शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
3
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
4
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
5
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
6
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
7
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
8
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
9
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
10
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
11
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
12
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
13
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
14
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
15
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
16
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
17
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
18
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
19
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
20
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!

वाळू तस्करांना ३ कोटी रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:14 IST

जालना : गोदावरी नदीसह जिल्ह्यातील इतर नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द महसूल, पोलीस पथकाने १४४ धाडी मारल्या आहेत. ...

ठळक मुद्दे१४४ प्रकरणे : वसुली मात्र केवळ ५८ लाख रुपयांची

जालना : गोदावरी नदीसह जिल्ह्यातील इतर नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द महसूल, पोलीस पथकाने १४४ धाडी मारल्या आहेत. या कारवाईनंतर संबंधित वाळू तस्करांवर तब्बल ३ कोटी २३ लाख ५१ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला होता. मात्र यापैकी केवळ ५८ लाख ७५ हजाराचा दंड काही वाळू तस्करांनी महसूलकडे जमा केला आहे.जालना जिल्ह्यातून वाहणाºया गोदावरी नदीसह इतर नद्यांच्या पात्रातून अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणाºया तस्करांच्या टोळ्याच जिल्ह्यात कार्यरत आहेत. अशा वाळू तस्करांना लगाम लावण्यासाठी महसूल यंत्रणेसह पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी सातत्याने कारवाई मोहीम राबवित आहेत. चालू वर्षात जिल्हाभरात एकूण १४४ कारवाया करण्यात आल्या आहेत. यात संबंधित वाळू तस्करांवर ३ कोटी २३ लाख ५१ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला होता. वाळू तस्करांनी ५८ लाख ७५ हजार रूपयांचा दंड महसूल यंत्रणेकडे भरला आहे.यात जालना तालुक्यात २ कारवाया करून २ लाख ६२ हजाराचा दंड आकारण्यात आला होता. पैकी २ लाख ६१ हजार रूपयांचा दंड वसूल झाला आहे. बदनापूर तालुक्यात ७ कारवाया करण्यात आल्या होत्या. संबंधितांवर २ लाख ८८ हजाराचा दंड आकारण्यात आला होता. हा सर्वच दंड वसूल झाला आहे.भोकरदन तालुक्यात १६ कारवाया करून वाळू तस्करांना ३५ लाख ९७ हजाराचा दंड करण्यात आला होता. पैकी ७ लाख २७ हजार रूपयांचा दंड वसूल झाला आहे. जाफराबाद तालुक्यात ८ कारवाया झाल्या होत्या. यात १४ लाख ४० हजाराचा दंड आकारण्यात आला होता. मात्र यातील केवळ ७ लाख २० हजार रूपयांचा दंड वसूल झाला. परतूर तालुक्यात १० झाल्या. यात ३३ लाख ६३ हजाराचा दंड झाला होता. मात्र, वाळू तस्करांनी दंडातील छदामही भरलेला नाही.मंठा तालुक्यात १८ कारवाया करून २३ लाख ४३ हजाराचा दंड आकारण्यात आला होता. पैकी १५ लाख ११ हजार रूपयांचा दंड वसूल झाला आहे. अंबड तालुक्यात जिल्ह्यात सार्वाधिक ७० कारवाया झाल्या होत्या. या प्रकरणातील वाळू तस्करांना तब्बल १ कोटी ९५ लाख ८६ हजाराचा दंड आकारण्यात आला होता.या वाळू तस्करांनी आजवर केवळ १४ लाख ९३ हजार रूपयांचा दंड भरला आहे. तर घनसावंगी तालुक्यात १३ कारवाया करण्यात आल्या होत्या. वाळू तस्करांना १४ लाख ७३ हजाराचा दंड आकारण्यात आला होता. मात्र वाळू तस्करांनी ८ लाख ७५ हजार रूपयांचा दंड भरला आहे.धडक कारवाई : ४९ प्रकरणात गुन्हे४वाळू तस्करी करणाºया १४४ जणांविरूध्द जिल्ह्यात कारवाया करण्यात आल्या होत्या. सर्वाधिक नियमांचे उल्लंघन करून दंड न भरल्याने ४९ प्रकरणात पोलीस विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महसूल बरोबर पोलीस प्रशासनही वाळू तस्करांविरूध्द धडक कारवाई करीत आहे.

टॅग्स :JalanaजालनाsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग