शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

जालन्यावर दुष्काळाची छाया; भर पावसाळ्यात धावताहेत ४३ टँकर, १०९ विहिरींचे अधिग्रहण

By विजय मुंडे  | Updated: August 21, 2023 20:04 IST

जालना जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ४५.८३ टक्के पाऊस झाला आहे.

जालना : ऑगस्ट महिना शेवटच्या टप्प्यात असला तरी वार्षिक सरासरीच्या केवळ ४५ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील पाणीटंचाई कायम असून, २७ गावे, १८ वाड्यांवरील ७२ हजार ३५ नागरिकांची तहान भागविण्यासाठी ४३ टँकर धावत आहेत. शिवाय पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १०९ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे.

चालू वर्षात आजवर वार्षिक सरासरीच्या ४०३.७१ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. परंतु, त्या तुलनेत केवळ २७६.४० मिलिमीटर पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ४५.८३ टक्के पाऊस झाला आहे. आठ-दहा दिवसांनंतर पडणाऱ्या रिमझिम पावसावर खरिपातील पिके तग धरून आहेत. परंतु, पिकांची अपेक्षित वाढ न झाल्याने उत्पादनात ३० ते ४० टक्के घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. एकीकडे खरिपातील पिकांची चिंता असताना दुसरीकडे भर पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना २७ गावे १८ वाड्यांवरील ७२ हजार ३५ नागरिकांना करावा लागत आहे. संबंधित ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी ४३ टँकर धावत असून, त्यांच्या ९७ खेपा मंजूर आहेत. त्याशिवाय टँकरसाठी व टँकरव्यतिरिक्त गावांसाठी अशा एकूण १०९ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा भीषण दुष्काळाच्या छायेत आला असून, पावसाची प्रतीक्षा शेतकरी, सर्वसामान्यांना लागली आहे.

५० प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावरजालना जिल्ह्यात केवळ ७ मध्यम आणि ५७ लघु प्रकल्प आहेत. त्यातील तब्बल ५० प्रकल्पांत मृत पाणीसाठा असून, हे प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. उर्वरित १४ प्रकल्पांत केवळ ७.६५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. हे पाणीही एक महिनाभर पुरेल इतके आहे. यामुळे पाऊस पडला नाही तर पाणीटंचाईची भीषणता वाढणार आहे.

मध्यम प्रकल्पांची स्थिती बिकटजिल्ह्यात सात मध्यम प्रकल्प आहेत. त्यात भोकरदन तालुक्यातील जुई मध्यम प्रकल्प, अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात मृतसाठा आहे. जालना तालुक्यातील कल्याण गिरजा प्रकल्पात ४४ टक्के तर कल्याण मध्यम प्रकल्पात ४३ टक्के उपयुक्त पाणी आहे. बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात ३४ टक्के, भोकरदन तालुक्यातील धामना प्रकल्पात १२ टक्के, जाफराबाद तालुक्यातील जिवरेखा प्रकल्पात १६ टक्के उपयुक्त पाणी आहे.

टॅग्स :Rainपाऊसwater scarcityपाणी टंचाईJalanaजालना