शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

धक्कादायक ! जिल्ह्यात एकाच महिन्यात आठ खून; सर्व गुन्ह्यांचा उलगडा, काही आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 14:25 IST

वाढत्या बेरोजगारीमुळे जिल्ह्यात‎ गुन्ह्यांची संख्या वाढत चालली‎ आहे.

जालना : अनैतिक संबंध, मालमत्ता,‎ कौटुंबिक कलह, शेती, आर्थिक‎ व्यवहार अशा विविध प्रकारांतील‎ वाद विकोपाला गेल्यामुळे गेल्या महिन्याभरात जालना जिल्ह्यात तब्बल ८ खून झाले आहेत. त्यापैकी सर्व खुनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असले तरी काही खुनांतील आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. एकाच महिन्यांत आठ खून झाल्यामुळे जिल्हा हादरून गेला आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे जिल्ह्यात‎ गुन्ह्यांची संख्या वाढत चालली‎ आहे. जालना पोलीस दलाकडून गुन्हे नियंत्रणात ठेवण्याच्या अनुषंगाने कारवाया केल्या जात आहेत.

मार्च महिन्यात जिल्ह्यात खुनांची मालिकाच पाहायला मिळाली. एकापाठोपाठ तब्बल सात खून १५ दिवसांत झालेत. त्यानंतर एक खून झाला आहे. एक महिला व सात पुरुषांचे खून झाले आहेत.

तीन महिन्यांत १६ खूनगेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात १६ खून झाले आहेत. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांत केवळ ८ खून झाले होते, तर एकट्या मार्च महिन्यात ८ खून झाले आहेत.

अशा घडल्या खुनाच्या घटना१) वडिलोपार्जित शेती बळकावल्याच्या कारणावरून जालना तालुक्यातील मोहाडी छबू घासू राठोड (५३) यांचा पुतण्यानेच खून केला होता.२) भांडणातून मित्रानेच भगवान राजू तळेकर (२३) या चालकाचा खून केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी पाटीजवळ घडली होती.३) पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून रोहिदास लक्ष्मण खरात (४०) यांचा खून केल्याची घटना परतूर तालुक्यातील कोकाटे हदगाव येथे घडली होती.४) अंबड शहरातील रामेश्वर अंकुश खरात (२०) या तरूणाचा खून करण्यात आला.५) जालना तालुक्यातील डुकरी पिंपरी येथे बैल चोरीच्या संशयावरून शेजाऱ्यानेच सोमीनाथ श्यामराव जाधव ( ४३) यांचा खून केला होता.६) शेजारी राहणाऱ्या महिलेने साथीदारासह जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथील महिला सुमनबाई माणिक जिगे (६५) यांचा खून केला होता.७) जालना तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी राजकुमार भास्कर साळवे (३२) यांचा खून करण्यात आला होता.८) आर्थिक देवाण-घेवाणीवरून फुलंब्री येथील राजेश मुरलीधर जाधव (४२) यांचा खून करून मृतदेह परतूर तालुक्यातील मांडवा परिसरात आणून टाकला होता. या खुनातील आरोपी अद्यापही मोकाटच आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना