शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

"फडणवीस साहेब, तोंडग्यासाठी बैठक बोलवता, की मराठ्यांविषयी द्वेष ओकायला": मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 18:21 IST

फडणवीस साहेब, तुम्हाला हे राज्य रक्तबंबाळ करायचं आहे का? मनोज जरांगे यांचा संतापजनक सवाल 

- पवन पवार

वडीगोद्री( जालना): फडणवीस साहेब, तुम्ही नेमकी तोडगा काढायला बैठक बोलवता, की मराठ्यांविषयी द्वेष ओकायला, तुम्हाला राज्य रक्तबंबाळ करायचे आहे का? असा सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. त्यांनी अंतरवाली सराटी येथे आज दुपारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

जरांगे पुढे म्हणाले, फडणवीस साहेब, तुम्हाला हे राज्य रक्तबंबाळ करायचं आहे का ? नेमकी तुमचं काय चाललं हेच कळत नाही. आमच्या सगेसोयऱ्यांना मराठ्यांना त्रास द्यायचा. फडणवीस साहेब, तुमचे पण सोयरे आहे राज्यात. आम्ही त्रास देत नाही त्यांना. एवढा मोठा उच्च दर्जाचा भाजपचा नेता मराठ्यांविषयी डाव करतोय. मला तर फडणवीस साहेबांच आश्चर्य वाटायला लागलय. मराठा समाजाला गोड गोड बोलायचं अन् ओबीसी नेते मराठ्यांच्या अंगावर घालायचे, असा फडणवीस साहेबांचा डाव दिसतोय.  फडणवीस यांनी इतके 'छिछोरे'  चाळे का करायला पाहिजे, एवढ्या मोठ्या नेत्यांने महाविकास आघाडीची आणि महायुतीची बैठक लावली होती. तेव्हा पासून सगळे विरोधात बोलायला लागले. फडणवीस साहेब तुमचं काय चाललंय मला काही कळत नाही,परत म्हणता मला टार्गेट केल जात. तूम्ही वागतात तसे. तुमच्या बैठकीला आलेले नेते, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतात. आज आमच्यावरच वेळ आली आहे फडणवीस साहेब. एक महिन्याचा वेळ आम्ही त्यांना दिला होता, पण २० जुलै रोजीपासून बेमुदत उपोषण करण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे. यावेळी उपोषण कठोर करणार आहे.

मराठ्यांची एससी एसटीच्या आरक्षणाची मागणीच नाहीप्रकाश आंबेडकर साहेब, प्रत्येक वेळी मार्ग सांगायचे, तुम्हाला सलाईनमधून विष घालतील म्हणायचे, तेच आज इतकं शॉकिंग वागत आहेत. आंबेडकर साहेब पण म्हणाले सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करू नका, त्यांचा पक्ष म्हणतो की नोंदी रद्द करा. मराठ्यांची एससी एसटीच्या आरक्षणाची मागणीच नाही, असही जरांगे पाटील म्हणाले. तसेच ओबीसीच्या सर्व नेत्यांना आणि प्रकाश आंबेडकर साहेबांना सगळ्यांनाच कळकळीने बोलतोय फडणवीस साहेब माणूस विचित्र दिसतोय मला आपण गरिबांसाठी लढू, त्यांच्या फाश्यात फासून गोरगरीब जनतेला काहीच मिळणार नाही माझी खरंच विनंती आहे, गोरगरीब मराठ्यांना गोरगरीब दलितांना आपण एकत्र आल पाहिजे, आपण आपल्यालाच न्याय देऊ शकतो. विधानसभेला एकत्र यायला पाहिजे का यावर बोलताना जरांगे म्हणाले की, येणार आहे का नाही मला माहित नाही. आम्ही त्यांना विरोधक मानलं नाही. आताची वक्तव्य बघितली तर गरिबांना कसा न्याय मिळणार. न्याय देण्यासाठी एकत्र यावं लागेल.ते बोलायला तयार नाही, अंमलबजावणी रद्द करा म्हणतात हे अपेक्षीत नाही आम्हाला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना