शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

सोयाबीन बियाणांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:55 IST

गेल्या वर्षी कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीऐवजी शेतकरी सोयाबीनकडे वळल्याचे चित्र असून, सोयाबीनच्या बियाणांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामाच्या लगबगीने बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. अद्याप पेरणीयोग्य पाऊस पडला नसला तरी, बियाणे, खतांच्या खरेदीसाठी बळीराजा सरसावला आहे. गेल्या वर्षी कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीऐवजी शेतकरी सोयाबीनकडे वळल्याचे चित्र असून, सोयाबीनच्या बियाणांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. महाबीजने गुजरातहून चार हजार क्विंटल सोयाबिनचे बियाणे मागवले असून, कृषी विभागाने आणि अडीच हजार क्विंटल बियाणे लागणार असल्याचा प्रस्ताव एनएससीकडे पाठवला असल्याचे सूत्रांनी सांगितले.जालना जिल्ह्यात खरीप हंगामाचे क्षेत्र हे पाच लाख ८७ हजार हेक्टर एवढे आहे. त्यातील निम्मे क्षेत्र पूर्वी कपाशी लागवडी खाली येत असत, मात्र गेल्यावर्षी शेंदरी बोंडअळीने हैराण झालेल्या बळीराजाने कपाशीकडे पाठ फिरवल्याचे सध्या बाजारातील सोयाबीनच्या मागणीवरून दिसून येत आहे. महाबीजने यापूर्वीच बाजारात ११ हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून दिले होते. मात्र, त्यात पुन्हा वाढ होऊन आणखी चार हजार क्विंटल बियाणे हे गुजरात राज्यातून मागवले असल्याचे सांगण्यात आले.राष्ट्रीय सीड्स महामंडळाकडेही जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जवळपास अडीच हजार क्विंटल जास्तीचे बियाणांची मागणी केली आहे. या जास्तीच्या प्रस्तावाची पूर्तता केव्हा होते.याकडे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात मंगळवार पर्यंत ९८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे अद्याप बहुतांश ठिकाणी पेरण्यांना प्रारंभ झाला नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.जालना : बीटी बियाणांचा साठा पडूनदरवर्षीप्रमाणे यंदाही मागणी प्रमाणे बीटी बियाणांचा साठा जवळपास ८ लाख २७ हजार पाकीटे उपलब्ध झाला आहे. पैकी सोमवार पर्यंत तीन ते सव्वातीन लाख पाकिटांचीच विक्री झाल्याचे सांगण्यात आले. गेल्यावर्षीचा विचार केल्यास याच कालावधीत बीटी बियाणांच्या पाकिटांची विक्रीही पाच लाख पाकिटा पर्यंत पोहचली होती. यंदा तब्बल दोन लाख पाकिटांनी आज घडीला विक्री कमी झाल्याचे दिसून येत आहे. यातूनच शेतक-यांनी कपाशी ऐवजी सोयाबिनला प्राधान्य दिल्याचे दिसून येते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी