शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

वाळू तस्करांना ३ कोटी रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:14 IST

जालना : गोदावरी नदीसह जिल्ह्यातील इतर नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द महसूल, पोलीस पथकाने १४४ धाडी मारल्या आहेत. ...

ठळक मुद्दे१४४ प्रकरणे : वसुली मात्र केवळ ५८ लाख रुपयांची

जालना : गोदावरी नदीसह जिल्ह्यातील इतर नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द महसूल, पोलीस पथकाने १४४ धाडी मारल्या आहेत. या कारवाईनंतर संबंधित वाळू तस्करांवर तब्बल ३ कोटी २३ लाख ५१ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला होता. मात्र यापैकी केवळ ५८ लाख ७५ हजाराचा दंड काही वाळू तस्करांनी महसूलकडे जमा केला आहे.जालना जिल्ह्यातून वाहणाºया गोदावरी नदीसह इतर नद्यांच्या पात्रातून अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणाºया तस्करांच्या टोळ्याच जिल्ह्यात कार्यरत आहेत. अशा वाळू तस्करांना लगाम लावण्यासाठी महसूल यंत्रणेसह पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी सातत्याने कारवाई मोहीम राबवित आहेत. चालू वर्षात जिल्हाभरात एकूण १४४ कारवाया करण्यात आल्या आहेत. यात संबंधित वाळू तस्करांवर ३ कोटी २३ लाख ५१ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला होता. वाळू तस्करांनी ५८ लाख ७५ हजार रूपयांचा दंड महसूल यंत्रणेकडे भरला आहे.यात जालना तालुक्यात २ कारवाया करून २ लाख ६२ हजाराचा दंड आकारण्यात आला होता. पैकी २ लाख ६१ हजार रूपयांचा दंड वसूल झाला आहे. बदनापूर तालुक्यात ७ कारवाया करण्यात आल्या होत्या. संबंधितांवर २ लाख ८८ हजाराचा दंड आकारण्यात आला होता. हा सर्वच दंड वसूल झाला आहे.भोकरदन तालुक्यात १६ कारवाया करून वाळू तस्करांना ३५ लाख ९७ हजाराचा दंड करण्यात आला होता. पैकी ७ लाख २७ हजार रूपयांचा दंड वसूल झाला आहे. जाफराबाद तालुक्यात ८ कारवाया झाल्या होत्या. यात १४ लाख ४० हजाराचा दंड आकारण्यात आला होता. मात्र यातील केवळ ७ लाख २० हजार रूपयांचा दंड वसूल झाला. परतूर तालुक्यात १० झाल्या. यात ३३ लाख ६३ हजाराचा दंड झाला होता. मात्र, वाळू तस्करांनी दंडातील छदामही भरलेला नाही.मंठा तालुक्यात १८ कारवाया करून २३ लाख ४३ हजाराचा दंड आकारण्यात आला होता. पैकी १५ लाख ११ हजार रूपयांचा दंड वसूल झाला आहे. अंबड तालुक्यात जिल्ह्यात सार्वाधिक ७० कारवाया झाल्या होत्या. या प्रकरणातील वाळू तस्करांना तब्बल १ कोटी ९५ लाख ८६ हजाराचा दंड आकारण्यात आला होता.या वाळू तस्करांनी आजवर केवळ १४ लाख ९३ हजार रूपयांचा दंड भरला आहे. तर घनसावंगी तालुक्यात १३ कारवाया करण्यात आल्या होत्या. वाळू तस्करांना १४ लाख ७३ हजाराचा दंड आकारण्यात आला होता. मात्र वाळू तस्करांनी ८ लाख ७५ हजार रूपयांचा दंड भरला आहे.धडक कारवाई : ४९ प्रकरणात गुन्हे४वाळू तस्करी करणाºया १४४ जणांविरूध्द जिल्ह्यात कारवाया करण्यात आल्या होत्या. सर्वाधिक नियमांचे उल्लंघन करून दंड न भरल्याने ४९ प्रकरणात पोलीस विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महसूल बरोबर पोलीस प्रशासनही वाळू तस्करांविरूध्द धडक कारवाई करीत आहे.

टॅग्स :JalanaजालनाsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग