शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

जांब समर्थ येथे समर्थ महासंगम सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 01:09 IST

जांब समर्थ येथे चैतन्य ज्ञानपीठाच्या वतीने ७ ते ९ डिसेंबर दरम्यान समर्थ महासंगम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : संत रामदास स्वामी यांची जन्मभूमी असलेल्या घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे चैतन्य ज्ञानपीठाच्या वतीने ७ ते ९ डिसेंबर दरम्यान समर्थ महासंगम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक सुरेश जोशी यांच्या हस्ते होणार आहे.या सोहळ्यासंदर्भात माहिती देण्यासाठी श्रीसमर्थ रामदास स्वामी श्रीराम दर्शन चतु:शताब्दी प्रबोधन समितीतर्फे सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील सर्व थोर संतांची गावे ही जागतिक प्रेरणास्थळे व्हावी या हेतूने प.पू. गोविंदगिरी स्वामी महाराजांच्या उपस्थितीमध्ये चैतना ज्ञानपीठाची स्थापना २०१२ मध्ये पुणे येथे करण्यात आली. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील संताची जन्म आणि कर्मभूमी असलेल्या गावामध्ये विविध विकास योजनांसह विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती महेश कवठे यांनी दिली. यावेळी जांबसमर्थ येथे होणाऱ्या सोहळ्यास राज्यासह देश आणि परदेशातून भाविकांची उपस्थिती राहील, असे सांगण्यात आले. दरम्यान उद्घाटन सोहळ्यास प.ूप. अद्रश्य काडसिध्देश्वर महाराज, ह.भ.प. निरंजन महाराज ठाकरे यांची उपस्थित राहणार आहे.रविवारी सकाळी काकड आरती तसेच परिसंवाद होणार असून यावेळी लखन जाधव हे शौर्य प्रात्यक्षिके सादर करणार असून परिसंवादात प्रकाश पाठक, दादासाहेब जाधव, अभिजीत देशमुख, मनीषा बाठे यांचा सहभाग राहणार आहे. कार्यक्रमाचा समारोप सोमवारी होणार असून यावेळी ‘प्रपंच करावा नेटका’ याविषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी शरद कुबेर हे राहणार असून प्रमुख वक्ते अविनाश गोहाड, डॉ. विजय लाड, मंगला कांबळे यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी १२ वाजता प.पू. गोविंदगिरी महाराजाचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.पत्रकार परिषदेस निवृत्त मुख्याध्यापक विनायक देशपांडे, प्रा. विनायक दसरे, चैतन्य ज्ञानपीठाचे अध्यक्ष डॉ. जगदीश कळमळकर, समर्थ रामदास स्वामी श्रीराम दर्शन समितीचे अध्यक्ष विनायक देहडकर, महेश कवठेकर, सूर्यकांत कुलकर्णी, रवींद्र भामरे आदींची उपस्थिती होती.जांब समर्थ येथील रविवारी दुपारी १२ वाजता संतपूजन कार्यक्रमात हेलिकॉप्टरव्दारे सायंकाळी ४ वाजता पुष्पवृष्टी होणार असून याच दिवशी ह.भ.प. पांडुरंग महाराज आनंदे यांचे कीर्तन होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घेण्याचे आवाहन पत्र परिषदेत केले.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम