शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परतूरचा १ कोटी १० लाखांचा टंचाई आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 13:04 IST

तालुक्याला यावर्षी पाणी टंचाईच्या चांगल्याच झळा सोसाव्या लागणार असून, पंचायत समितीने १ कोटी १० लाखांचा ‘पाणी टंचाई कृती आराखडा’ सादर केला आहे. तर मागील वर्षी केवळ पाच विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते.

ठळक मुद्देउपाययोजना : यंदा पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र होणार

शेषराव वायाळ/परतूर : तालुक्याला यावर्षी पाणी टंचाईच्या चांगल्याच झळा सोसाव्या लागणार असून, पंचायत समितीने १ कोटी १० लाखांचा ‘पाणी टंचाई कृती आराखडा’ सादर केला आहे. तर मागील वर्षी केवळ पाच विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते.परतूर तालुक्यात यावर्षी झपाट्याने पाणी पातळी खालावत आहे. दररोज बोअर व विहरिंचे पाणी हाबकत आहे. मागील वर्षी केवळ पाच गावांतील विहिरींचे अधिग्रहण करणाऱ्या तालुक्याने यावर्षी १ कोटी ९ लाख ८० हजारांचा पाणी टंचाई कृती आराखडा सादर केला आहे. यामध्ये नवीन विहीर घेणे १४ लाख ४० हजार, विंधन विहीर विशेष दुरुस्ती २ लाख १० हजार, नळ योजना विशेष दुरूस्ती ६ लाख, खाजगी विहीर अधिग्रहण करणे ३० लाख ६० हजार रूपये टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे ५६ लाख ७० हजार रूपये असे एकूण १ कोटी ९ लाख ८० हजार रूपयांचा खर्च ग्रामीण भागातील टंचाई ग्रस्त गावात अपेक्षित आहे. मागील वर्षी पाणी टंचाईच्या झळांची तीव्रता एवढी नव्हती केवळ पाच गावात विहिरींचे अधिग्रहण करावे लागले होते. यासाठी ९० हजार रूपये खर्च झाला होता. तोच खर्च यावर्षी दहा पटीपेक्षाही अधिक होण्याची शक्यता आहे. पाणी पातळी लवकरच खालावल्याने काही गावात पाणी टंचाईची ओरड होऊ लागली आहे. निम्न दुधना प्रकल्पातील पाणी साठा सद्या पन्नास टक्क्यांवर आला आहे. या धरणावर यावर्षी परतूर, सेलूसह नव्याने परभणी व पुर्णा शहराचीही तहान भागविण्याची जबाबदारी आहे. याच वर्षी परभणी व पुर्णेसाठी या धरणातून आतापर्यंत दोन वेळा पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे निम्न दुधनाच्या बॅक वॉटर मध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे आता भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी या धरणाच्या उपशावरही निर्बंध आणावे लागतील. एकूणच या वर्षी पंचायत समितीने सादर के लेल्या पाणी टंचाई कृती आराखडयावरून ग्रामिण भागात पाणी प्रश्न गंभिर होण्याची चिन्ह दिसत आहेत.

टॅग्स :WaterपाणीJalanaजालनाFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र