शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सात दरोडेखोर मुंबईच्या घाटकोपर भागातून गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:37 IST

औद्योगिक वसाहतीमधील दोन कंपन्यांमधील सुरक्षारक्षकाला मारहाण करत दरोडा टाकणाऱ्या टोळीतील सात संशयितांना मुंबईच्या घाटकोपर भागातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील औद्योगिक वसाहतीमधील दोन कंपन्यांमधील सुरक्षारक्षकाला मारहाण करत दरोडा टाकणाऱ्या टोळीतील सात संशयितांना मुंबईच्या घाटकोपर भागातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडू चोरीतील मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेला ट्रक, असा एकूण २२ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षकांनी रविवारी याबाबत माहिती दिली.औद्योगिक वसाहतीमधील शीला व पंकज इंडस्ट्रीमध्ये २१ मार्चच्या मध्यरात्री आठ ते नऊ चोरट्यांनी कंपनीतील सुरक्षारक्षकांना चाकूचा धाक दाखवून त्याचे हातपाय बांधून टाकत ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी वापरले जाणारे तांब्याच्या तारा, पट्टी, स्क्रॅप, ब्रॉस रॉड, एलसीडी, मोबाईल व दुचाकी, असा एकूण १३ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी पथकासह घटनास्थळी बारकाईने पाहणी करून तपास सुरू केला. त्यासाठी खब-यांना कामाला लावले. दरम्यान, औद्योगिक वसाहतीत चोरी करणारे संशयित मुंबईतील घाटकोपर भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतील मुंब्रा, घाटकोपर जाऊन संशयित अब्दुल्ला जमीरउल्ला अन्सारी (३१, रा. तेनवा, उत्तरप्रदेश), अब्दुल सईम महंमद युनूस (२२,रा.सत्तवाडी, सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश), असलम अली अक्रम अली (३१ घाटकोपर, मुंबई ), अब्दुल सलीम खान (४२ घाटकोपर, मुंबई) मोहंमद इम्रान नियाजोद्दिन ( २७, रा. सिपलीनगर, ठाणे), अकबर अबीद खान (४५, कुर्ला मुंबई) इरशाम अहमेद खान ( ३१, मुंब्रा, ठाणे) यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले.चौकशीत त्यांनी औद्योगिक वसाहतीमधील चोरीची कबुली दिली. तसेच चोरलेला १३ लाख ८७ हजारांचा मुद्देमालही काढून दिला. गुन्ह्यात वापरलेला नऊ लाखांचा ट्रकही पोलिसांनी जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी संशयितांना मुद्देमालासह जालना येथे आणले. त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक सुनील इंगळे, सहायक उपनिरीक्षक शेख रज्जाक, विश्वनाथ भिसे, संतोष सावंत, प्रशांत देशमुख, कैलास जावळे, समाधान तेलंग्रे, वैभव खोकले, रंजित वैराळ यांनी ही कारवाई केली.मुंब्रा भागात संशयित दरोडेखोरांना पकडण्यासाठी प्रथम गुन्हे शाखेच्या तीन कर्मचाºयांचे एक पथक मुंबईतील मुंब्रा भागात गेले. मात्र, दरोडेखोरांच्या संख्या अधिक असल्याची माहिती खब-यांनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांना दिली. त्यानंतर जालन्याहून खाजगी वाहनोन पुन्हा एक पथक रवाना करण्यात आले. एकाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला साथीदारांना पार्टी करण्यासाठी एकत्र बोलावण्यास सांगितले. पैकी तिघे एकत्र येताच त्यांना ताब्यात घेतले.सातही संशयितांना पाच वाजता न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :crimeगुन्हेMIDCएमआयडीसी