शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कर्जमुक्तीसाठी प्रायोगिक तत्त्वावर दोन गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:30 IST

शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती मोहिमेंतर्गत दोन लाखांच्या आत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती मोहिमेंतर्गत दोन लाखांच्या आत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. या कर्जमुक्ती प्रक्रियेत येणा-या अडचणी जाणून घेण्यासाठी सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी प्रायोगिक तत्त्वावर जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी व टेंभुर्णी या दोन गावांतील कर्जमुक्तीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द होणार आहेत.महाविकास आघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रारंभीच्या टप्प्यात कर्ज खात्याशी आधार नंबर लिंक नसलेल्या शेतक-यांचा आधार क्रमांक लिंक करून घेण्यात आला. त्यानंतर बँकांमार्फत दोन लाखाच्या आत कर्ज थकीत असलेल्या शेतक-यांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातून जवळपास १ लाख ८० हजार शेतक-यांची माहिती या पोर्टलवर भरण्यात आली आहे. यात जालना तालुक्यातील साधारणत: २७ हजार, घनसावंगी तालुक्यातील २३ हजार, बदनापूर तालुक्यातील १४ हजार, मंठा तालुक्यातील १४ हजार, भोकरदन तालुक्यातील २८ हजार, जाफराबाद तालुक्यातील २३ हजार, अंबड तालुक्यातील २६ हजार तर परतूर तालुक्यातील साधारणत: १६ हजार शेतक-यांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर केल्यानंतर या कर्जमुक्ती प्रक्रियेत कोणत्याही चुका राहू नयेत, यादीत चुकीची माहिती येऊ नये, शेतक-यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनस्तरावरून प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील लाभार्थी शेतक-यांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यातील ६८ गावांची यासाठी निवड झाली आहे. जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी (ता.घनसावंगी) व टेंभुर्णी (ता. जाफराबाद) या गावांचा यात समावेश आहे. टेंभुर्णी येथील जवळपास ७४३ शेतक-यांची तर तीर्थपुरी येथील जवळपास ८६० शेतक-यांची माहिती शासकीय पोर्टलवर भरण्यात आली असून, सोमवारी लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द होणार आहे.शेतक-यांना या कागदपत्रांची लागणार आवश्यकताकर्जमुक्ती यादीत नाव आल्यानंतर लाभार्थी शेतक-यांनी आपलं सरकार केंद्रात जाताना शासकीय कर्जमुक्ती यादीत आपल्या नावासमोर आलेला विशिष्ट क्रमांक, आपले आधार कार्ड, आपला मोबाईल आणि बँकेचे पासबूक घेऊन जाणे गरजेचे आहे.याद्या सोमवारी होणार प्रसिध्द !प्रायोगिक तत्त्वावरील याद्या सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. या याद्या बँक, आपलं केंद्र, ग्रामपंचायतीवर प्रसिध्द झाल्यानंतर यादीत नाव असलेल्या शेतक-यांनी कर्जमुक्तीची रक्कम मान्य असेल तर थंब करावे किंवा मान्य नसेल तर थंबद्वारे जिल्हा समितीकडे आॅनलाईन तक्रार नोंदविणे आवश्यक आहे.या प्रक्रियेनंतर २८ फेब्रुवारीनंतर जिल्ह्यातील कर्जमुक्तीस पात्र असलेल्या सर्व शेतक-यांच्या याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी