शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

सोयाबीन बियाणांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:54 AM

गेल्या वर्षी कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीऐवजी शेतकरी सोयाबीनकडे वळल्याचे चित्र असून, सोयाबीनच्या बियाणांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामाच्या लगबगीने बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. अद्याप पेरणीयोग्य पाऊस पडला नसला तरी, बियाणे, खतांच्या खरेदीसाठी बळीराजा सरसावला आहे. गेल्या वर्षी कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीऐवजी शेतकरी सोयाबीनकडे वळल्याचे चित्र असून, सोयाबीनच्या बियाणांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. महाबीजने गुजरातहून चार हजार क्विंटल सोयाबिनचे बियाणे मागवले असून, कृषी विभागाने आणि अडीच हजार क्विंटल बियाणे लागणार असल्याचा प्रस्ताव एनएससीकडे पाठवला असल्याचे सूत्रांनी सांगितले.जालना जिल्ह्यात खरीप हंगामाचे क्षेत्र हे पाच लाख ८७ हजार हेक्टर एवढे आहे. त्यातील निम्मे क्षेत्र पूर्वी कपाशी लागवडी खाली येत असत, मात्र गेल्यावर्षी शेंदरी बोंडअळीने हैराण झालेल्या बळीराजाने कपाशीकडे पाठ फिरवल्याचे सध्या बाजारातील सोयाबीनच्या मागणीवरून दिसून येत आहे. महाबीजने यापूर्वीच बाजारात ११ हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून दिले होते. मात्र, त्यात पुन्हा वाढ होऊन आणखी चार हजार क्विंटल बियाणे हे गुजरात राज्यातून मागवले असल्याचे सांगण्यात आले.राष्ट्रीय सीड्स महामंडळाकडेही जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जवळपास अडीच हजार क्विंटल जास्तीचे बियाणांची मागणी केली आहे. या जास्तीच्या प्रस्तावाची पूर्तता केव्हा होते.याकडे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात मंगळवार पर्यंत ९८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे अद्याप बहुतांश ठिकाणी पेरण्यांना प्रारंभ झाला नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.जालना : बीटी बियाणांचा साठा पडूनदरवर्षीप्रमाणे यंदाही मागणी प्रमाणे बीटी बियाणांचा साठा जवळपास ८ लाख २७ हजार पाकीटे उपलब्ध झाला आहे. पैकी सोमवार पर्यंत तीन ते सव्वातीन लाख पाकिटांचीच विक्री झाल्याचे सांगण्यात आले. गेल्यावर्षीचा विचार केल्यास याच कालावधीत बीटी बियाणांच्या पाकिटांची विक्रीही पाच लाख पाकिटा पर्यंत पोहचली होती. यंदा तब्बल दोन लाख पाकिटांनी आज घडीला विक्री कमी झाल्याचे दिसून येत आहे. यातूनच शेतक-यांनी कपाशी ऐवजी सोयाबिनला प्राधान्य दिल्याचे दिसून येते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी