शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

जालन्यावर दुष्काळाची छाया; भर पावसाळ्यात धावताहेत ४३ टँकर, १०९ विहिरींचे अधिग्रहण

By विजय मुंडे  | Updated: August 21, 2023 20:04 IST

जालना जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ४५.८३ टक्के पाऊस झाला आहे.

जालना : ऑगस्ट महिना शेवटच्या टप्प्यात असला तरी वार्षिक सरासरीच्या केवळ ४५ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील पाणीटंचाई कायम असून, २७ गावे, १८ वाड्यांवरील ७२ हजार ३५ नागरिकांची तहान भागविण्यासाठी ४३ टँकर धावत आहेत. शिवाय पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १०९ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे.

चालू वर्षात आजवर वार्षिक सरासरीच्या ४०३.७१ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. परंतु, त्या तुलनेत केवळ २७६.४० मिलिमीटर पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ४५.८३ टक्के पाऊस झाला आहे. आठ-दहा दिवसांनंतर पडणाऱ्या रिमझिम पावसावर खरिपातील पिके तग धरून आहेत. परंतु, पिकांची अपेक्षित वाढ न झाल्याने उत्पादनात ३० ते ४० टक्के घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. एकीकडे खरिपातील पिकांची चिंता असताना दुसरीकडे भर पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना २७ गावे १८ वाड्यांवरील ७२ हजार ३५ नागरिकांना करावा लागत आहे. संबंधित ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी ४३ टँकर धावत असून, त्यांच्या ९७ खेपा मंजूर आहेत. त्याशिवाय टँकरसाठी व टँकरव्यतिरिक्त गावांसाठी अशा एकूण १०९ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा भीषण दुष्काळाच्या छायेत आला असून, पावसाची प्रतीक्षा शेतकरी, सर्वसामान्यांना लागली आहे.

५० प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावरजालना जिल्ह्यात केवळ ७ मध्यम आणि ५७ लघु प्रकल्प आहेत. त्यातील तब्बल ५० प्रकल्पांत मृत पाणीसाठा असून, हे प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. उर्वरित १४ प्रकल्पांत केवळ ७.६५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. हे पाणीही एक महिनाभर पुरेल इतके आहे. यामुळे पाऊस पडला नाही तर पाणीटंचाईची भीषणता वाढणार आहे.

मध्यम प्रकल्पांची स्थिती बिकटजिल्ह्यात सात मध्यम प्रकल्प आहेत. त्यात भोकरदन तालुक्यातील जुई मध्यम प्रकल्प, अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात मृतसाठा आहे. जालना तालुक्यातील कल्याण गिरजा प्रकल्पात ४४ टक्के तर कल्याण मध्यम प्रकल्पात ४३ टक्के उपयुक्त पाणी आहे. बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात ३४ टक्के, भोकरदन तालुक्यातील धामना प्रकल्पात १२ टक्के, जाफराबाद तालुक्यातील जिवरेखा प्रकल्पात १६ टक्के उपयुक्त पाणी आहे.

टॅग्स :Rainपाऊसwater scarcityपाणी टंचाईJalanaजालना