शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून युती सरकारचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:39 IST

पूर परिस्थिती, मराठवाड्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या यासह बेरोजगारीकडे दुर्लक्ष करून गुन्हेगार, भ्रष्टाचाराचे आरोप असणा-या भाजप पवित्र करून घेत आहेत, अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी केली.

ठळक मुद्देसभा : पवार, मुंढेंकडून सरकारचे वाभाडे

बदनापूर/भोकरदन : राज्य सरकारची महाजनादेश यात्रा ही मुख्यमंत्री फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी असून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वाद यात्रेतून ते स्वत:ला आगामी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करीत आहेत. पूर परिस्थिती, मराठवाड्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या यासह बेरोजगारीकडे दुर्लक्ष करून गुन्हेगार, भ्रष्टाचाराचे आरोप असणा-या भाजप पवित्र करून घेत आहेत, अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी केली.राष्टÑवादी काँग्रेसकडून संपूर्ण राज्यभर शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांवर टिकेची झोड उठविली जात असून या योजना कशा फसव्यात आहेत, हे उदाहरणांसह दाखवून दिले जात आहे. सोमवारी राष्टÑवादी काँग्रेसची शिवराज्य यात्रा अनुक्रमे बदनापूर आणि भोकरदन येथे पोहोचली होती. दोन्ही ठिकाणी नागरिकांचा भरघोस प्रतिसाद या सभांना मिळाला.यावेळी अजित पवार यांनी बदनापूर येथे बोलताना सांगितले की, भूलथापा मारून सरकार सत्तेवर आले आहे. आज बदनापूरमध्ये साधे बसस्थानकही नसून गेल्या पाच वर्षांत त्यांनी काय केले? असा प्रश्न केला. तसेच आमची सत्ता आल्यास तेलंगणाच्या धर्तीवर ७५ टक्के नोकºया या स्थानिकांना देण्याचा कायदा करू, असे त्यांनी सांगितले. १६ हजार शेतकऱ्यांनी सरकरच्या चुकीच्या धोरणांमुळे आत्महत्या केल्याचा आरोपही त्यांनी केला.पूरग्रस्त भागाला मुख्यमंत्री तसेच भाजपच्या नेत्यांनी चार दिवसांनंतर भेट दिली. यावरून ते किती संवेदनशील आहेत, हे लक्षात येते. युती सरकारने विकास कामे करून राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज केले असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. धनंजय मुंढे यांनी देखील भोकरदन आणि बदनापूर येथे सरकारच्या धोरणांवर सडकून टिका केली.यावेळी ते म्हणाले की, भाजप म्हणजे काशीमधील पाप धुण्याचा घाट झाला आहे. गुन्हेगारी, भ्रष्टाचाराचे आरोप करून धमकावले जात आहे. या दडपशाहीमुळे अनेक दिग्गज नेते भाजपच्या कंपूमध्ये प्रवेश करीत असल्याचे मुंढे म्हणाले. भोकरदन येथील आ. संतोष दानवे हे दडपशाही करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तत्पुर्वी माजीमंत्री आ. राजेश टोपे, माजी आ अरविंद चव्हाण, राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन गिते, सुरेश खंडाळे, प्रकाश साळुंके, रविंद्र तौर आदिंसह अनेकांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबलु चौधरी, सूत्रसंचलन बाळासाहेब वाकुळणीकर व आभार प्रदर्शन पांडुरंग जºहाड यांनी केले़

टॅग्स :JalanaजालनाAjit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडे