शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

सर्वेक्षणानंतरच वाळूचे लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 01:10 IST

राज्य पातळीवर नेमण्यात आलेल्या पर्यावरण समितीने मंजुरी दिल्यावरच वाळू घाटांचे लिलाव होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाळू आणि खडी टंचाईमूळे बांधकाम व्यवसाय धोक्यात आला आहे. वाळू पट्ट्यांचे लिलाव रखडल्याने ही टंचाई निर्माण झाली आहे. शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केल्याने आता भूजल सर्वेक्षण विभागाने ज्या नद्यांमधून वाळू उपसा करण्यासाठी परवानगी दिली आहे, अशा वाळू घाटांचे खाजगी एजंन्सीकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ही सर्वेक्षण एजन्सी कोणत्या वाळू घाटांमधून किती वाळू उपसावी याचे विवरण गौण खनिज विभागाला देईल. त्यानंतर हे प्रकरण मंजुरीसाठी राज्य पातळीवर नेमण्यात आलेल्या पर्यावरण समितीने मंजुरी दिल्यावरच वाळू घाटांचे लिलाव होणार आहेत.गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यात वाळू तसेच खडीची टंचाई निर्माण झाली आहे. मध्यंतरी अवैध वाळू वाहतुकीने कळस गाठल्याने विभागीय आयुक्तांनी या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली. त्या नंतर अवैध वाळू उपसा आणि त्याच्या वाहतुकीवर बराच फरक पडला आहे. असे असले तरी वाळू माफियांकडून सद्यस्थितीत अधिकारी तसेच पोलिसांना हाताशी धरून चढ्या भावाने वाळूचे ट्रक, टिप्पर विक्री होत आहे. सध्या शासनाकडून पर्यावरण संवर्धनाला मोठे महत्व दिले जात आहे. त्यामूळे अवैध वाळू उत्खननावर बारीक लक्ष असून, ते जो पर्यंत संपूर्ण वाळू घाटांचे लिलाव होणार नाहीत, तो पर्यंत असेच राहणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्हा खनिकर्म विभागाने जिल्ह्यात जानेवारी महिन्यात अवैध उत्खनन व वाहतुकीची २३१ कारवाया केल्या आहेत. या कारवाईत संबंधितांना ४ कोटी ८५ लाख १० हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला असून, १ कोटी ४४ लाख ३४ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात जालना तालुक्यात १७ कारवाया करून ३३ लाख ५६ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पैकी २१ लाख ९९ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बदनापूर केलेल्या १३ कारवायांमध्ये २४ लाख ७० हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला असून, ९ लाख ३६ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. भोकरदन २२ कारवाया करण्यात आल्या आहेत. यात ४५ लाख ६३ हजाराचा दंड आकारण्यात आला असून, यातील १८ लाख २१ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.५६ प्रकरणांत गुन्हे दाखलवाळू उत्खनन, वाहतूक प्रकरणात जिल्ह्यात ५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात जालना तालुक्यात २, भोकरदन तालुक्यात ३, जाफराबाद तालुक्यात ५, परतूर तालुक्यात २, मंठा तालुक्यात १, अंबड तालुक्यात ३६ तर घनसावंगी तालुक्यातील ७ प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.१०५ वाहने जप्तजिल्हा खनिकर्म अधिकारी विभागाने केलेल्या कारवाईत आजवर १०५ वाहने जप्त करण्यात आले आहेत. यात परतूर तालुक्यात १८, अंबड तालुक्यात ८७ असे एकूण १०५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.पथकावरही झाला हल्लाअवैध वाळू तस्करांविरूध्द प्रशासनाने कारवाई मोहीम हाती घेतली आहे. यात कारवाईवेळी जाफराबाद तालुक्यात एका पथकावर हल्ला झाला आहे. या प्रकरणात पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :sandवाळूRevenue Departmentमहसूल विभागSmugglingतस्करी