शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

रेशीम कोश : विक्रमी भाव मिळाल्याने शेतकरी मालामाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:33 IST

त्याचे चांगले परिणाम दिसून येत असून, बुधवारी जालन्यातील रेशीम बाजारपेठेत थेट शंभर क्विंटल आवक झाली असून, विक्रमी भाव म्हणजे ...

त्याचे चांगले परिणाम दिसून येत असून, बुधवारी जालन्यातील रेशीम बाजारपेठेत थेट शंभर क्विंटल आवक झाली असून, विक्रमी भाव म्हणजे प्रतिक्विंटल ४५ हजार रुपयांचा दर मिळाला आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकऱ्याला आज मोठे समाधान वाटल्याचे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी घेतला पुढाकार

रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वी त्यांनी उत्पादित केलेला रेशीम कोश विक्रीसाठी थेट कर्नाटक राज्यातील रामनगर येथे जावे लागत होते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक ओढाताणीसह तेथे चांगले दर न मिळाल्यास मोठे नुकसान सहन करावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन आपण मंत्री असताना जालन्यातील बाजार समितीत महाराष्ट्रातील पहिली रेशीम कोश खरेदीची बाजारपेठ सुरू केली. आज रेशीम कोशाला जो विक्रमी भाव मिळाला आहे, त्यामुळे आमच्या उपक्रमाचे चीज झाले आहे.

अर्जुन खोतकर, माजी मंत्री तथा सभापती बाजार समिती, जालना

चौकट

२६ कोटींची उलाढाल

जालन्यातील या रेशीम कोश खरेदी बाजारपेठेत गेल्या तीन वर्षात जवळपास बारा हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रेशीम कोशाची विक्री केली. त्यातून या बाजारपेठेतील ही उलाढाल जवळपास २६ कोटी २४ लाख रुपयांवर झाली असल्याची माहिती जालना कृषी बाजार समितीचे सचिव रजनीकांत इंगळे यांनी दिली.