव, चांदई एक्को, अकालादेव येथेही भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली.या पाहणी पथकाचे प्रमुख केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव डॉ. वी. तिरुपगल व त्यांच्यासोबत डॉ. के मनोहरण, उपायुक्त संदानंद टाकसाळे, विभागीय सहसंचालक कृषी साहेबराव दिवेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा आरोरा, जिल्हा कृषी अधिक्षक बाबासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक विजय माईनकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, तालुका कृषी अधिकारी सुखदेव, तलाठी आय. बी. सरोदे आदींची उपस्थिती होती.यावेळी दरेगाव येथील मका उत्पादनक शेतकरी कैलास ढवळे यांच्या शेतात मका तसाच पडून होता. आता तुम्ही रबीची पेरणी करणार काय, यावर शेतक-यांनी आता वेळ निघून गेल्याचे सांगून आता हे शक्य नसल्याचे सांगितले. दरेगाव येथील शांताबाई शेळके यांच्या शेतातील कपाशीची पाहणी केली. शेतात जातांना आजही पाण्याचा वापसा न झाल्याने अधिका-यांना चिखालतून मार्ग काढावा लागला.यावेळी दीड एकर कापूस आम्ही लावला होता, असे सांगून यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याचे सांगितले. कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याची बाबही पथकाच्या लक्षात आणून देण्यात आली.यावेळी साहेबराव दिवेकर हे शेतक-यांना मराठीतून प्रश्न विचारून नंतर ते पथकातील अधिकाºयांना इंग्रजीतून भाषांतर करून सांगत होते. पीकविमा काढला आहे काय असा सवालही यावेळी पथकातील अधिका-यांनी केल्याचे दिसून आले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.नुकसान : द्राक्ष बागांची स्थिती दिसली गंभीरजालना तालुक्यातीलच गवळी पोखरी शिवारातील द्राक्ष बागांची पाहणीही पथकाने केली. यावेळी दीपक गंडाळ यांच्या द्राक्ष बागेत जाऊन पाहणी केली. त्यावेळी देखील मोठे विदारक चित्र त्यांना दिसून आले. गवळी पोखरी गावात न जाता रस्त्यावरील शिवारातच अधिका-यांच्या गाड्यांचा ताफा थांबून त्यांनी अवघ्या दहा मिनिटातच एक, दोन प्रश्नोत्तर विचारून पथक सुसाट निघून गेले. यावेळी गवळी पोखरीचे सरपंच गणेश वाघमारे, रवी कायंदे, कृषी सेवक विधाते, तलाठी चाळणेवार आदींसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी