शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून युती सरकारचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:39 IST

पूर परिस्थिती, मराठवाड्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या यासह बेरोजगारीकडे दुर्लक्ष करून गुन्हेगार, भ्रष्टाचाराचे आरोप असणा-या भाजप पवित्र करून घेत आहेत, अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी केली.

ठळक मुद्देसभा : पवार, मुंढेंकडून सरकारचे वाभाडे

बदनापूर/भोकरदन : राज्य सरकारची महाजनादेश यात्रा ही मुख्यमंत्री फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी असून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वाद यात्रेतून ते स्वत:ला आगामी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करीत आहेत. पूर परिस्थिती, मराठवाड्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या यासह बेरोजगारीकडे दुर्लक्ष करून गुन्हेगार, भ्रष्टाचाराचे आरोप असणा-या भाजप पवित्र करून घेत आहेत, अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी केली.राष्टÑवादी काँग्रेसकडून संपूर्ण राज्यभर शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांवर टिकेची झोड उठविली जात असून या योजना कशा फसव्यात आहेत, हे उदाहरणांसह दाखवून दिले जात आहे. सोमवारी राष्टÑवादी काँग्रेसची शिवराज्य यात्रा अनुक्रमे बदनापूर आणि भोकरदन येथे पोहोचली होती. दोन्ही ठिकाणी नागरिकांचा भरघोस प्रतिसाद या सभांना मिळाला.यावेळी अजित पवार यांनी बदनापूर येथे बोलताना सांगितले की, भूलथापा मारून सरकार सत्तेवर आले आहे. आज बदनापूरमध्ये साधे बसस्थानकही नसून गेल्या पाच वर्षांत त्यांनी काय केले? असा प्रश्न केला. तसेच आमची सत्ता आल्यास तेलंगणाच्या धर्तीवर ७५ टक्के नोकºया या स्थानिकांना देण्याचा कायदा करू, असे त्यांनी सांगितले. १६ हजार शेतकऱ्यांनी सरकरच्या चुकीच्या धोरणांमुळे आत्महत्या केल्याचा आरोपही त्यांनी केला.पूरग्रस्त भागाला मुख्यमंत्री तसेच भाजपच्या नेत्यांनी चार दिवसांनंतर भेट दिली. यावरून ते किती संवेदनशील आहेत, हे लक्षात येते. युती सरकारने विकास कामे करून राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज केले असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. धनंजय मुंढे यांनी देखील भोकरदन आणि बदनापूर येथे सरकारच्या धोरणांवर सडकून टिका केली.यावेळी ते म्हणाले की, भाजप म्हणजे काशीमधील पाप धुण्याचा घाट झाला आहे. गुन्हेगारी, भ्रष्टाचाराचे आरोप करून धमकावले जात आहे. या दडपशाहीमुळे अनेक दिग्गज नेते भाजपच्या कंपूमध्ये प्रवेश करीत असल्याचे मुंढे म्हणाले. भोकरदन येथील आ. संतोष दानवे हे दडपशाही करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तत्पुर्वी माजीमंत्री आ. राजेश टोपे, माजी आ अरविंद चव्हाण, राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन गिते, सुरेश खंडाळे, प्रकाश साळुंके, रविंद्र तौर आदिंसह अनेकांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबलु चौधरी, सूत्रसंचलन बाळासाहेब वाकुळणीकर व आभार प्रदर्शन पांडुरंग जºहाड यांनी केले़

टॅग्स :JalanaजालनाAjit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडे