शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

परतूरचा १ कोटी १० लाखांचा टंचाई आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 13:04 IST

तालुक्याला यावर्षी पाणी टंचाईच्या चांगल्याच झळा सोसाव्या लागणार असून, पंचायत समितीने १ कोटी १० लाखांचा ‘पाणी टंचाई कृती आराखडा’ सादर केला आहे. तर मागील वर्षी केवळ पाच विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते.

ठळक मुद्देउपाययोजना : यंदा पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र होणार

शेषराव वायाळ/परतूर : तालुक्याला यावर्षी पाणी टंचाईच्या चांगल्याच झळा सोसाव्या लागणार असून, पंचायत समितीने १ कोटी १० लाखांचा ‘पाणी टंचाई कृती आराखडा’ सादर केला आहे. तर मागील वर्षी केवळ पाच विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते.परतूर तालुक्यात यावर्षी झपाट्याने पाणी पातळी खालावत आहे. दररोज बोअर व विहरिंचे पाणी हाबकत आहे. मागील वर्षी केवळ पाच गावांतील विहिरींचे अधिग्रहण करणाऱ्या तालुक्याने यावर्षी १ कोटी ९ लाख ८० हजारांचा पाणी टंचाई कृती आराखडा सादर केला आहे. यामध्ये नवीन विहीर घेणे १४ लाख ४० हजार, विंधन विहीर विशेष दुरुस्ती २ लाख १० हजार, नळ योजना विशेष दुरूस्ती ६ लाख, खाजगी विहीर अधिग्रहण करणे ३० लाख ६० हजार रूपये टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे ५६ लाख ७० हजार रूपये असे एकूण १ कोटी ९ लाख ८० हजार रूपयांचा खर्च ग्रामीण भागातील टंचाई ग्रस्त गावात अपेक्षित आहे. मागील वर्षी पाणी टंचाईच्या झळांची तीव्रता एवढी नव्हती केवळ पाच गावात विहिरींचे अधिग्रहण करावे लागले होते. यासाठी ९० हजार रूपये खर्च झाला होता. तोच खर्च यावर्षी दहा पटीपेक्षाही अधिक होण्याची शक्यता आहे. पाणी पातळी लवकरच खालावल्याने काही गावात पाणी टंचाईची ओरड होऊ लागली आहे. निम्न दुधना प्रकल्पातील पाणी साठा सद्या पन्नास टक्क्यांवर आला आहे. या धरणावर यावर्षी परतूर, सेलूसह नव्याने परभणी व पुर्णा शहराचीही तहान भागविण्याची जबाबदारी आहे. याच वर्षी परभणी व पुर्णेसाठी या धरणातून आतापर्यंत दोन वेळा पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे निम्न दुधनाच्या बॅक वॉटर मध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे आता भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी या धरणाच्या उपशावरही निर्बंध आणावे लागतील. एकूणच या वर्षी पंचायत समितीने सादर के लेल्या पाणी टंचाई कृती आराखडयावरून ग्रामिण भागात पाणी प्रश्न गंभिर होण्याची चिन्ह दिसत आहेत.

टॅग्स :WaterपाणीJalanaजालनाFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र