शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

सोयाबीन बियाणांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:55 IST

गेल्या वर्षी कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीऐवजी शेतकरी सोयाबीनकडे वळल्याचे चित्र असून, सोयाबीनच्या बियाणांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामाच्या लगबगीने बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. अद्याप पेरणीयोग्य पाऊस पडला नसला तरी, बियाणे, खतांच्या खरेदीसाठी बळीराजा सरसावला आहे. गेल्या वर्षी कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीऐवजी शेतकरी सोयाबीनकडे वळल्याचे चित्र असून, सोयाबीनच्या बियाणांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. महाबीजने गुजरातहून चार हजार क्विंटल सोयाबिनचे बियाणे मागवले असून, कृषी विभागाने आणि अडीच हजार क्विंटल बियाणे लागणार असल्याचा प्रस्ताव एनएससीकडे पाठवला असल्याचे सूत्रांनी सांगितले.जालना जिल्ह्यात खरीप हंगामाचे क्षेत्र हे पाच लाख ८७ हजार हेक्टर एवढे आहे. त्यातील निम्मे क्षेत्र पूर्वी कपाशी लागवडी खाली येत असत, मात्र गेल्यावर्षी शेंदरी बोंडअळीने हैराण झालेल्या बळीराजाने कपाशीकडे पाठ फिरवल्याचे सध्या बाजारातील सोयाबीनच्या मागणीवरून दिसून येत आहे. महाबीजने यापूर्वीच बाजारात ११ हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून दिले होते. मात्र, त्यात पुन्हा वाढ होऊन आणखी चार हजार क्विंटल बियाणे हे गुजरात राज्यातून मागवले असल्याचे सांगण्यात आले.राष्ट्रीय सीड्स महामंडळाकडेही जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जवळपास अडीच हजार क्विंटल जास्तीचे बियाणांची मागणी केली आहे. या जास्तीच्या प्रस्तावाची पूर्तता केव्हा होते.याकडे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात मंगळवार पर्यंत ९८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे अद्याप बहुतांश ठिकाणी पेरण्यांना प्रारंभ झाला नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.जालना : बीटी बियाणांचा साठा पडूनदरवर्षीप्रमाणे यंदाही मागणी प्रमाणे बीटी बियाणांचा साठा जवळपास ८ लाख २७ हजार पाकीटे उपलब्ध झाला आहे. पैकी सोमवार पर्यंत तीन ते सव्वातीन लाख पाकिटांचीच विक्री झाल्याचे सांगण्यात आले. गेल्यावर्षीचा विचार केल्यास याच कालावधीत बीटी बियाणांच्या पाकिटांची विक्रीही पाच लाख पाकिटा पर्यंत पोहचली होती. यंदा तब्बल दोन लाख पाकिटांनी आज घडीला विक्री कमी झाल्याचे दिसून येत आहे. यातूनच शेतक-यांनी कपाशी ऐवजी सोयाबिनला प्राधान्य दिल्याचे दिसून येते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी