शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

सरपंच संतोष देशमुख यांचे कुटूंब दहशती खाली, त्यांना पोलिस संरक्षण द्या: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 17:09 IST

धनंजय देशमुख यांनी अंतरवाली सराटीत घेतली मनोज जरांगे यांची भेट

वडीगोद्री ( जालना) : ''तुम्ही कोणालाच सोडू नका. मराठा समाज न्यायासाठी डोळे लावून बसला आहे'', असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाल्मीक कराड यांच्या सरेंडरनंतर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी केले. सरपंच देशमुख यांचे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. ते दहशती खाली आहेत. त्यांच्या घराला पूर्ण संरक्षण द्यावे, अशी मागणीही जरांगे यांनी केला.

मस्साजोगचे सरपंच मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अंतरवाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय देशमुख हे प्रथमच अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आले होते. भेटी नंतर मनोज जरांगे पाटील व धनंजय देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, न्याय देण्याचे काम फडणवीस साहेबांनी करावे. सर्व आरोपी धरावे, सर्वांचे कॉल डिटेल्स चेक करावे, अशी मागणी जरांगे यांनी केली. वाल्मीक कराड दोन महिन्यापासून कोणाकोणाशी बोलला. कोणत्या मंत्र्याशी बोलला, त्याचे कॉल डिटेल्स काढले पाहिजे, त्या सर्व लोकांना आत टाकलं पाहिजे. सरकारनं मराठा समाजाची दिशाभूल करू नये, यातील एकही माणूस सुटू नये, यासाठी उज्वल निकम यांची विशेष सरकारनी वकील म्हणून नेमणूक करण्यात यावी अशी मागणी जरांगे यांनी केली.

वाल्मीक कराड कसं ठरवल आरोपी नाहीत म्हणून, न्यायदेवता ठरवल : धनंजय देशमुख सरकारने वाल्मीक कराड सोबतचे सर्व आरोपी शोधावे. सीडीआर काढून जे कोणी दोषी असेल त्यांना ताब्यात घ्यावे. सरकारने लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा. वाल्मीक कराड खुनाच्या प्रकरणात आरोपी नाहीत हे कसे ठरवले, असा सवाल जरांगे यांनी केले. न्यायदेवता ठरवल आरोपी कोण आहे ते, सत्य समोर येणार थोडा वेळ जाईल, सीआयडीचा प्रामाणिक प्रयत्न आहेत. त्यामुळे आज आरोपी जेरबंद झाला अशी प्रतिक्रीया धनंजय देशमुख, मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ यांनी दिली ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी मंगळवारी दुपारी अंतरवाली सराटीत आले होते.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणJalanaजालना