शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

शरद पवारांच्या दौऱ्यामागे; शिवसेनेच्या हिकमत उढाणांना शह देण्यासाठी राजेश टोपेंचा आटापीटा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 17:01 IST

शिवसेनेच्या डॉ. हिकमत उढाण यांनी टोपेंच्याच मतदार संघातील मुरमा येथे चार महिन्यांपूर्वी गुळापासून पावडर निर्मिती करणाऱ्या खासगी कारखान्यांची मुहूर्तमेढ रोवली होती.

जालना : जिल्ह्यातील शिल्लक उसाचा मुद्दा गंभीर बनला आहे, हे खरे आहे. तो जास्तीत जास्त प्रमाणात गाळप व्हावा यासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांनी केलेले प्रयत्नदेखील शेतकऱ्यांसाठी निश्चितच महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे सर्वसामान्यांना दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची क्षमता वाढीसह २५० कोटींच्या नवीन साखर कारखान्याची घोषणा ही दिलासादायक वाटू शकते. आणि तशी आहे देखील. परंतु पडद्याआड झाकून पाहिले असता, एकप्रकारे टोपे यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे नेते डॉ. हिकमत उढाण यांना यातून इशारा देत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पायाभरणीचा श्रीगणेशा केला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

जालना जिल्ह्यात दिवंगत सहकार महर्षी माजी खासदार अंकुशराव टोपे यांनी दूरदृष्टी ठेवून, दोन सहकारी साखर कारखाने, शिक्षण संस्था, सूत गिरणी, काळाची गरज लक्षात घेत जालन्यात अभियांत्रिकी महाविद्याल तसेच बँक उभारून मोठी क्रांतीच केली. शिस्तबध्द पध्दतीने या संस्थांची वाटचाल ही देखील महत्वाची बाब होती. तोच वारसा अंकुशराव टोपे यांचे पुत्र आणि सलग पाचवेळेस आमदार, मंत्री राहिलेले राजेश टोपे हे देखील खंबीरपणे चालवित आहेत. काळाची गरज ओळखून राजेश टोपे हे निर्णय घेतात. सध्या जालना जिल्ह्यात १६ लाख टन ऊस अतिरिक्त बनला आहे. तो गाळपासाठी दररोज साडेसात हजार गाळप करणारा तिसरा कारखाना निर्मितीची घोषणा त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत केली. आणि त्यासाठी सर्व ती मदत करण्याचे आश्वासनही पवारांसह सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावर यांनी जाहीरपणे दिली. यात टोपेंचा प्रांजळपणा आणि शेतकऱ्यांप्रति असलेली त्यांची निष्ठा जरी दिसत असली तरी त्याला राजकीय किनारही आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उढाण यांनी टोपेंच्याच मतदार संघातील मुरमा येथे चार महिन्यांपूर्वी गुळापासून पावडर निर्मिती करणाऱ्या खासगी कारखान्यांची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यामुळे तो उढाण यांचा कारखानाही उसाशी संदर्भातील असून, या भागातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. आणि आपोआप उढाणांना शेतकरी त्यातून जेाडता येऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन टोपे यांनी नवीन कारखान्याची घोषणा केली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

टोपेंचा विरोधकांना धोबी पछाड...आज घडीला राजेश टोपे यांना राष्ट्रवादीतून आव्हान देणारे दुसरे नेतृत्व नाही. सलग पाचवेळेस त्यांनी आमदार म्हणून केलेले कार्य तसेच त्यांच्या वडिलांनी संस्थात्मक पध्दतीने बांधून ठेवलेली जनशक्ती ही टोपेंची बलस्थाने आहेत. त्यांना सध्या तरी पक्षासह अन्य पक्षातूनही टक्कर देणारा नेता नाही. या आधी दिवंगत नेते अंकुशराव टोपे यांना माजी आमदार ॲड. विलास खरात यांनी चांगलीच टक्कर दिली होती. खरात यांनी अंकुशराव टोपेंप्रमाणेच शैक्षणिक संस्था, सहकारी सूत गिरणी, बँकांच्या माध्यमातून मोठे साम्राज्य उभे केलेले आहे. परंतु खरात हे सध्या भाजपमध्ये असून, घनसावंगी मतदार संघ हा युतीत शिवसेनेला सुटला होता. परंतु आता युती नसल्याने खरातांच्या भूमिकेलाही महत्त्व येणार आहे. डॉ. हिकमत उढाण यांनी २०१९ च्या निवडणुकीत टोपेंना अक्षरश: झुंजवले होते. हे टोपे सहजासहजी विसणार नसून, त्या दृष्टीनेच त्यांनी तिसऱ्या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवून उढाणांना शह देण्याचा प्रयत्न चालविला आहे.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalanaजालना