शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

रामनगर येथे संभाजी-राजे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:32 IST

स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सादरीकरण परतूर : येथील जिल्हा परिषद प्रशालेची प्रियंका दत्ताराव मुजमुले हिने राष्ट्रगीत गायन स्पर्धेत सहभाग नोंदवून ...

स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सादरीकरण

परतूर : येथील जिल्हा परिषद प्रशालेची प्रियंका दत्ताराव मुजमुले हिने राष्ट्रगीत गायन स्पर्धेत सहभाग नोंदवून सर्वोत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने सदरील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्याध्यापक विष्णू कदम, गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे, गटसमन्वयक कल्याण बागल, द.या. काटे आदींची उपस्थिती होती.

ओमशांती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

अंबड : महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यात शहापूर येथील ओमशांती विद्यालयाचे तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात जयश्री परमेश्वर, सुजीत घायतडक, सूरज धन्ने हे शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष विलास खरात, वैशाली खरात, विश्वजीत खरात, प्रशासकीय अधिकारी देशमुख, मुख्याध्यापक स्वामी कणके आदींनी कौतुक केले.

रविवारी मोफत नेत्रतपासणी शिबिर

जालना : लायन्स क्लबच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे येत्या रविवारी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये सकाळी ८ ते २ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. त्यात मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांवर औरंगाबाद येथील लायन्स आय हॉस्पिटलमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

जांबसमर्थ परिसरात रिमझिम पाऊस

कुंभार पिंपळगाव: तालुक्यातील जांबसमर्थ महसूल मंडळात मंगळवारी दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार चालू होती. मुसळधार पावसाने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. जांबसमर्थ परिसरात अनेक नदी-नाल्यांना पाणी आले. काही ठिकाणी पावसाचे पाणी शेतात साचल्याने पिकांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी शेत जमीन खरडून गेली. या पावसाने परिसरातील साठवण तलाव, पाझर तलाव, विहिरीत जलसाठा झाला आहे.

अर्धेगाव सहा महिन्यांपासून अंधारात

आन्वा : भोकरदन तालुक्यात आन्वा येथील वीज मंडळाच्या मनमानी कारभारामुळे मागील सहा महिन्यांपासून अर्धे गाव अंधारात आहे. विशेष म्हणजे, जळालेले दहा गट्टूे दोन महिन्यांपासून वीज मंडळाच्या जालना कार्यालयात पडून आहे. गावातील वीजपुरवठा करणारे जवळपास दहा गट्टे जळाले आहेत. त्यामुळे अर्धे गाव गेल्या सहा महिन्यांपासून अंधारात आहे. आठ दिवसांपूर्वी गावातील दोन गट्टू जळून गेले. त्यामुळे वीजपुरवठा बंद झाला.

तळणीच्या दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर चिखलाचे साम्राज्य

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर चिखल पसरला असून, याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. गावातील शेकडो ग्रामस्थ या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात, परंतु ऐतिहासिक वेशीपासूनच चिखल तुडवत दर्शनासाठी जावे लागत आहे. मंदिराच्या बाजूला अनेक ग्रामस्थ राहतात. त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.