शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

"फडणवीस साहेब, तोंडग्यासाठी बैठक बोलवता, की मराठ्यांविषयी द्वेष ओकायला": मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 18:21 IST

फडणवीस साहेब, तुम्हाला हे राज्य रक्तबंबाळ करायचं आहे का? मनोज जरांगे यांचा संतापजनक सवाल 

- पवन पवार

वडीगोद्री( जालना): फडणवीस साहेब, तुम्ही नेमकी तोडगा काढायला बैठक बोलवता, की मराठ्यांविषयी द्वेष ओकायला, तुम्हाला राज्य रक्तबंबाळ करायचे आहे का? असा सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. त्यांनी अंतरवाली सराटी येथे आज दुपारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

जरांगे पुढे म्हणाले, फडणवीस साहेब, तुम्हाला हे राज्य रक्तबंबाळ करायचं आहे का ? नेमकी तुमचं काय चाललं हेच कळत नाही. आमच्या सगेसोयऱ्यांना मराठ्यांना त्रास द्यायचा. फडणवीस साहेब, तुमचे पण सोयरे आहे राज्यात. आम्ही त्रास देत नाही त्यांना. एवढा मोठा उच्च दर्जाचा भाजपचा नेता मराठ्यांविषयी डाव करतोय. मला तर फडणवीस साहेबांच आश्चर्य वाटायला लागलय. मराठा समाजाला गोड गोड बोलायचं अन् ओबीसी नेते मराठ्यांच्या अंगावर घालायचे, असा फडणवीस साहेबांचा डाव दिसतोय.  फडणवीस यांनी इतके 'छिछोरे'  चाळे का करायला पाहिजे, एवढ्या मोठ्या नेत्यांने महाविकास आघाडीची आणि महायुतीची बैठक लावली होती. तेव्हा पासून सगळे विरोधात बोलायला लागले. फडणवीस साहेब तुमचं काय चाललंय मला काही कळत नाही,परत म्हणता मला टार्गेट केल जात. तूम्ही वागतात तसे. तुमच्या बैठकीला आलेले नेते, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतात. आज आमच्यावरच वेळ आली आहे फडणवीस साहेब. एक महिन्याचा वेळ आम्ही त्यांना दिला होता, पण २० जुलै रोजीपासून बेमुदत उपोषण करण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे. यावेळी उपोषण कठोर करणार आहे.

मराठ्यांची एससी एसटीच्या आरक्षणाची मागणीच नाहीप्रकाश आंबेडकर साहेब, प्रत्येक वेळी मार्ग सांगायचे, तुम्हाला सलाईनमधून विष घालतील म्हणायचे, तेच आज इतकं शॉकिंग वागत आहेत. आंबेडकर साहेब पण म्हणाले सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करू नका, त्यांचा पक्ष म्हणतो की नोंदी रद्द करा. मराठ्यांची एससी एसटीच्या आरक्षणाची मागणीच नाही, असही जरांगे पाटील म्हणाले. तसेच ओबीसीच्या सर्व नेत्यांना आणि प्रकाश आंबेडकर साहेबांना सगळ्यांनाच कळकळीने बोलतोय फडणवीस साहेब माणूस विचित्र दिसतोय मला आपण गरिबांसाठी लढू, त्यांच्या फाश्यात फासून गोरगरीब जनतेला काहीच मिळणार नाही माझी खरंच विनंती आहे, गोरगरीब मराठ्यांना गोरगरीब दलितांना आपण एकत्र आल पाहिजे, आपण आपल्यालाच न्याय देऊ शकतो. विधानसभेला एकत्र यायला पाहिजे का यावर बोलताना जरांगे म्हणाले की, येणार आहे का नाही मला माहित नाही. आम्ही त्यांना विरोधक मानलं नाही. आताची वक्तव्य बघितली तर गरिबांना कसा न्याय मिळणार. न्याय देण्यासाठी एकत्र यावं लागेल.ते बोलायला तयार नाही, अंमलबजावणी रद्द करा म्हणतात हे अपेक्षीत नाही आम्हाला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना