शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

वाळू तस्करांना ३ कोटी रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:14 IST

जालना : गोदावरी नदीसह जिल्ह्यातील इतर नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द महसूल, पोलीस पथकाने १४४ धाडी मारल्या आहेत. ...

ठळक मुद्दे१४४ प्रकरणे : वसुली मात्र केवळ ५८ लाख रुपयांची

जालना : गोदावरी नदीसह जिल्ह्यातील इतर नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द महसूल, पोलीस पथकाने १४४ धाडी मारल्या आहेत. या कारवाईनंतर संबंधित वाळू तस्करांवर तब्बल ३ कोटी २३ लाख ५१ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला होता. मात्र यापैकी केवळ ५८ लाख ७५ हजाराचा दंड काही वाळू तस्करांनी महसूलकडे जमा केला आहे.जालना जिल्ह्यातून वाहणाºया गोदावरी नदीसह इतर नद्यांच्या पात्रातून अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणाºया तस्करांच्या टोळ्याच जिल्ह्यात कार्यरत आहेत. अशा वाळू तस्करांना लगाम लावण्यासाठी महसूल यंत्रणेसह पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी सातत्याने कारवाई मोहीम राबवित आहेत. चालू वर्षात जिल्हाभरात एकूण १४४ कारवाया करण्यात आल्या आहेत. यात संबंधित वाळू तस्करांवर ३ कोटी २३ लाख ५१ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला होता. वाळू तस्करांनी ५८ लाख ७५ हजार रूपयांचा दंड महसूल यंत्रणेकडे भरला आहे.यात जालना तालुक्यात २ कारवाया करून २ लाख ६२ हजाराचा दंड आकारण्यात आला होता. पैकी २ लाख ६१ हजार रूपयांचा दंड वसूल झाला आहे. बदनापूर तालुक्यात ७ कारवाया करण्यात आल्या होत्या. संबंधितांवर २ लाख ८८ हजाराचा दंड आकारण्यात आला होता. हा सर्वच दंड वसूल झाला आहे.भोकरदन तालुक्यात १६ कारवाया करून वाळू तस्करांना ३५ लाख ९७ हजाराचा दंड करण्यात आला होता. पैकी ७ लाख २७ हजार रूपयांचा दंड वसूल झाला आहे. जाफराबाद तालुक्यात ८ कारवाया झाल्या होत्या. यात १४ लाख ४० हजाराचा दंड आकारण्यात आला होता. मात्र यातील केवळ ७ लाख २० हजार रूपयांचा दंड वसूल झाला. परतूर तालुक्यात १० झाल्या. यात ३३ लाख ६३ हजाराचा दंड झाला होता. मात्र, वाळू तस्करांनी दंडातील छदामही भरलेला नाही.मंठा तालुक्यात १८ कारवाया करून २३ लाख ४३ हजाराचा दंड आकारण्यात आला होता. पैकी १५ लाख ११ हजार रूपयांचा दंड वसूल झाला आहे. अंबड तालुक्यात जिल्ह्यात सार्वाधिक ७० कारवाया झाल्या होत्या. या प्रकरणातील वाळू तस्करांना तब्बल १ कोटी ९५ लाख ८६ हजाराचा दंड आकारण्यात आला होता.या वाळू तस्करांनी आजवर केवळ १४ लाख ९३ हजार रूपयांचा दंड भरला आहे. तर घनसावंगी तालुक्यात १३ कारवाया करण्यात आल्या होत्या. वाळू तस्करांना १४ लाख ७३ हजाराचा दंड आकारण्यात आला होता. मात्र वाळू तस्करांनी ८ लाख ७५ हजार रूपयांचा दंड भरला आहे.धडक कारवाई : ४९ प्रकरणात गुन्हे४वाळू तस्करी करणाºया १४४ जणांविरूध्द जिल्ह्यात कारवाया करण्यात आल्या होत्या. सर्वाधिक नियमांचे उल्लंघन करून दंड न भरल्याने ४९ प्रकरणात पोलीस विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महसूल बरोबर पोलीस प्रशासनही वाळू तस्करांविरूध्द धडक कारवाई करीत आहे.

टॅग्स :JalanaजालनाsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग