शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

"फडणवीस साहेब, तोंडग्यासाठी बैठक बोलवता, की मराठ्यांविषयी द्वेष ओकायला": मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 18:21 IST

फडणवीस साहेब, तुम्हाला हे राज्य रक्तबंबाळ करायचं आहे का? मनोज जरांगे यांचा संतापजनक सवाल 

- पवन पवार

वडीगोद्री( जालना): फडणवीस साहेब, तुम्ही नेमकी तोडगा काढायला बैठक बोलवता, की मराठ्यांविषयी द्वेष ओकायला, तुम्हाला राज्य रक्तबंबाळ करायचे आहे का? असा सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. त्यांनी अंतरवाली सराटी येथे आज दुपारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

जरांगे पुढे म्हणाले, फडणवीस साहेब, तुम्हाला हे राज्य रक्तबंबाळ करायचं आहे का ? नेमकी तुमचं काय चाललं हेच कळत नाही. आमच्या सगेसोयऱ्यांना मराठ्यांना त्रास द्यायचा. फडणवीस साहेब, तुमचे पण सोयरे आहे राज्यात. आम्ही त्रास देत नाही त्यांना. एवढा मोठा उच्च दर्जाचा भाजपचा नेता मराठ्यांविषयी डाव करतोय. मला तर फडणवीस साहेबांच आश्चर्य वाटायला लागलय. मराठा समाजाला गोड गोड बोलायचं अन् ओबीसी नेते मराठ्यांच्या अंगावर घालायचे, असा फडणवीस साहेबांचा डाव दिसतोय.  फडणवीस यांनी इतके 'छिछोरे'  चाळे का करायला पाहिजे, एवढ्या मोठ्या नेत्यांने महाविकास आघाडीची आणि महायुतीची बैठक लावली होती. तेव्हा पासून सगळे विरोधात बोलायला लागले. फडणवीस साहेब तुमचं काय चाललंय मला काही कळत नाही,परत म्हणता मला टार्गेट केल जात. तूम्ही वागतात तसे. तुमच्या बैठकीला आलेले नेते, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतात. आज आमच्यावरच वेळ आली आहे फडणवीस साहेब. एक महिन्याचा वेळ आम्ही त्यांना दिला होता, पण २० जुलै रोजीपासून बेमुदत उपोषण करण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे. यावेळी उपोषण कठोर करणार आहे.

मराठ्यांची एससी एसटीच्या आरक्षणाची मागणीच नाहीप्रकाश आंबेडकर साहेब, प्रत्येक वेळी मार्ग सांगायचे, तुम्हाला सलाईनमधून विष घालतील म्हणायचे, तेच आज इतकं शॉकिंग वागत आहेत. आंबेडकर साहेब पण म्हणाले सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करू नका, त्यांचा पक्ष म्हणतो की नोंदी रद्द करा. मराठ्यांची एससी एसटीच्या आरक्षणाची मागणीच नाही, असही जरांगे पाटील म्हणाले. तसेच ओबीसीच्या सर्व नेत्यांना आणि प्रकाश आंबेडकर साहेबांना सगळ्यांनाच कळकळीने बोलतोय फडणवीस साहेब माणूस विचित्र दिसतोय मला आपण गरिबांसाठी लढू, त्यांच्या फाश्यात फासून गोरगरीब जनतेला काहीच मिळणार नाही माझी खरंच विनंती आहे, गोरगरीब मराठ्यांना गोरगरीब दलितांना आपण एकत्र आल पाहिजे, आपण आपल्यालाच न्याय देऊ शकतो. विधानसभेला एकत्र यायला पाहिजे का यावर बोलताना जरांगे म्हणाले की, येणार आहे का नाही मला माहित नाही. आम्ही त्यांना विरोधक मानलं नाही. आताची वक्तव्य बघितली तर गरिबांना कसा न्याय मिळणार. न्याय देण्यासाठी एकत्र यावं लागेल.ते बोलायला तयार नाही, अंमलबजावणी रद्द करा म्हणतात हे अपेक्षीत नाही आम्हाला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना